Wednesday, May 24, 2023

 हदगाव येथे शुक्रवारी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती

करिअर समुपदेशन मेळाव्याचे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 24 :- व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत हदगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे शुक्रवार 26 मे 2023 रोजी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर समुपदेशन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा तामसा रोड हदगाव येथील सुमन गार्डन ॲन्ड लॉन्स येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत या कालावधीत होईल. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते होईल. हदगाव तालुक्यातील विद्यार्थी, पालकवर्ग व शिक्षकांनी https://mahacareer.globalsapio.com या लिंकवर नोंदणी करावी असे आवाहन संयोजक समितीच्यावतीने करण्यात आले आहे.   

 

या मेळाव्यात प्रामुख्याने दहावी, बारावीनंतर महाविद्यालयीन शिक्षण व इतर अभ्यासक्रम, अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना, कर्ज योजना या विषयांवर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाईल. या मेळाव्यास हदगावचे उपजिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अब्दुल वहिद, तहसीलदार जीवराज डापकर, प्रभारी पोलीस निरीक्षक जगन पवार, नगरपरिषदेचे मुख्यधिकारी दामोधर जाधव, उपकोषागार अधिकारी सचिन कद्रे, एसबीआय बँकेचे शाखा अधिकारी अभिषेक रोहतगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता देवराव भिसे, गटविकास अधिकारी दशरथ आडेराघो, गटशिक्षणाधिकारी किसनराव फोले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

या मेळाव्याच्या संयोजक समितीमध्ये जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर. बी. गणवीर, कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, हदगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य फारूकी वासे यांचा समावेश आहे.  

0000

23.5.2023.

 छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर

समुपदेशन मेळाव्याचे 26 मे रोजी हदगाव येथे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था हदगाव यांच्यावतीने 26 मे 2023 रोजी सुमन लॉन्सतामसा रोडहदगाव येथे सकाळी 10 ते 2 या कालावधीत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर समुपदेशन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उदघाटन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते होणार आहे.  

 

या मेळाव्यात प्रामुख्याने दहावी व बारावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व इतर अभ्यासक्रममहाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियाशैक्षणिक शिष्यवृत्ती योजनाकर्ज योजना या विषयावर तज्ञामार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. हदगाव तालुक्यातील विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी https://mahacareer.globalsapio.com/ या गुगल फॉर्म लिंकवर नोंदणी करुन या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

0000

23.5.2023.

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम 

योजनेत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्यात बेरोजगार उत्पादन उद्योग व सेवा उद्योगांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना राबविण्यात येते.  या योजने अंतर्गत सेवा उद्योगासाठी 20 लक्ष रुपये मर्यादेपर्यंत व उत्पादन उद्योगासाठी 50 लक्ष रुपयांपर्यत बँकेमार्फत अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेत इच्छुक अर्जदारांनी https/maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.

या योजने अंतर्गत उद्योग विभागामार्फत बँकेच्या कर्ज मंजुरीनंतर जास्तीत जास्त 35 टक्के पर्यत (जात प्रवर्ग/उद्योग कार्यक्षेत्रानुसार) अनुदान देय आहे. ऑनलाईन केलेल्या कर्ज प्रकरणांची दरमहा छानणी नंतर ऑनलाईन कर्ज प्रस्ताव मंजुरीसाठी शिफारस करण्यात येतात व कर्ज मंजुरी /वाटपानंतर अनुदान ऑनलाईन बँकेत जमा करण्यात येते. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे कागदपत्राची यादी पुढीलप्रमाणे आहे. पासपोर्ट आकाराचे फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, वयाचा दाखला (टीसी), डोमिसाईल /रहिवासी प्रमाणपत्र, अनुसूचित जाती-जमातीसाठी जात प्रमाणपत्र, ग्रामीण भागासाठी गावाचा लोकसंख्येचा दाखला/प्रमाणपत्र (ग्रामसेवक यांचे), हमीपत्र (अंडरटेकींग फॉर्म) वेबसाइटवरील मेन्युबारमध्ये उपलब्ध, प्रकल्प अहवाल इ. कागदपत्रे 300 केबी (KB) पर्यत असावे. तसेच हमीपत्र व प्रकल्प अहवाल 1 (Mb) एमबी पर्यत असावे असे जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने कळविण्यात आले आहे.

00000

23.5.2023.

