वेव्हज परिषद - २०२५
दि. १ मे २०२५
वृत्त क्र. १
भारताच्या ‘जीडीपी’मध्ये
क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल
- प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी
वर्ल्ड ऑडिओ
व्हिज्युअल अॅन्ड एन्टरटेन्मेंट समिट - २०२५ (वेव्हज) चे
प्रधानमंत्री यांच्या
हस्ते शानदार उद्घाटन
मुंबई, दि.
१ : भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंट, क्रिएटिविटी
आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा काही वर्षांत ‘जीडीपी’मध्ये
(सकल देशांतर्गत उत्पन्न) मोठा वाटा असेल. जगातील अॅनिमेशन मार्केट ४३० अब्ज
डॉलरहून अधिक असून पुढील १० वर्षांत ते दुप्पट होणार असल्याचे मानले जाते.
भारताच्या अॅनिमेशन आणि ग्राफिक्स इंडस्ट्रीसाठी वेव्हज परिषदेमुळे यशाचे दार उघडले जात असल्याचे प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
वर्ल्ड
ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात ‘वेव्हज’ परिषदेचे
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ
वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, रेल्वे, माहिती
व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, परराष्ट्र व्यवहार मंत्री
एस.जयशंकर, माहिती प्रसारण राज्यमंत्री
डॉ.एल.मुरुगन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित
पवार यांच्यासह देशविदेशातील मान्यवर उपस्थित होते.
भारतीय
चित्रपट आता जगभरात सर्वदूर पोहोचले आहेत. आज १०० पेक्षा अधिक देशांमध्ये भारतीय
चित्रपट प्रदर्शित होतात. परदेशातील प्रेक्षक भारतीय चित्रपट केवळ बघत नाहीत, तर
त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अनेक विदेशी प्रेक्षक आता सबटायटल्ससह
भारतीय कंटेंट पाहतात हे भारतीय सिनेमाचे वैशिष्ट्य आहे. भारत आज फिल्म प्रॉडक्शन, डिजिटल
कंटेंट, गेमिंग, फॅशन
आणि म्युझिक यांचे जागतिक केंद्र बनले असल्याचे श्री.मोदी यांनी यावेळी सांगितले.
मानवाला यंत्र न बनू
देता अधिक समृद्ध आणि संवेदनशील बनवणे गरजेचे - नरेंद्र मोदी
आपल्याला
माणसाला यंत्र बनू द्यायचे नाही, तर त्याला अधिक समृद्ध आणि
संवेदनशील बनवायचे आहे. माणसाची प्रगती केवळ माहिती, तंत्रज्ञान
किंवा वेगाच्या जोरावर मोजता येणार नाही तर त्यासाठी संगीत, कला, नृत्य
यांना सुद्धा महत्त्व द्यावे लागेल, असे
प्रतिपादन प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी केले. क्रिएटिव्ह व्यक्ती त्यांच्यातील
ऊर्जा आणि कार्यक्षमतेद्वारे आपल्यातील सर्जनशीलतेच्या क्रांतीला नव्याने आकार देऊ
शकतात, असा विश्वास
व्यक्त करून जागतिक पातळीवरील
क्रिएटिव्ह लोकांनी भारताला सर्जनशीलतेचे केंद्र बनविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आज
जग नवीन पद्धतीने कथा, संकल्पना सांगण्याचा मार्ग
शोधत आहे. अशा वेळी भारताकडे हजारो वर्षांचा जागतिक स्वरूपाचा कथा, संकल्पनांचा
अमूल्य ठेवा असल्याचा उल्लेख प्रधानमंत्री मोदी यांनी केला. या खजिन्याला जगाच्या
कानाकोपऱ्यात पोहोचवणे आणि येणाऱ्या पिढीसमोर त्याचे सादरीकरण नव्या व रंजक
पद्धतीने करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भारत सर्जनशील
महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
करमणूक
क्षेत्र हे महाराष्ट्र आणि भारतासाठी विकासाचे नवे इंजिन आहे. आजच्या डिजिटल युगात, आशय
(कंटेंट) कोणत्याही वस्तूपेक्षा वेगाने प्रवास करतो.या सगळ्यात महाराष्ट्र या
क्रांतीच्या अग्रस्थानी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी
सांगितले. भारत आता सर्जनशील महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. वेव्हज
परिषद हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर ही एक चळवळ असून प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून ही महाराष्ट्रात साकार होत असल्याचे ते म्हणाले.
