Sunday, May 10, 2026

पिछले एक हजार वर्षों में सोमनाथ मंदिर पर अनेक आक्रमण हुए और हर बार श्रद्धालुओं की अटूट आस्था, त्याग और बलिदान ने इसका पुनर्निर्माण किया। आज़ादी के बाद सोमनाथ मंदिर सरदार पटेल के प्रयासों से पुनर्स्थापित हुआ, जिसमें के.एम. मुंशी और जामसाहेब का अतुल्य योगदान रहा।

आज सोमनाथ भारत की संस्कृति और विरासत की प्रतीक बनकर उभरा है और भारत की आध्यात्मिक और सांस्कृतिक शक्ति से विश्व को परिचित करा रहा है।




 संपूर्ण देश में सोमनाथ ज्योतिर्लिंग के 1000 वर्षों के स्मरणोत्सव के रूप में कलश यात्रा, भजन संध्या, स्वच्छता अभियान, ॐकार मंत्र का जाप, सोमनाथ संकल्प प्रतिज्ञा, मंत्र लेखन और सोमनाथ से जुड़ी कथाओं का वाचन जैसे विभिन्न कार्यक्रम आयोजित किये जा रहे हैं। आप भी अपने नगर में आयोजित इन कार्यक्रमों में भाग लीजिये और अपने देश की प्राचीन विरासत पर गर्व कीजिये।




#सोमनाथ आणि महाराष्ट्राचे नाते हे केवळ भूगोलाचे नाही, तर इतिहास, श्रद्धा, स्वाभिमान आणि पुनरुत्थानाच्या अखंड परंपरेचे आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पासून मराठा साम्राज्यापर्यंत अनेकांनी सोमनाथच्या पुनर्बांधणीसाठी दिलेले योगदान हे भारतीय संस्कृतीच्या अढळ सामर्थ्याचे प्रतीक आहे. सोमनाथ मंदिराच्या पुनरुज्जीवनाला 75 वर्षे पूर्ण होत असताना, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात संपन्न होणाऱ्या 'सोमनाथ स्वाभिमान पर्व 2026' च्या निमित्त 'सोमनाथ – अखंड श्रद्धेचे महापर्व' या माझ्या लेखातून सोमनाथचा गौरवशाली प्रवास नक्की वाचा.




 

Saturday, May 9, 2026

 #सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते..



 

 सोमनाथ वारसा ७५ वर्षांचा…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही पवित्र भूमी भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाची गौरवशाली साक्ष देत आहे.
या सुवर्णक्षणाचे साक्षीदार बना…
🗓️ दि. ८ ते ११ मे २०२६
📍 श्री सोमनाथ मंदिर संकुल, प्रभास पाटण







सोमनाथ हे केवळ मंदिर नसून भारताच्या अखंड श्रद्धेचे, आत्मविश्वासाचे आणि पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचे जिवंत प्रतीक आहे. 'विकास आणि वारसा' या भावनेतून देशातील आध्यात्मिक स्थळांचे जतन करत आधुनिकतेशी साधलेला समन्वय हा नवभारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा प्रेरणादायी अध्याय आहे. सोमनाथ मंदिराच्या पुनरुज्जीवनाला 75 वर्षे पूर्ण होत असताना, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मांडलेली 'सोमनाथ - 'विध्वंस' ते 'सृजना'च्या प्रवासाची कहाणी' नक्की वाचा.







 सोमनाथ स्वाभिमान महोत्सव - हजारो वर्षांची अतूट श्रद्धा,अदम्य साहस आणि राष्ट्रस्वाभिमानाचा उत्सव!

तुटून पडूनही पुन्हा पुन्हा उठणं - ही सोमनाथची अजरामर भावना आहे.
8 ते 11 मे 2026 - कलश यात्रा, भजन संध्या, ओंकार मंत्र उच्चारण आणि बरच काही!
आपण पण आपला सहभाग निश्चित करा.
अधिक माहितीसाठी क्लिक करा : 🔗 amritkaal.nic.in/somnath-swabhiman-parv

वृत्त क्रमांक 

जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा दौरा 

नांदेड दि. 9 मे :- जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) व सदस्य ललित गांधी हे रविवार 10 मे 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

रविवार 10 मे 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून खाजगी वाहनाने मध्यरात्री 2 वा. नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सकाळी 9 वा. जैन श्वेतांबर मंदिर नांदेड येथे दर्शनार्थ भेट. सकाळी 9.30 वा. शासकीय वाहनाने उमरी रेल्वे स्टेशनकडे प्रयाण व जैन मंदिर दर्शन. सकाळी 11 वा. पुरातन जैन मंदिर जुन्नी येथे सदिच्छा भेट. दुपारी 12 वा. धर्माबाद जैन मंदिर येथे सदिच्छा भेट. दुपारी 2 वा. धर्माबाद येथून नांदेड शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सायं. 5 वा. सकल जैन समाज आयोजित सन्मान समारोह उपस्थिती स्थळ- नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. रात्री 10 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथून मुंबईकडे प्रयाण करतील.

