वंचिताना
अन्नसुरक्षा देणाऱ्या नांदेडच्या
उपक्रमास
राष्ट्रपती भवनात कौतुकाची दाद

त्यानुसार प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा पुरवठा अधिकारी
संतोष वेणीकर , सहाय्यक पुरवठा अधिकारी मुगाजी काकडे यांनी आज राष्ट्रपती भवन येथे
सादरीकरण केले. त्याला उपस्थित मान्यवरांनी कौतुकभरली दाद दिली.
जिल्हा पुरवठा विभागाने पुरवठा अधिकारी श्री. वेणीकर यांच्या कल्पकतेतून
वंचितांना अन्न धान्य पुरवठ्याच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार
समाजातील अपंग, विधवा, निराधार, कचरा वेचणारे आदींसह अनेक असे घटक ज्यांच्याकडे
शिधापत्रिका व शासकीय लाभ घेण्यासाठीची आवश्यक कागदपत्रेही नाहीत त्यांना विशेष
बाब म्हणून या योजनेत समाविष्ट करण्यात आले. यामुळे सुमारे 10 हजाराहून अधिक
वंचितांना आता स्वस्त धान्याचा नियमित पुरवठा सुरु झाला आहे. ऑगस्ट 2016 मध्ये या
उपक्रमास प्रारंभ करण्यात आला होता. या उपक्रमाची प्रधानमंत्री कार्यालयाने नोंद
घेतली होती व त्याबाबत आवश्यक तपशीलही मागविले होते. देशभरातून मागविण्यात आलेल्या
अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये नांदेडच्या वंचितांसाठीच्या या संवेदनशील
उपक्रमाने स्थान पटकाविले. या साठहून अधिक प्रकल्प-उपक्रमांचे आज नवी दिल्ली येथे
राष्ट्रपती भवनात विविध मान्यवर-तज्ज्ञांसमोर सादरीकरण करण्यात आले. त्यासाठी
प्रभारी जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्यासह श्री. वेणीकर
व श्री. काकडे यांनी प्रभावी सादरीकरण केले.

0000000