आज
डिजिटल आशय, संगीत, अॅनिमेशन, गेम्स
याला जागतिक स्तरावर आकार दिला जात आहे. राज्य शासन या परिवर्तनाला पोषक वातावरण
तयार करत असून यासाठी सक्षम धोरण राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री
श्री.फडणवीस म्हणाले की, ५०० एकर क्षेत्रफळ असलेली
मुंबईतील चित्रपट नगरी आता पुढील पिढीच्या स्टुडिओ इकोसिस्टमसाठी जागतिक केंद्र
म्हणून विकसित केली जात आहे. यातील १२० एकरमध्ये माध्यम व करमणूक शहर उभारण्यात
येऊन यात अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि
गेमिंगवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबईत साकारणार
आयआयसीटी - माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
भारतात
पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT)
मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी
केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या संस्थेच्या स्थापनेसाठी गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट
आणि ॲडोबी सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे. वेव्हज या
व्यासपीठाच्या माध्यमातून भारत सर्जनशील उद्योगजगताच्या जागतिक केंद्रस्थानाच्या
दिशेने वाटचाल करीत असल्याचे रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
यांनी स्वागतपर भाषणात सांगितले.
अभिनेते
अनुपम खेर यांनी प्रस्तावनेद्वार वेव्हज आयोजनाचा उद्देश सांगितला. एम.एम.किरवाणी, श्रेया
घोषाल, मांगली यांनी स्वागत गीत सादर केले. तर, वेव्हज
सल्लागार मंडळाचे सदस्य मोहनलाल, हेमामालिनी, कार्तिक
आर्यन, एस.एस.राजामौली, रजनीकांत, अनिल
कपूर, भूमी पेडणेकर, रणबीर
कपूर, आमिर खान, रिलायन्स
इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, अडोबी
चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु नारायण आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी
गुरुदत्त, श्रीमती पी.भानुमती, राज
खोसला, ऋत्विक घटक, सलील
चौधरी यांच्या भारतीय सिनेमा मधील योगदानाच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
000
संजय ओरके/विसंअ/
भारत की GDP में क्रिएटिव इकोनॉमी की बड़ी
भागीदारी होगी
– प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
वर्ल्ड ऑडियो विजुअल एंड एंटरटेनमेंट समिट 2025 (WAVES) का प्रधानमंत्री द्वारा भव्य उद्घाटन
मुंबई, 1 मई:
भारत की ऑरेंज इकॉनॉमी तीन प्रमुख स्तंभों – कंटेंट, क्रिएटिविटी और कल्चर – पर आधारित है। आने वाले
वर्षों में भारत की क्रिएटिव इकॉनॉमी का देश की GDP में बड़ा
योगदान होगा। विश्व का एनीमेशन मार्केट वर्तमान में 430 अरब
डॉलर से अधिक का है और अगले 10 वर्षों में इसके दोगुना होने
की संभावना है। WAVES सम्मेलन भारत की एनीमेशन और ग्राफिक्स
इंडस्ट्री के लिए सफलता के नए द्वार खोलेगा, ऐसा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा।
मुंबई के जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर में आयोजित समारोह में प्रधानमंत्री
मोदी ने वर्ल्ड ऑडियो विजुअल एंड एंटरटेनमेंट समिट 2025 (WAVES) का भव्य उद्घाटन किया। इस अवसर पर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री
अश्विनी वैष्णव (रेलवे व सूचना एवं प्रसारण), एस. जयशंकर
(विदेश मंत्री), डॉ. एल. मुरुगन (राज्यमंत्री), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे और अजीत पवार सहित देश-विदेश के अनेक गणमान्य
अतिथि उपस्थित थे।
भारतीय फिल्में अब
विश्वभर के दर्शकों तक पहुँच चुकी हैं। आज 100 से अधिक देशों में भारतीय
फिल्में प्रदर्शित होती हैं। विदेशी दर्शक केवल फिल्में नहीं देख रहे हैं, बल्कि उन्हें समझने का प्रयास भी कर रहे हैं। अब कई विदेशी दर्शक सबटाइटल
के साथ भारतीय कंटेंट देख रहे हैं – यही भारतीय सिनेमा की
विशेषता है। आज भारत फिल्म प्रोडक्शन, डिजिटल कंटेंट,
गेमिंग, फैशन और संगीत का वैश्विक केंद्र बन
चुका है, ऐसा श्री मोदी ने कहा।
इंसान को मशीन न बनने देकर उसे और संवेदनशील
बनाना जरूरी – पीएम मोदी
"हमें
