Sunday, May 4, 2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना_समाज कल्याण विभाग #नांदेड






 

स्टँड अप इंडिया योजना_समाज कल्याण विभाग #नांदेड






 

वृत्त क्रमांक 469

जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून

विकास कार्य गतिमान करू :  खा. डॉ. अजित गोपछडे

नांदेड दि. 4 मे :- राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून सर्वसामान्यांचा विकास साधण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आगामी काळात विकास कामे पूर्ण होतील असा विश्वास खासदार अजित गोपछडे यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या नांदेड जिल्हा प्रशासन विकासकार्य आढावा बैठकीत खा. डॉ. गोपछडे बोलत होते. लोकांच्या अनेक प्रश्नांची माहिती घेऊन प्रशासनास अवगत केले. कडक उन्हाळ्यामुळे  नांदेड शहरातील आणि जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची सूचना केली.

ग्रामीण भागात सध्या खरीप हंगामाची पूर्व तयारी चालू झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून शेतकरी बांधवांना योग्य वेळी मदत व्हावी म्हणून जिल्ह्यातील मालगुजारी तलावातला गाळ तात्काळ काढावा यासाठी मनरेगा आणि लोकसहभागातून ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावेत.तसेच शहरी भागात नालेसफाई चे काम वेळेत पूर्ण करावेत. पावसाळ्यात वृक्षारोपण योजनेत सर्व वयोगटातील नागरिकांना सहभागी करावे. मातृवंदन योजना, आयुष्मान आरोग्य मंदिर, अंगणवाडी, आशा सेविकांचे प्रश्न सोडविणे, कुपोषण मुक्ती बाळासोबत आईची पण झाली पाहिजे, बालिका शिक्षण बसव्यवस्था दुरुस्त करावी, बालिका पंचायत व्यवस्थेस प्रोत्साहन देणे,पूण्यश्लोक अहिल्यादेवी त्रिशताब्दी निमित्त महिला सक्षमीकरण आणि सर्वांगीण उन्नती,  प्रधानमंत्री सूर्य घर  योजना, गोदावरी शुद्धिकरण, नांदेड शहरातील रहदारी समस्या उपाययोजना, आगामी 20 वर्षासाठी होलीसिटी सर्वांगीण विकास आराखडा, जिल्हा परिषद नवीन इमारत मिनी सचिवालय बांधकाम प्रस्ताव तयार करणे, जीर्ण झालेल्या पोलीस वसाहतींचे बांधकाम, आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन करणे, तरोडेकर चौक ते मुथा चौक फ्लायओवर तयार करणे, कैन्सर, मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल निर्माण, कायदा सुव्यवस्था याबाबतीत अनेक उपयुक्त दिशानिर्देश जिल्हाप्रशानास दिले.

खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी 100 दिवसीय प्रशासकीय मूल्यमापनात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त महेश डोईफोडे, अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराय  धरणे यांचे शाल देऊन विशेष अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय मुल्यांकनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व विभागांचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे देखील विशेष अभिनंदन केले.
000



 Startups in #WAVESummit



 डिजिटल माध्यमातून प्रचार प्रसिद्धीसाठी योग्य डेटा (माहिती) असणे आवश्यक असून जाहिरात प्रकियेत डेटा केंद्रबिंदू आहे. कोणत्याही प्रसिद्धी मोहिमेसाठी अचूक डेटा असणे महत्त्वाचे आहे. अचूक डेटा मिळविण्यासाठी शोध घेणे, योग्य नियोजन, योजना आणि मूल्यमापन आवश्यक आहे, असे ग्रुप एम साऊथ एशियाचे मुख्य धोरण अधिकारी एम. ए. पार्थसारथी यांनी सांगितले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'डाटा ड्रिव्हन इनसाईट अँड मेजरमेंट इन ऍडव्हर्टायझिंग' या विषयावर श्री. पार्थसारथी बोलत होते.

 सिनेमामध्ये एखाद्या विषयाची मांडणी करताना दिग्दर्शकाचा दृष्टिकोन जसा आहे, त्याच पद्धतीच्या फ्रेममधून दिग्दर्शक सिनेमा प्रेक्षकापर्यंत नेतो. आपल्या सिनेमातून नेमका काय संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे याची जबाबदारी दिग्दर्शक म्हणून खूप महत्त्वाची असते, असे प्रतिपादन रिची मेहता यांनी केले.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये आयोजित वेव्हज २०२५ दृकश्राव्य आणि मनोरंजन समिटमध्ये ‘बिहाइंड द फ्रेम : मास्टरिंग द आर्ट ऑफ द सिनेमा’ या विषयावर आयोजित मास्टरक्लासमध्ये रिची मेहता बोलत होते.