00000



 "साहेब… मुलगी पास झाली हो… तिला ३५% पडले…"

दुपारचे साधारण बारा वाजले असतील…
मोबाईलची रिंग वाजली…
दोन दिवसांपूर्वी पक्ष्यांसाठी छोटासा पाणवठा तयार करत असताना मोबाईल चुकून पाण्याच्या बादलीत पडल्यामुळे तात्पुरत्या दुसऱ्या मोबाईलमध्ये सिमकार्ड टाकले होते. त्यामुळे नंबर सेव्ह नव्हता… अनोळखी नंबर दिसला.

फोन उचलला…

तिकडून एका वडिलांचा थरथरता पण आनंदाने भरलेला आवाज आला…

"आहो साहेब… माझी मुलगी पास झाली… तिला ३५% पडले…"

क्षणभर मीही शांत झालो…
त्या वडिलांच्या आवाजातला आनंद शब्दांच्या पलीकडचा होता.
माझ्याही चेहऱ्यावर नकळत हास्य उमटलं…
मी त्या वडिलांचं अभिनंदन केलं आणि म्हणालो,

"मी स्वतः गावात येऊन मुलीला पेढे देऊन अभिनंदन करणार…"

कारण त्या ३५% मागे फक्त गुण नव्हते…
तर एका मुलीचं आयुष्य उभं राहिलं होतं…
एका वडिलांची जिद्द होती…
आणि शिक्षणाकडे पुन्हा वळलेलं एक कोवळं मन होतं…

---

मी वनरक्षक म्हणून नांदेड वनविभागात कंधार तालुक्यात कार्यरत असताना एका रात्री परिसरात बिबट दिसल्याची अफवा मोठ्या प्रमाणात पसरली होती.
नंदनवन शेतशिवारातून अनेक फोन येत होते.
रात्र खूप झाल्यामुळे शोधमोहीम थांबवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शोध सुरू केला.

एका महिलेने मोठ्या पराठीच्या शेताकडे बोट दाखवत सांगितलं,

"आवाज इकडून येतोय…"

आम्ही अत्यंत सावधपणे पुढे गेलो.
परंतु तिथे बिबट नव्हता…
एक रानडुक्कर आपल्या पिलांसोबत होती. माणसांची चाहूल लागताच ती मोठ्याने आवाज करत होती.
अफवा खोटी असल्याचं स्पष्ट झालं.

काम संपलं…
मी जवळच्या एका भोकराच्या झाडाखाली सावलीत बसलो.

तेवढ्यात माझं लक्ष बाजूच्या हळदीच्या शेताकडे गेलं…

एक साधारण नववी-दहावीतली मुलगी उन्हात हळदीला पाणी देत होती.

मी जवळच्या व्यक्तीकडे तिच्याबद्दल विचारलं.
त्यांनी तिच्या वडिलांना आणि त्या मुलीला बोलावलं.

मी विचारलं,

"शाळा सुरू असताना तू शेतात काय करतेस?"

वडील शांतपणे म्हणाले,

"साहेब… ही माझी मुलगी. शाळेत जात नाही. हिचं मन शेतीतच रमलंय. घरची सगळी शेतीची कामं हीच करते…"

मी त्या मुलीकडे पाहिलं.

ती डोळे खाली घालून म्हणाली,

"मला अभ्यास जमत नाही… अधूनमधून शाळेत गेल्यावर अभ्यास मागे राहतो… मुलं हसतात… म्हणून मी शाळेत जात नाही…"

त्या निरागस शब्दांनी मन सुन्न झालं…

एक मुलगी…
जिच्या हातात पुस्तकं असायला हवी होती…
ती लहान वयात शेतात अवजड कामं करत होती…

त्या दिवशी मी जवळपास दोन तास त्या वडिलांशी आणि मुलीशी शिक्षणाबद्दल बोलत राहिलो.