इंसान को मशीन नहीं बनने देना है, बल्कि उसे और समृद्ध और
संवेदनशील बनाना है," प्रधानमंत्री ने कहा। इंसानी
प्रगति केवल सूचना, तकनीक या गति से नहीं मापी जा सकती –
संगीत, कला और नृत्य को भी समान महत्व देना
होगा। रचनात्मक व्यक्ति अपनी ऊर्जा और कार्यक्षमता से रचनात्मक क्रांति को नया
आकार दे सकते हैं। उन्होंने वैश्विक रचनात्मक लोगों से भारत को रचनात्मकता का
केंद्र बनाने का आह्वान किया।
आज दुनिया नई तरह से
कहानियाँ और विचार प्रस्तुत करने के रास्ते खोज रही है। ऐसे समय में भारत के पास
हजारों वर्षों की कहानियों और विचारों का बहुमूल्य खजाना है। प्रधानमंत्री मोदी ने
इस खजाने को दुनिया के हर कोने तक पहुँचाने और आने वाली पीढ़ी के सामने उसे नवीन
और रोचक तरीके से प्रस्तुत करने का आह्वान किया।
भारत रचनात्मक महाशक्ति बनकर विश्व का नेतृत्व
करने को तैयार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस ने कहा कि मनोरंजन क्षेत्र महाराष्ट्र और भारत के लिए विकास का नया इंजन बन
रहा है। आज के डिजिटल युग में कंटेंट किसी भी वस्तु से तेजी से फैलता है और
महाराष्ट्र इस क्रांति की अगुवाई कर रहा है। WAVES केवल एक सम्मेलन नहीं,
बल्कि यह एक आंदोलन है, जो प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी की प्रेरणा से महाराष्ट्र में साकार हो रहा है।
उन्होंने कहा कि
डिजिटल कंटेंट,
संगीत, एनीमेशन, गेम्स
को वैश्विक स्तर पर नया स्वरूप मिल रहा है। राज्य सरकार इस परिवर्तन के लिए अनुकूल
वातावरण बना रही है और इसके लिए प्रभावी नीतियाँ लागू करेगी।
मुख्यमंत्री ने बताया
कि मुंबई की 500 एकड़ में फैली फिल्म सिटी को अब अगली पीढ़ी की स्टूडियो इकोसिस्टम के लिए
एक वैश्विक केंद्र के रूप में विकसित किया जा रहा है, जिसमें
से 120 एकड़ में मीडिया और एंटरटेनमेंट सिटी बनाई जाएगी
जिसमें एनीमेशन, विजुअल इफेक्ट्स और गेमिंग पर विशेष फोकस
होगा।
मुंबई में स्थापित होगा इंडियन इंस्टिट्यूट ऑफ
क्रिएटिव टेक्नोलॉजी – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव
भारत में पहली बार
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ क्रिएटिव टेक्नोलॉजी (IICT) मुंबई में स्थापित किया
जाएगा, जिसके लिए केंद्र सरकार ने 400
करोड़ रुपये मंजूर किए हैं। इस संस्थान की स्थापना में गूगल, एप्पल, माइक्रोसॉफ्ट और अडोबी जैसी वैश्विक कंपनियों
का सहयोग प्राप्त होगा। अश्विनी वैष्णव ने स्वागत भाषण में कहा कि WAVES मंच के माध्यम से भारत रचनात्मक उद्योग का वैश्विक केंद्र बनने की दिशा
में अग्रसर है।
अभिनेता अनुपम खेर ने WAVES आयोजन
के उद्देश्य को प्रस्तुत किया। एम.एम. कीरवाणी, श्रेया घोषाल
और मांगली ने स्वागत गीत प्रस्तुत किया। WAVES सलाहकार समिति
के सदस्य मोहनलाल, हेमा मालिनी, कार्तिक
आर्यन, एस.एस. राजामौली, रजनीकांत,
अनिल कपूर, भूमि पेडणेकर, रणबीर कपूर, आमिर खान, रिलायंस
इंडस्ट्रीज के अध्यक्ष मुकेश अंबानी, अडोबी के सीईओ शांतनु
नारायण आदि ने अपने विचार व्यक्त किए।
इस अवसर पर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने गुरुदत्त, श्रीमती पी. भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक और सलील चौधरी के भारतीय
सिनेमा में योगदान की स्मृति में डाक टिकटों का विमोचन किया।
0000
Creative Economy Will Have a
Major Share in India’s GDP
– Prime Minister Narendra Modi
Grand Inauguration of World Audio
Visual and Entertainment Summit 2025 (WAVES) by the Prime Minister
Mumbai,
May 1: India’s
Orange Economy stands on three strong pillars – content, creativity, and
culture. In the coming years, India’s creative economy will hold a significant
share in the country’s GDP. The global animation market is currently worth over
$430 billion and is expected to double in the next 10 years. The WAVES summit
will open new doors of success for India's animation and graphics industry,
said Prime Minister Narendra Modi.
