Monday, May 11, 2026

वृत्त क्रमांक 

गोसीखुर्दच्या मुख्यअभियंता पदी 

अजय दाभाडे यांची नियुक्ती

नांदेड दि. ११ मे : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांची गोसीखुर्द प्रकल्पाच्या मुख्य अभियंता पदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने नुकतेच याबाबत आदेश जारी केले आहेत. दाभाडे यांनी यापूर्वी विविध सिंचन प्रकल्पांवर काम केले असून त्यांना प्रशासकीय आणि तांत्रिक अनुभव आहे.

अजय दाभाडे यांनी नांदेड पाटबंधारे मंडळात अधीक्षक अभियंता म्हणून काम केले आहे. विविध मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. गोसीखुर्द प्रकल्प हा विदर्भातील महत्त्वाचा प्रकल्प मानला जात असून, या प्रकल्पाकडून शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या अपेक्षा जोडल्या गेल्या आहेत.

याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट ' असणाऱ्या वैनगंगा -नळगंगा नदी जोड प्रकल्पाची जबाबदारी ही त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.त्यामुळे या प्रकल्पाच्या गतीशील अंमलबजावणीची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे.

नागपूर येथील सिंचन भवनातील कार्यालयात ते सध्या रुजू झाले आहे.विविध प्रकल्पातील अपूर्ण कामे पूर्ण करणे, कामांना गती देणे आणि सिंचन क्षमता वाढविणे हे दाभाडे यांच्यासमोरील प्रमुख आव्हान असणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे गोसीखुर्द प्रकल्पाच्या कामांना अपेक्षित गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

000000



सोमनाथ मात्र एक मंदिर नहीं बल्कि भारत की अटूट श्रद्धा और एकता का प्रतीक है। एक हजार वर्षों के विध्वंस ने भी इसकी महत्ता और इसके प्रति आस्था को कभी नहीं डिगने दिया। महादेव के 12 ज्योतिर्लिंगों में से सोमनाथ प्रथम है, और भारतीयों की अटूट आस्था के एक हजार वर्षों की स्मृति और 1951 में हुई प्राण प्रतिष्ठा के 75 वर्षों के अवसर पर देश भर में सोमनाथ स्वाभिमान पर्व मनाया जा रहा है। जिसके तहत विभिन्न कार्यक्रम जैसे भजन संध्या, कलश यात्रा, ॐकार मंत्र का जाप आदि आयोजित किये जा रहे हैं। आप सभी इन कार्यक्रमों में अपनी भागीदारी सुनिश्चित करें और अपनी संस्कृति और परंपराओं पर गर्व करें।

अधिक जानकारी के लिए क्लिक करें:
🔗



वृत्त क्रमांक 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड दि. 11 मे : नांदेड जिल्ह्यात 12 मे च्या सकाळी 6 वाजेपासून ते 26 मे 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 12 मे च्या सकाळी 6 वाजेपासून ते 26 मे 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल.  

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

वृत्त क्रमांक  गोसीखुर्दच्या मुख्यअभियंता पदी  अजय दाभाडे यांची नियुक्ती नांदेड दि. ११ मे : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील अधीक्षक अ...