मी वडिलांना विनंती केली,

"आजपासून मुलीला शेतात कामाला लावू नका…
तिला शाळेत जाऊ द्या…
शिक्षण हेच तिचं खरं आयुष्य बदलणार आहे…"

वडील म्हणाले,

"साहेब… जर ही शिकणार असेल तर मी तिला कधीच शेतात कामाला लावणार नाही…"

मुलीचं मनही त्या दिवशी हललं होतं…

ती म्हणाली,

"मी अभ्यास करेन… आणि दहावी पास होऊन दाखवेन…"

त्या दिवशी एका भोकराच्या झाडाखाली फक्त संवाद झाला नव्हता…
तर एका मुलीच्या आयुष्याला नवं वळण मिळालं होतं…

---

त्यानंतर मी त्या गावातील एका व्यक्तीमार्फत सतत चौकशी करत राहिलो.
मुलगी शाळेत जाते का…?
वडील पुन्हा शेतात कामाला पाठवतात का…?

आणि हळूहळू बातम्या यायला लागल्या…

"साहेब… मुलगी आता रोज शाळेत जाते…"

"साहेब… वडील आता तिला शेतात पाठवत नाहीत…"

हे ऐकून मनाला समाधान मिळत होतं.

आणि आज…

त्या मुलीने कॉपीमुक्त वातावरणात स्वतःच्या मेहनतीवर दहावी उत्तीर्ण होऊन दाखवलं…

कुणाला ३५% कमी वाटतील…
परंतु ज्यांनी संघर्ष जवळून पाहिला आहे त्यांना माहिती आहे —

हे ३५% म्हणजे एका मुलीच्या आत्मविश्वासाचा विजय आहे…
शाळाबाह्य आयुष्यातून शिक्षणाच्या प्रवाहात परत येण्याचा विजय आहे…
एका बापाच्या बदललेल्या विचारांचा विजय आहे…

आज ती मुलगी फक्त पास झालेली नाही…
तर ती स्वतःवर विश्वास ठेवायला शिकली आहे.

---

समाजात अजूनही अनेक मुली आहेत…

ज्यांच्या हातात वहीऐवजी विळा आहे…
ज्यांच्या डोळ्यांत स्वप्नं आहेत पण परिस्थिती त्यांना शाळेपासून दूर नेत आहे…
काही मुली अभ्यासात मागे पडतात…
काहींची चेष्टा होते…
काहींना घरची जबाबदारी थांबवते…

पण प्रत्येक मुलीमध्ये क्षमता आहे…

फक्त तिला कुणीतरी समजून घेणारं मन हवं…
थोडासा आधार हवा…
थोडी प्रेरणा हवी…
आणि विश्वास हवा की —

"तू करू शकतेस…"

---

त्या मुलीचे आणि तिच्या वडिलांचे मनापासून अभिनंदन…
कारण त्यांनी परिस्थितीसमोर हार मानली नाही.

आज त्या मुलीने ३५% मिळवले…
उद्या ती अधिकारी सुद्धा होऊ शकते…
कारण गुणांपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे —
स्वतःवरचा विश्वास आणि पुन्हा उभं राहण्याची हिंमत…

ही कथा प्रत्येक शाळाबाह्य मुलीपर्यंत पोहोचली पाहिजे…
जेणेकरून प्रत्येक मुलगी स्वतःला म्हणेल —

"मीही शिकेन…
मीही उभी राहीन…
आणि माझं भविष्य मी स्वतः घडवेन…" 🌿
🙏🌳📚

शिवसांब घोडके
वनरक्षक वनविभाग नांदेड
दररोज एक रोप लागवड चळवळ



 सोमनाथ वारसा ७५ वर्षांचा…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही पवित्र भूमी भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाची अभिमानाने घोषणा करत आहे.
या सुवर्णक्षणाचे साक्षीदार बना…
🗓️ दि. ८ ते ११ मे २०२६
📍 श्री सोमनाथ मंदिर संकुल, प्रभास पाटण



महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, ११ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता मुंबई येथील श्री धाकलेश्वर मंदिर, महालक्ष्मी कंपाऊंड, भुलाभाई देसाई रोड, मुंबई येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात प्रसिद्ध कलाकार शुभदा वराडकर यांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून, भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरेचा समृद्ध आविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे. ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ अंतर्गत आयोजित करण्यात येणारा हा कार्यक्रम श्रद्धा, संस्कृती आणि राष्ट्रीय अस्मितेचा संदेश देणारा ठरणार आहे.
हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा गौरव आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.