 न्युक्लीअस बजेट योजनेत अर्ज करण्यासाठी 31 मे पर्यत मुदतवाढ 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट अंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यासाठी न्युक्लीअस बजेट योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत सन 2022-23 अंतर्गत अ गटातील वैयक्तीक व सामुहिक लाभाच्या योजना राबविण्यासाठी 17 एप्रिल ते 17 मे 2023 या कालावधीत लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते.

 

तथापि प्रकल्पातील नागरिकांच्या मागणीनुसार न्युक्लीअस बजेट योजना सन 2022-23 अंतर्गत अ गटातील वैयक्तीक व सामुहिक योजनांचे व शबरी घरकुल योजनेचे अर्ज वाटप व स्विकारण्यासाठी 31 मे 2023 पर्यत मुदतवाढ दिली आहे.  या योजनेसाठी लाभार्थ्यांनी 31 मे 2023 पर्यत अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकलपाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.

0000

Tuesday, May 23, 2023

 शासन आपल्या दारी” अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकिय यंत्रणा दूत म्हणून देईल योगदान

- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
▪️नांदेड येथे 1 जून रोजी शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन
▪️शासकीय योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी कार्यक्रमस्थळी शासनाच्या सर्व विभागाच्या स्टॉलचे नियोजन
▪️प्रातिनिधिक लाभार्थी व प्रगतशील शेतकऱ्यांचा होणार सन्मान
नांदेड (जिमाका) दि. 23 :- दुर्गम भागासह खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे दक्षता घेतली जात आहे. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांच्या लाभातून विकासाचा मार्ग गाठता यावा या उद्देशाने “शासन आपल्या दारी” हा महत्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सुमारे 21 हजारांपेक्षा अधिक शासकीय अधिकारी-कर्मचारी आपल्या कर्तव्यासह सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून योगदान देतील, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला. हा उपक्रम नांदेड जिल्ह्यात व्यापक होण्यासाठी सर्वांनी योग्य ती दक्षता घेऊन कटिबद्ध व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.
“शासन आपल्या दारी” या अभियानानिमित्त विशेष कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 1 जून रोजी प्रस्तावित नांदेड जिल्हा दौरा देण्यात आला आहे. त्यांच्या हस्ते या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे. यासंदर्भात आज येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे अधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस दूरदृष्यप्रणालीद्वारे खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव डॉ. अमोल शिंदे, प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, विविध विभागाचे विभाग प्रमुख यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.
सर्वच नागरिकांना शासनाच्या संबंधित विभागाकडे जाऊन योजनेचा लाभ घेता येऊ शकेल असे शक्य होत नाही. असंख्य नागरिक हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही केवळ संबंधित शासकीय कार्यालयापर्यंत पोहचवू शकत नसल्यामुळे शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात. शासकीय योजनांसाठी पात्र असलेले लाभधारक व शासन यांच्यामध्ये अधिक समन्वय व्हावा व जबाबदार शासनाचा प्रत्यय सर्वसामान्यांना मिळावा यासाठी शासनाने “शासन आपल्या दारी” ही अभिनव योजना हाती घेतली आहे.
या उपक्रमासाठी सर्वांचा सहभाग हा महत्वाचा असून सर्व विभागामार्फत देण्यात येणारे लाभ एकाच दिवशी विक्रमी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा महत्वाकांक्षी संकल्प आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृषी, आरोग्य, रोजगार व स्वयंरोजगार, कामगार विभाग यांनी त्यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शेवटच्या लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक असल्याचे वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
या उपक्रमात जिल्ह्याचे वैशिष्ट्यपूर्ण माहितीचे प्रदर्शन घडेल अशा बाबींच्या प्रदर्शनाचे स्टॉल उभारण्यात यावेत. आदिवासी भागातील लाभार्थ्यानी बाबुपासून तयार केलेल्या वस्तु, आदिवासीचे नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम, कृषी वर आधारित सोयाबिन, करडी पिके, मानव विकास अंतर्गत माझी मुलगी या अभियान, होट्टल येथील शिल्पकलेसह जिल्ह्यातील अशा वैशिष्टपूर्ण बाबींची माहिती या उपक्रमाच्या माध्यमातून दाखविण्याचे नियोजन तालुका पातळीवरील यंत्रणानी करावे असेही त्यांनी सांगितले.
किनवट, हदगाव, इस्लापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांपर्यंत ही योजना पोहचावी
- खासदार हेमंत पाटील
नांदेड जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. किनवट, हदगाव, इस्लापूर, मांडवी आदी भागातील नागरिकांना तालुका व जिल्हा पातळीवर असलेल्या शासकीय कार्यालयापर्यंत पोहचणे शक्य होईलच असे नाही. असा नागरिकांनाही विकासाच्या कक्षेत घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी अधिक दक्षता घेतली पाहिजे. “शासन आपल्या दारी” ही अभिनव योजना या दृष्टिकोनातून खूप महत्वाची असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी आपला सहभाग घेतला. जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. अशा कामात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षे लक्षात घेता त्यांची कोणतीही अडचण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. आमदार बालाजी कल्याणकर यांनी बैठकीत सूचना केल्या.
00000



