Monday, June 2, 2025

वृत्त क्रमांक 566

किनवट, इस्लापूर भागाकडे अधिक लक्ष देऊ 

-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

नांदेड दि. 2 जून : महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून सामान्य माणसाची कामे करणे आमची जबाबदारी असून अतिदुर्गम भागातील बंजारा, आदिवासी बहुल भाग असलेला इस्लापूर किनवटकडे अधिक लक्ष देणार असल्याची ग्वाही राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.  हुडी येथील शेतकऱ्यांच्या संवाद कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.

आज किनवट तालुक्यातील इस्लापूर भागात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा दौरा होता. सर्वप्रथम त्यांनी इस्लापूर वनविभागाच्या कार्यालयाला भेट देऊन याठिकाणी वृक्षारोपण त्यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर त्यांनी नांदेड जिल्हयातील पर्यटन स्थळ असलेल्या सहस्रकुंड धबधबा येथे महादेवाचे मंदिराचे दर्शन घेऊन धबधबा परिसराची पाहणी केली. यावेळी ट्रस्ट व वाळकी ग्रामपंचायतच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर इस्लापूर परिसरातील वन्य प्राण्याचे प्रसिद्ध ठिकाण असलेल्या हरण खरबा वरील वन्य प्राण्याची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर हुडी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला.

00000










 “भारत गौरव ट्रेन - छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” द्वारे पर्यटकांनी ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा-विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

छत्रपती संभाजीनगर विभागाचा आयुक्तांकडून जिल्हानिहाय आढावा

छत्रपती संभाजीनगर, दि.2 : भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरटीसीटी) ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' या एका विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. ही यात्रा 'भारत गौरव टुरिस्ट ट्रेन' अंतर्गत 9 जून 2025 पासून सुरू होत आहे. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांनी अनुभव घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. 

विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी आज दूरदृष्य प्रणालीव्दारे आढावा घेतला. यावेळी छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रेल्वे विभागाचे अधिकारी श्री गुरूराज सोना यांच्यासह बैठकस्थळी अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, नगरविकास विभागाचे देविदास टेकाळे उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. पापळकर म्हणाले, 'भारत गौरव टुरिस्ट ट्रेन' च्या या पाच दिवसांच्या विशेष प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून या यात्रेदरम्यान गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटकांना आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी ऐतिहासिक उपक्रमासाठी चांगली तयारी केली आहे. भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे.

यात्रेदरम्यान, सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी महामंडळाचे अधिकारी आयआरटीसीटीच्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील. पाच दिवसांच्या या प्रवासात रेल्वे स्थानकांपासून ते गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना समृद्ध अनुभव दिला जाईल. प्रत्येक गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्यात येणार आहे. 

यावेळी रेल्वेसह निवासी उपजिल्हाधिकारी, महानगरपालिका तसेच सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

0000






 वृत्त क्रमांक 565

हिमायतनगर-उमरी येथे शुक्रवारी

“शिवराज्यभिषेक” दिवस होणार साजरा 

नांदेड दि. 2 जून :- महर्षी कपील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिमायतनगर व संतकवी दासगणू शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरी येथे शुक्रवार 6 जून 2025 रोजी सकाळी 10 वा. “शिवराज्यभिषेक” दिवस साजरा करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यामध्ये चांगले विचार रूजविण्यासाठी पंचपरिवर्तनवर आधारीत नागरीक कर्तव्य आणि शिष्टाचार या विषयावर हिमायतनगर येथे कमलाकर दिक्कतवार तर उमरी येथे मारोती संबोड हे मार्गदर्शनपर प्रबोधन करणार आहेत. शहरातील विद्यार्थी, नागरीकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य जे. एल. गायकवाड यांनी केले आहे.