Prime
Minister Modi inaugurated the World Audio Visual and Entertainment Summit 2025
(WAVES) in a grand ceremony held at the Jio World Convention Centre in Mumbai.
The event was attended by Governor C.P. Radhakrishnan, Chief Minister Devendra
Fadnavis, Union Ministers Ashwini Vaishnaw (Railways and I&B), S.
Jaishankar (External Affairs), Dr. L. Murugan (MoS I&B), Deputy Chief
Ministers Eknath Shinde and Ajit Pawar, and several national and international
dignitaries.
Indian
films have now reached audiences across the globe. Today, Indian films are
screened in more than 100 countries. Foreign audiences are not just watching
Indian films but also trying to understand them. A notable aspect of Indian
cinema is that many international viewers are watching Indian content with
subtitles. India has become a global hub for film production, digital content,
gaming, fashion, and music, Modi said.
We Must
Enrich Humanity Without Turning It into a Machine – PM Modi
"We
must not turn humans into machines; instead, we must make them more enriched
and sensitive," the Prime Minister said. Human progress cannot be measured
solely by information, technology, or speed — music, art, and dance must also
be given importance. Creative individuals, through their energy and efficiency,
can give new shape to a creative revolution, he said, urging creative people
worldwide to make India a hub of global creativity.
Today,
the world is searching for new ways to tell stories and concepts. India has a
priceless treasure of stories and ideas spanning thousands of years. Modi
called for spreading this treasure to every corner of the world and presenting
it to future generations in new and engaging ways.
India Is
Ready to Lead as a Creative Superpower – CM Devendra Fadnavis
The
entertainment sector is the new engine of growth for Maharashtra and India,
said Chief Minister Devendra Fadnavis. In the digital age, content travels
faster than any product, and Maharashtra is at the forefront of this
revolution. WAVES is not just a summit but a movement, inspired by Prime
Minister Narendra Modi and taking shape in Maharashtra.
Today,
digital content, music, animation, and games are being shaped at a global
level. The state government is creating a conducive environment and will
implement robust policies to support this transformation, he added.
Fadnavis
also announced that Mumbai’s Film City, spread over 500 acres, is being
developed into a global center for next-generation studio ecosystems. Of this,
120 acres will be dedicated to a media and entertainment city focused on
animation, visual effects, and gaming.
Indian
Institute of Creative Technology to Be Set Up in Mumbai – Union Minister
Ashwini Vaishnaw
For the
first time, the Indian Institute of Creative Technology (IICT) will be
established in Mumbai, with a funding of ₹400 crore approved by the central
government. Global giants like Google, Apple, Microsoft, and Adobe will
collaborate in setting up this institute. Through WAVES, India is progressing
towards becoming a global hub for the creative industry, said Ashwini Vaishnaw
in his welcome address.
Actor
Anupam Kher outlined the vision behind the WAVES initiative. Singers M.M.
Keeravani, Shreya Ghoshal, and Mangli performed the welcome song. WAVES
advisory board members including Mohanlal, Hema Malini, Kartik Aaryan, S.S.
Rajamouli, Rajinikanth, Anil Kapoor, Bhumi Pednekar, Ranbir Kapoor, Aamir Khan,
Reliance Industries Chairman Mukesh Ambani, and Adobe CEO Shantanu Narayen
shared their thoughts during the event.
On this
occasion, Prime Minister Modi also unveiled postage stamps in memory of
Gurudutt, P. Bhanumathi, Raj Khosla, Ritwik Ghatak, and Salil Chowdhury for
their contributions to Indian cinema.
000