Monday, May 22, 2023

वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न करणारे 1 हजार 383 ग्रामपंचायत उमेदवार अनर्ह

 वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न करणारे

हजार 383 ग्रामपंचायत उमेदवार अनर्ह 

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- आरक्षित जागेतून निवडून आलेले जिल्ह्यातील हजार 383 उमेदवार आपले जातीचे वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर करु न शकल्याने त्यांना अनर्ह ठरविण्यात आले. महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 चे कलम 10 (1-अ) अन्वये जे उमेदवार आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात कसूर करतील त्या उमेदवारांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याची तरतूद आहे. या उमेदवारांना संधी देवूनही ते आपल्या प्रमाणपत्राची वैधता सादर करू न शकल्यामुळे अशा हजार 383 उमेदवारांची निवड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रद्द केली.   

 

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमानुसार 15 जानेवारी 2021 रोजी मतदान व 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी पार पडली होती. माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागेतून निवडणूक लढवून आल्यानंतर शासनाने जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 17 जानेवारी 2023 पर्यत अंतिम मुदतवाढ दिली होती. अखेर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 18 मे 2023 रोजीच्या आदेशान्वये हजार 383 उमेदवार अनर्ह केले आहे.

 

अनर्ह केलेल्या तालुकानिहाय उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. नांदेड 15, अर्धापूर 54, भोकर 138, मुदखेड 53, हदगाव 108, हिमायतनगर 70, किनवट 34, माहूर 19, धर्माबाद 99, उमरी 142, बिलोली 61, नायगांव 112, देगलूर 121, मुखेड 139, कंधार 91, लोहा 127 अशी एकूण हजार 383 अनर्ह उमेदवार आहेत.

0000

 खरीप हंगामासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- शेतकऱ्यांनी एचटीबीटी बियाणाबाबत जागरूक राहून अशा कुठल्याही अनधिकृत बियाणांची पेरणी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. खरीप हंगाम चांगला होण्याच्या दृष्टीने त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

 

या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे,  जिल्हा पोलीस अधिक्षक  प्रतिनिधी ए.जी. सातपुते, उपविभागीय कृषि अधिकारी पी.ए. गायके, तंत्र अधिकारी बी.बी. गिरी, जिल्हा गुण नियंत्रण निरिक्षक जी.एन. हुंडेकर, मोहीम अधिकारी विपिन कासलीवाल, सचिव माफदा सदाशिव पुंड जिल्हा अध्यक्ष कृषि निविष्ठा धारक, तालुका कृषि अधिकारी पी.आर. माने, खत कंपनी प्रतिनिधी, बियाणे कंपनी प्रतिनिधी, कामगार आयुक्त प्रतिनिधी पाठक, प्रकल्प संचालक आत्मा अनिल प्रमोद गवळी आदी उपस्थित होते.

 

एचटीबीटी बियाणाबाबत शेतकऱ्यांनी जागरूक असले पाहिजे. शेतकऱ्यांनी कुठल्याही अनधिकृत बियाण्याची पेरणी करता कामा नये. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव खरीप हंगामात टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी 1 जूननंतर पाण्याचा अंदाज घेवून कापूसाची पेरणी केली पाहिजे. सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता तपासणी करुन 100 मि.मि. पेक्षा जास्त पाऊस पडल्यानंतरच पेरणी केली करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

कृषी विभागातर्गत असलेल्या सर्व जिल्हास्तरीय  तालुकास्तरीय भरारी पथकामार्फत कृषि सेवा केंद्राची खरीप हंगामात वेळोवेळी तपासणी करुन शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

कृषि विकास अधिकारी यांनी जिल्हयातील रासायनिक खते  बियाणे यांच्या खरीप हंगाम दृष्टीने मागणी आवंटन  शिल्लक बाबतीत सादरीकरण केले. तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी खरीप हंगाम पूर्वतयारी बैठकीचे सादरीकरण करून खरीप हंगामामधील विषयावर सविस्तर माहिती दिली.

0000

वृत्त क्रमांक   स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त नांदेडसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे •‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ मोहिमे...