 समाजमाध्यमांतील इनफ्लुएंसर्सने स्वतःची खरी ओळख जपणे गरजेचे असल्याचे मत ‘बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग फॉर इन्फ्लुएंसर’ या परिसंवादात व्यक्त करण्यात आले.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित वेव्हज २०२५ दृकश्राव्य आणि मनोरंजन समिटमध्ये या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये सहभागी सहेली सिन्हा म्हणाल्या, इन्फ्लुएंसरने जबाबदारीने विविध ब्रँडसोबतची भागीदारी केली पाहिजे. ब्रँडसोबत केलेली भागीदारी ही केवळ जाहिरात करणे एवढेच नसून ती एक मोठी जबाबदारी आहे. कारण ग्राहक प्रभावी व्यक्तींवर विश्वास ठेवून त्यांनी जाहिरात केलेल्या गोष्टी विकत घेत असतात. त्यामुळे इन्फ्लुएंसरने स्वतः त्या गोष्टीची माहिती, अनुभव घेऊन मगच त्याबाबत इतरांना सांगण्याची पारदर्शकता जोपासणे आवश्यक आहे. जाहिरात करताना नेहमी अटी व शर्ती आणि त्या-त्या समाज माध्यमांचा वापर करण्यासाठीच्या सूचना, नियमावली पाळण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
शिबानी अख्तर यांनी समाजमाध्यमांतील इन्फ्लुएंसरने प्रामाणिकपणास महत्त्व द्यावे. प्रामाणिक कंटेंट दीर्घकाळ टिकतो आणि विश्वास निर्माण करतो. आरोग्यासारख्या संवेदनशील विषयांवर ब्रँडिंग करताना विशेष सतर्कता बाळगली पाहिजे, असेही यावेळी सांगितले.

 चित्रपट, मनोरंजन, गेमिंग, माध्यम अशा विविध क्षेत्रातील तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाने भारलेल्या ‘वेव्हज् 2025’ मधील निवडक क्षणचित्रे!

वृत्त क्रमांक 468

धाबा व सार्वजनिक ठिकाणी 

अवैधपणे मद्यसेवन करणाऱ्यांवर कारवाई  

नांदेड दि. 4 मे :- महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68, 84 व 85 अन्वये जिल्ह्यातील 35 धाब्यावरील 35 धाबाचालक, मालक, धाब्यावर अवैधपणे 116 मद्यपींवर व अनधिकृतरित्या सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या 21 मद्यपींवर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत नुकतीच कारवाई करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, राज्य उत्पादन शुल्कचे नांदेड विभागीय उपआयुक्त बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड रा.उ.शु. अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व कार्यकारी, भरारी पथकाचे  निरीक्षक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी 23 एप्रिल 2025 ते 3 मे 2025 या काळात केलेल्या कारवाईत 35 धाब्यामध्ये विनापरवाना तेथे येणाऱ्या ग्राहकांना मद्यसेवनास अवैध परवानगी देत असलेल्या धाब्यावर दारुबंदी गुन्हेकामी छापा घातला असता एकूण  116 ग्राहकांना मद्य पिण्याचे परवानगी दिल्याचे आढळून आल्याने या ठिकाणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 व 84 अन्वये गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली.

अनधिकृतरित्या सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या इसमांविरुद्ध 3 मे 2025 रोजी निरीक्षक, विभागीय भरारी पथक, निरीक्षक नांदेड शहर व निरीक्षक भरारी पथक यांनी शेतकरीपुतळा परिसर,  अशोकनगर, वर्कशॉप कॉर्नर परिसर, लातूरफाटा परिसर, जुनामोंढा परिसर व शिवाजीनगर परिसर येथे विशेष मोहिम घेण्यात आली होती. यात एकुण 21 इसमावर 3 मे 2025 रोजी महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे 85 अंतर्गत कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली  जिल्ह्यातील सर्व निरीक्षक, दु.नि., स.दु.नि. जवान, जवान-नि-वाहन चालक यांनी  कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली.

अधीक्षक अतुल कानडे यांचे आवाहन

महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 (क), (ख) अन्वये अवैध हॉटेल,धाबा,क्लब इत्यादी चालक मालक यांनी अवैध हॉटेल, धाबा, क्लब इत्यादीमध्ये शासनमान्य अनुज्ञप्ती नसताना ग्राहकांना मद्यसेवनास परवानगी दिल्यास त्यांना 3 ते 5 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा किंवा 25 ते 50 हजार रुपयापर्यंत दंड  किंवा दोन्ही होवू शकते. 

महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 84 अन्वये एखादी ग्राहक, व्यक्तीने अवैध हॉटेल, धाबा, क्लब इत्यादी ठिकाणी मद्यप्राशन केल्यास  त्यांना 5 हजार रुपयापर्यंत दंड होवू शकतो. महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 85 अन्वये सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन केल्यास त्यांना 6 महिन्यापर्यंत कारावासाची शिक्षा आणि 10 हजार रुपयापर्यंत दंड होऊ शकते. नागरीकांना कुठल्याही अवैध ढाब्यावर किंवा अवैध ठिकाणी दारु पितांना आढळून आल्यास ढाबा मालकासह मद्यसेवन करणाऱ्या इसमाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्रमांक   506   शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत  विभाग स्तरावर जिल्ह्यातील 6 कार्यालयांना प्रथम क्रमांक   द्वितीय क्...