Saturday, May 9, 2026

 #सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते..



 

 सोमनाथ वारसा ७५ वर्षांचा…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही पवित्र भूमी भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाची गौरवशाली साक्ष देत आहे.
या सुवर्णक्षणाचे साक्षीदार बना…
🗓️ दि. ८ ते ११ मे २०२६
📍 श्री सोमनाथ मंदिर संकुल, प्रभास पाटण







सोमनाथ हे केवळ मंदिर नसून भारताच्या अखंड श्रद्धेचे, आत्मविश्वासाचे आणि पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचे जिवंत प्रतीक आहे. 'विकास आणि वारसा' या भावनेतून देशातील आध्यात्मिक स्थळांचे जतन करत आधुनिकतेशी साधलेला समन्वय हा नवभारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा प्रेरणादायी अध्याय आहे. सोमनाथ मंदिराच्या पुनरुज्जीवनाला 75 वर्षे पूर्ण होत असताना, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मांडलेली 'सोमनाथ - 'विध्वंस' ते 'सृजना'च्या प्रवासाची कहाणी' नक्की वाचा.







 सोमनाथ स्वाभिमान महोत्सव - हजारो वर्षांची अतूट श्रद्धा,अदम्य साहस आणि राष्ट्रस्वाभिमानाचा उत्सव!

तुटून पडूनही पुन्हा पुन्हा उठणं - ही सोमनाथची अजरामर भावना आहे.
8 ते 11 मे 2026 - कलश यात्रा, भजन संध्या, ओंकार मंत्र उच्चारण आणि बरच काही!
आपण पण आपला सहभाग निश्चित करा.
अधिक माहितीसाठी क्लिक करा : 🔗 amritkaal.nic.in/somnath-swabhiman-parv

वृत्त क्रमांक 

जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा दौरा 

नांदेड दि. 9 मे :- जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) व सदस्य ललित गांधी हे रविवार 10 मे 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

रविवार 10 मे 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून खाजगी वाहनाने मध्यरात्री 2 वा. नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सकाळी 9 वा. जैन श्वेतांबर मंदिर नांदेड येथे दर्शनार्थ भेट. सकाळी 9.30 वा. शासकीय वाहनाने उमरी रेल्वे स्टेशनकडे प्रयाण व जैन मंदिर दर्शन. सकाळी 11 वा. पुरातन जैन मंदिर जुन्नी येथे सदिच्छा भेट. दुपारी 12 वा. धर्माबाद जैन मंदिर येथे सदिच्छा भेट. दुपारी 2 वा. धर्माबाद येथून नांदेड शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सायं. 5 वा. सकल जैन समाज आयोजित सन्मान समारोह उपस्थिती स्थळ- नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. रात्री 10 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथून मुंबईकडे प्रयाण करतील.

00000



 "साहेब… मुलगी पास झाली हो… तिला ३५% पडले…"

दुपारचे साधारण बारा वाजले असतील…
मोबाईलची रिंग वाजली…
दोन दिवसांपूर्वी पक्ष्यांसाठी छोटासा पाणवठा तयार करत असताना मोबाईल चुकून पाण्याच्या बादलीत पडल्यामुळे तात्पुरत्या दुसऱ्या मोबाईलमध्ये सिमकार्ड टाकले होते. त्यामुळे नंबर सेव्ह नव्हता… अनोळखी नंबर दिसला.

फोन उचलला…

तिकडून एका वडिलांचा थरथरता पण आनंदाने भरलेला आवाज आला…

"आहो साहेब… माझी मुलगी पास झाली… तिला ३५% पडले…"

क्षणभर मीही शांत झालो…
त्या वडिलांच्या आवाजातला आनंद शब्दांच्या पलीकडचा होता.
माझ्याही चेहऱ्यावर नकळत हास्य उमटलं…
मी त्या वडिलांचं अभिनंदन केलं आणि म्हणालो,

"मी स्वतः गावात येऊन मुलीला पेढे देऊन अभिनंदन करणार…"

कारण त्या ३५% मागे फक्त गुण नव्हते…
तर एका मुलीचं आयुष्य उभं राहिलं होतं…
एका वडिलांची जिद्द होती…
आणि शिक्षणाकडे पुन्हा वळलेलं एक कोवळं मन होतं…

---

मी वनरक्षक म्हणून नांदेड वनविभागात कंधार तालुक्यात कार्यरत असताना एका रात्री परिसरात बिबट दिसल्याची अफवा मोठ्या प्रमाणात पसरली होती.
नंदनवन शेतशिवारातून अनेक फोन येत होते.
रात्र खूप झाल्यामुळे शोधमोहीम थांबवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शोध सुरू केला.

एका महिलेने मोठ्या पराठीच्या शेताकडे बोट दाखवत सांगितलं,

"आवाज इकडून येतोय…"

आम्ही अत्यंत सावधपणे पुढे गेलो.
परंतु तिथे बिबट नव्हता…
एक रानडुक्कर आपल्या पिलांसोबत होती. माणसांची चाहूल लागताच ती मोठ्याने आवाज करत होती.
अफवा खोटी असल्याचं स्पष्ट झालं.

काम संपलं…
मी जवळच्या एका भोकराच्या झाडाखाली सावलीत बसलो.

तेवढ्यात माझं लक्ष बाजूच्या हळदीच्या शेताकडे गेलं…

एक साधारण नववी-दहावीतली मुलगी उन्हात हळदीला पाणी देत होती.

मी जवळच्या व्यक्तीकडे तिच्याबद्दल विचारलं.
त्यांनी तिच्या वडिलांना आणि त्या मुलीला बोलावलं.

मी विचारलं,

"शाळा सुरू असताना तू शेतात काय करतेस?"