0000

वृत्त क्रमांक 564

अवैध वाळू उपसाबाबत तहसील कार्यालय नांदेडची कारवाई

नांदेड, दि. २ जून:- आज दिनांक २ जून 2025 रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, तहसीलदार  संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली  आज  सकाळी 05 वाजता तहसील कार्यालय नांदेडचे महसूल पथक यामध्ये नायब तहसीलदार स्वप्निल वामनराव  दिगलवार ग्राम महसूल अधिकारी रमेश गिरी ,मनोज सरपे ,दिलीप पवार ,माधव पाटील , गोपीनाथ कल्याणकर मंडळ अधिकारी राजेंद्र शिंदे तसेच महसूल सेवक बालाजी सोनटक्के यांच्यासोबत मार्कंड येथील गोदावरी नदीपत्रात गस्त करत असताना दोन वाळू उपसा करणारे इंजिन व आठ तराफे आढळून आले. 

पथकाने आठ तराफे जाळून नष्ट केले व दोन इंजिन जप्त करून तहसील कार्यालयाच्या परिसरात जमा करण्यात आले आहेत.या कारवाई मध्ये ११ लक्ष रुपयाची इंजिन व तराफे जप्त करण्यात आले आहेत .सदर कारवाईच्या वेळी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे एसआय गवळी हे उपस्थित होते. वाळू उपसा करणाऱ्या इंजिन मालकांबाबत माहिती मिळू शकली नाही. मालकाचा शोध लागताच याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे अशी माहिती तहसीलदार संजय वारकड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

००००००

वृत्त क्रमांक 563

औद्योगि‍क प्रशिक्षण संस्थेत शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत प्रवेश प्रक्रीया सुरु

प्रवेश इच्छूक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. जून श्री गुरु गोबिंदसिघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme)ऑगस्ट-2025 सत्रासाठीची प्रवेश प्रक्रिया 15 मे 2025 पासुन ऑनलाईन सुरु करण्यात आलेली आहे. येथे प्रवेश घेणाऱ्या इच्छूक उमेदवारांनी www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज  प्रवेश शुल्क भरावेत. नंतर नजीकच्या शासकीय किंवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन अर्ज निश्चीत करणे आवश्यक आहेअर्ज निश्चीतीकरण केल्यानंतरच उमेदवारांना व्यवसायाची निवड करता येणार आहे.

 

तरी नांदेड जिल्हयातील युवक  युवती ( उमेदवारांनी ) यांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज  निश्चितीकरण करावे, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एसव्हीसुर्यवंशी यांनी केले आहे.

 

श्री गुरु गोबिंदसिघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे प्रवेश सत्र ऑगस्ट 2025 साठी एकुण 23 व्यवसायाच्या 40 तुकडया अंतर्गत 864 जागा करीता प्रवेश उपलब्ध आहेतज्यामध्ये 8 व्यवसाय 10 वी उत्तीर्ण / अनुत्तीर्ण पात्रतेवर तर 15 व्यवसाय 10 वी उत्तीर्ण पात्रतेवर प्रवेशासाठी उपलब्ध आहे.

 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme)  ऑगस्ट-2025 सत्रासाठीची प्रवेश प्रक्रिया 15 मे 2025 पासुन  ITI Admission Portal: https://admission.dvet.gov.in या  संकेतस्थळावर सुरु करण्यात आलेली आहेयासाठी दहावी उत्तीर्ण अथवा अनुर्तीर्ण इच्छुक विद्यार्थी अर्ज करु शकतातऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दती  माहीती पुस्तीका ऑनलाईन स्वरुपात संकेतस्थळावर Download Section मध्ये पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहेविद्यार्थ्यांनी अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा  त्यानंतर विकल्प सादर करावेप्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये समुपदेशन करण्यात येत आहेयामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते.