वडील शांतपणे म्हणाले,

"साहेब… ही माझी मुलगी. शाळेत जात नाही. हिचं मन शेतीतच रमलंय. घरची सगळी शेतीची कामं हीच करते…"

मी त्या मुलीकडे पाहिलं.

ती डोळे खाली घालून म्हणाली,

"मला अभ्यास जमत नाही… अधूनमधून शाळेत गेल्यावर अभ्यास मागे राहतो… मुलं हसतात… म्हणून मी शाळेत जात नाही…"

त्या निरागस शब्दांनी मन सुन्न झालं…

एक मुलगी…
जिच्या हातात पुस्तकं असायला हवी होती…
ती लहान वयात शेतात अवजड कामं करत होती…

त्या दिवशी मी जवळपास दोन तास त्या वडिलांशी आणि मुलीशी शिक्षणाबद्दल बोलत राहिलो.

मी वडिलांना विनंती केली,

"आजपासून मुलीला शेतात कामाला लावू नका…
तिला शाळेत जाऊ द्या…
शिक्षण हेच तिचं खरं आयुष्य बदलणार आहे…"

वडील म्हणाले,

"साहेब… जर ही शिकणार असेल तर मी तिला कधीच शेतात कामाला लावणार नाही…"

मुलीचं मनही त्या दिवशी हललं होतं…

ती म्हणाली,

"मी अभ्यास करेन… आणि दहावी पास होऊन दाखवेन…"

त्या दिवशी एका भोकराच्या झाडाखाली फक्त संवाद झाला नव्हता…
तर एका मुलीच्या आयुष्याला नवं वळण मिळालं होतं…

---

त्यानंतर मी त्या गावातील एका व्यक्तीमार्फत सतत चौकशी करत राहिलो.
मुलगी शाळेत जाते का…?
वडील पुन्हा शेतात कामाला पाठवतात का…?

आणि हळूहळू बातम्या यायला लागल्या…

"साहेब… मुलगी आता रोज शाळेत जाते…"

"साहेब… वडील आता तिला शेतात पाठवत नाहीत…"

हे ऐकून मनाला समाधान मिळत होतं.

आणि आज…

त्या मुलीने कॉपीमुक्त वातावरणात स्वतःच्या मेहनतीवर दहावी उत्तीर्ण होऊन दाखवलं…

कुणाला ३५% कमी वाटतील…
परंतु ज्यांनी संघर्ष जवळून पाहिला आहे त्यांना माहिती आहे —

हे ३५% म्हणजे एका मुलीच्या आत्मविश्वासाचा विजय आहे…
शाळाबाह्य आयुष्यातून शिक्षणाच्या प्रवाहात परत येण्याचा विजय आहे…
एका बापाच्या बदललेल्या विचारांचा विजय आहे…

आज ती मुलगी फक्त पास झालेली नाही…
तर ती स्वतःवर विश्वास ठेवायला शिकली आहे.

---

समाजात अजूनही अनेक मुली आहेत…

ज्यांच्या हातात वहीऐवजी विळा आहे…
ज्यांच्या डोळ्यांत स्वप्नं आहेत पण परिस्थिती त्यांना शाळेपासून दूर नेत आहे…
काही मुली अभ्यासात मागे पडतात…
काहींची चेष्टा होते…
काहींना घरची जबाबदारी थांबवते…

पण प्रत्येक मुलीमध्ये क्षमता आहे…

फक्त तिला कुणीतरी समजून घेणारं मन हवं…
थोडासा आधार हवा…
थोडी प्रेरणा हवी…
आणि विश्वास हवा की —

"तू करू शकतेस…"

---

त्या मुलीचे आणि तिच्या वडिलांचे मनापासून अभिनंदन…
कारण त्यांनी परिस्थितीसमोर हार मानली नाही.

आज त्या मुलीने ३५% मिळवले…
उद्या ती अधिकारी सुद्धा होऊ शकते…
कारण गुणांपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे —
स्वतःवरचा विश्वास आणि पुन्हा उभं राहण्याची हिंमत…

ही कथा प्रत्येक शाळाबाह्य मुलीपर्यंत पोहोचली पाहिजे…
जेणेकरून प्रत्येक मुलगी स्वतःला म्हणेल —

"मीही शिकेन…
मीही उभी राहीन…
आणि माझं भविष्य मी स्वतः घडवेन…" 🌿
🙏🌳📚

शिवसांब घोडके
वनरक्षक वनविभाग नांदेड
दररोज एक रोप लागवड चळवळ



 सोमनाथ वारसा ७५ वर्षांचा…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही पवित्र भूमी भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाची अभिमानाने घोषणा करत आहे.
या सुवर्णक्षणाचे साक्षीदार बना…
🗓️ दि. ८ ते ११ मे २०२६
📍 श्री सोमनाथ मंदिर संकुल, प्रभास पाटण



महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, ११ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता मुंबई येथील श्री धाकलेश्वर मंदिर, महालक्ष्मी कंपाऊंड, भुलाभाई देसाई रोड, मुंबई येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात प्रसिद्ध कलाकार शुभदा वराडकर यांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून, भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरेचा समृद्ध आविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे. ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ अंतर्गत आयोजित करण्यात येणारा हा कार्यक्रम श्रद्धा, संस्कृती आणि राष्ट्रीय अस्मितेचा संदेश देणारा ठरणार आहे.
हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा गौरव आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.



पिछले एक हजार वर्षों में सोमनाथ मंदिर पर अनेक आक्रमण हुए और हर बार श्रद्धालुओं की अटूट आस्था, त्याग और बलिदान ने इसका पुनर्निर्माण किया। आज़ा...