 

राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये एकुण 83 प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांची एकुण वार्षिक प्रवेश क्षमता जवळपास एक लक्ष ऐवढी आहेयेणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये जादा मागणीचे तसेच धिकचे तंत्रज्ञानावर आधारित 652 नवीन अभ्यासाच्या तुकडया समाविष्ठ करण्याचे प्रस्तावित आहेतसेच जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्था धुनिकरण करण्यात येत आहेतसेच आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात वाढ करण्यात आलेली आहेविविध प्रवर्गात उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजनाही लागु करण्यात आलेली आहेदहावी अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता  करण्यात येते. तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येतेतरी दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांन आयटीआय मधुन व्यवसायिक शिक्षण पुर्ण करु त्वरित रोजगार स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआय मध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

  वृत्त क्रमांक 562

आयआरसीटीसी भारत गौरव टूरिस्ट ट्रेनद्वारे छत्रपती शिवाजी महाराज सर्किटवर हेरिटेज टूर

रायगड किल्लापुणे (लाल महालकसबा गणपती आणि शिवसृष्टी)शिवनेरी किल्लाभीमाशंकर ज्योतिर्लिंगप्रतापगड किल्ला आणि कोल्हापूर (महालक्ष्मी मंदिर आणि पन्हाळा किल्ला) कव्हर करण्यासाठी आयआरसीटीसीची खास टूर ऑफर

बहुचर्चित ट्रेन टूर "छत्रपती शिवाजी महाराज सर्किट टूर" 09 जून रोजी निघण्यासाठी सज्ज

05 रात्री आणि 06 दिवसांचा हा प्रवास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनपासून सुरू

अत्याधुनिक भारत गौरव एसी टुरिस्ट ट्रेन ज्यामध्ये स्लीपरएसी - 2 टियर आणि एसी 3 टियर कोच आहेत आणि एकूण 748 पर्यटकांना सामावून घेण्याची क्षमता

या टुरिस्ट ट्रेनमध्ये दादर आणि ठाणे रेल्वे स्टेशनवरूनही पर्यटक चढू शकतात

नांदेड दि. 2 जून :- आयआरसीटीसी पहिला हेरिटेज टूर 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' वर चालवण्यास सज्ज आहे. ज्यामध्ये मराठा राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या स्थळांचा समावेश आहे. हा टूर एकूण 5 रात्री व 6 दिवसांचा प्रवास आहे. पर्यटकांनी व नागरिकांनी अधिक तपशिलांसाठीआयआरसीटीसी वेबसाइटला भेट द्या. https://www.irctctourism.com/bharatgauravआणि बुकिंग वेब पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर ऑनलाइन उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी, 8287931886 वर आयआरसीटीसी शी संपर्क साधू शकता.

नावाप्रमाणेच06 दिवसांचा हा प्रवास कार्यक्रम पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पासून कोकण रेल्वे नेटवर्कवरील माणगाव रेल्वे स्टेशनसाठी सुरू होणार आहे. जो रायगड किल्ल्यासाठी सर्वात जवळचा रेल्वे दुवा आहे. पहिले गंतव्यस्थान रायगड आहेजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक किंवा राज्याभिषेक झालेल्या डोंगरी किल्ल्यासाठी ओळखले जाते आणि नंतर तेथून त्यांनी राज्य केले तेथून त्यांची राजधानी बनले. प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यानंतरपर्यटक पुन्हा ट्रेनमध्ये परततील आणि पुढील गंतव्यस्थान पुणे येथे जातील जिथे पर्यटक जेवण करतील आणि त्यानंतर पुण्यातील हॉटेलमध्ये रात्रीचा मुक्काम करतील.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यटक पुण्यातील लाल महालकसबा गणपती आणि शिवसृष्टी ही प्रमुख ठिकाणे पाहणार आहेत. नावाप्रमाणेच लाल महाल हा छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी भोसले यांनी ई.1630 मध्ये त्यांच्या पत्नी जिजाबाई आणि मुलासाठी बांधलेला लाल रंगाचा राजवाडा आहे. सध्याची ही वास्तू 1984 मध्ये लाल महाल असलेल्या जमिनीच्या एका भागात पुन्हा बांधण्यात आली आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचे वर्णन करणारे तैलचित्रांचा एक विशाल संग्रह आहे. पुण्याचे प्रमुख दैवत असलेल्या कसबा गणपतीचे मंदिर ई.स.1893  चे आहे आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांनी बांधले असल्याचे मानले जाते. तेव्हापासूनहे शहर गणेशाचे शहर म्हणून ओळखले जाते. नंतरपर्यटक शिवसृष्टीला भेट देतील - छत्रपती शिवाजी महाराजांच्या आख्यायिकेचे प्रदर्शन करणारे सर्वात मोठे ऐतिहासिक थीम पार्क. पर्यटक मराठा शासकाची जीवनकथा 3D मध्ये पाहतील आणि इतर संवादात्मक सत्रांचा आनंद घेतील.

पुण्यात रात्रीच्या विश्रांतीनंतर तिसऱ्या दिवशी पाहुणे पुणे शहरापासून 95 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवनेरी कडे प्रयाण करतील. शिवनेरी किल्ला जुन्नर शहराच्या कडेला टेकडीवर वसलेला आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आणि मराठा अभिमानाचे आणि मुस्लिम राजवटीच्या प्रतिकाराचे प्रतीक आहे. दुपारच्या जेवणानंतरपर्यटक रात्रीच्या मुक्कामासाठी पुण्याला परतण्यापूर्वी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराला भेट देतील.

प्रवासाच्या 4 थ्या दिवशीपर्यटक साताऱ्याच्या पुढील प्रवासासाठी ट्रेनमध्ये चढतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि विजापूर सल्तनतचा सेनापती अफझल खान यांच्यात . 1659  मध्ये झालेल्या प्रतापगडाच्या लढाईमुळे प्रतापगड किल्ला हा या स्थानकापासून कव्हर केला जाणारा प्रमुख स्थळ आहे. या लढाईने मराठा साम्राज्याच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली होती. भेटीनंतरपर्यटक योग्य ठिकाणी दुपारचे जेवण घेतील आणि या दौऱ्याच्या शेवटच्या गंतव्यस्थान कोल्हापूरला जाताना ट्रेनसाठी परत जातील.

ट्रेन 5 व्या दिवशी पहाटे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर रेल्वे स्थानकावर पोहोचेल. हॉटेलमध्ये धुणे आणि बदलणे आणि नाश्ता केल्यानंतरपर्यटक अंबाबाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी मंदिर आणि त्यानंतर पन्हाळा किल्ल्याकडे जातील. सह्याद्रीच्या माथ्यावर बसलेलाडोंगरी किल्ला अनेक लढायांचा दाखला देतो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी जवळून जोडलेला आहे. ज्यांनी 500 पेक्षा जास्त दिवस त्यांना कैदेत ठेवले होते आणि नंतर ते पळून गेले होते. पन्हाळा किल्ल्याला 'सापांचा किल्लाअसेही संबोधले जाते कारण तो आकाराने झिगझॅग आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन इतिहासाशी निगडीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती बाजी प्रभू देशपांडे यांनी किल्ला काबीज करण्याच्या लढाईत दाखवलेल्या शौर्याचे स्मरण केले जाते. संध्याकाळी उशिराट्रेन मुंबईसाठी परतीच्या प्रवासाला निघेन आणि सहाव्या दिवशी सकाळी मुंबईत पोहचेल. 

पॅकेजची आकर्षक किंमत रु. 13,155/- इकॉनॉमी (स्लीपर क्लास) मध्ये प्रति व्यक्तीकम्फर्ट (3AC) मध्ये प्रति व्यक्ती 19,840/- आणि रु. 27,365/- सुपीरियर (2AC) साठी प्रति व्यक्ती. सर्व श्रेणींमध्ये सर्व-समावेशक किमतीमध्ये संबंधित वर्गातील रेल्वे प्रवासआरामदायी हॉटेलमध्ये रात्रीचा मुक्कामसर्व जेवण (केवळ शाकाहारी)बसमध्ये सर्व हस्तांतरण आणि दर्शनप्रवास विमाटूर एस्कॉर्टच्या सेवा इत्यादींचा समावेश असेल. प्रवाशांना सुरक्षित आणि संस्मरणीय अनुभव देण्यासाठी आयआरसीटीसीकडून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील.

000000

  वृत्त     नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदांसाठी 1 ते 8 जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा   नांदेड, दि. 18 :   नोंदणी व मुद्रांक विभा...