Friday, May 8, 2026

वृत्त क्रमांक

जिल्ह्यात दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी

विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

नांदेड दि. मे :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 08 मे 2026 रोजी दुपारी 12:24 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 08 व 09 मे 2026 या दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.                                       

या गोष्टी करा :

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच  झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

00000

वृत्त क्रमांक

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मान्यवरांच्या हस्ते शिबिरात विविध दाखले व प्रमाणपत्राचे वितरण

नांदेड, दि. ८ मे : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” चे आयोजन तरोडा बु. मंडळातील पासदगाव येथे राधेश्वरी मंगल कार्यालयात करण्यात आले. या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध योजनांची माहिती घेऊन लाभ मिळविला.

सदर शिबिरास नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, तालुका कृषी अधिकारी श्री. चातरमल , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण मुंडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंडळातील विविध गावांचे सरपंच व इतर पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार बालाजी कल्याणकर यांनी शासनाच्या विविध योजना व उपक्रम नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता असल्याचे सांगितले. महसुली कामे तात्काळ मार्गी लागत असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत असून “शासन आपल्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अंतर्गत महसूल, कृषी, आरोग्य, ग्रामविकास, महिला व बालकल्याण, विशेष सहाय्य, भूमी अभिलेख, नोंदणी व मुद्रांक, निवडणूक विभाग तसेच आपले सरकार सेवा केंद्र यांच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार संजय वारकड यांनी केले. त्यांनी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देत नागरिकांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या शिबिरामध्ये सातबारा व 8-अ चे एकूण 748 दाखले वितरित करण्यात आले. तसेच उत्पन्न, रहिवासी, वय, जातीचे तसेच अल्पभूधारक प्रमाणपत्र आदी मिळून एकूण 799 प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 6 लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले.

एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांना बेबी केअर किटचे वितरण करण्यात आले. तसेच सलोखा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या गट अदलाबदलीद्वारे सातबाराचे वितरण करण्यात आले. कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत सन २०२५-२६ मध्ये ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले.

याशिवाय SIR मोहिमेमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीएलओंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिबिरामध्ये विविध विभागांचे माहितीपर स्टॉल उभारण्यात आले होते. विशेषतः सातबारा व ८-अ वितरण, आधार दुरुस्ती, आपले सरकार सेवा केंद्र, जनगणनेतील स्व-गणना, आरोग्य तपासणी, वन विभाग, संजय गांधी निराधार योजना आदी स्टॉलना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी विविध योजनांची माहिती घेऊन तत्काळ अर्ज व नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, सुनील माचेवाड, श्री. गरड तसेच मंडळ अधिकारी शिवानंद स्वामी, अनिरुद्ध जोधळे, कुणाल जगताप, प्रमोद बडवणे, सय्यद मोसीन, संतोष आस्कुलकर, श्रीकृष्ण येलमट्टे यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी गोपीनाथ कल्याणकर, मारोती कदम, संजय आढाव, अविनाश करंदीकर, माधव शिराळे तसेच तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक यांनी परिश्रम घेतले.

०००००





वृत्त क्रमांक

बॅकींग, फायनान्स, अॅग्रीकल्चर, शिक्षण क्षेत्रात रोजगाराची संधी 

पंडित दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन 

नांदेड दि. 8 मे :- नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व स्वा.से.राजासिंग हरिसिंग चव्हाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 12 मे 2026 रोजी सकाळी 10 वा. पासून स्वा.से.राजासिंग हरिसिंग चव्हाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुखेड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजकांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार असून या रोजगार मेळावा/प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये एसबीआय लाईफ इन्शुरन्स, मुथ्थुट फायनान्स लि, मेघदूत डेअरी प्रोडक्टस, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मुखेड या आस्थापनेकडून रिक्तपदे प्राप्त झाली असून ते प्रत्यक्ष उपस्थीत राहून मुलाखती घेणार आहेत. त्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी, डिप्लोमा, आयटीआय, एचएससी उत्तीर्ण इत्यादी पात्रताधारक युवक-युवतीसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजर आयडी व पासवर्डने लॉगीन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे किंवा पात्रतेनुसार बायोडाटाच्या आवश्यक प्रती घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. 

संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदासाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०२४६२-२५१६७४ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. 

संबंधीत दिनांकास सकाळी १० वा. कार्यक्रमस्थळी उपस्थीत राहून पात्रतेप्रमाणे विविध नियोक्त्याकडे मुलाखती देवून रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.

000000


Thursday, May 7, 2026

वृत्त क्रमांक

रस्तासुरक्षा सरप्राईज गिफ्ट्सचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वितरण

नांदेड दि. 7 मे :- वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि 'सेफर इंडियन रोड्स' (Safer Indian Roads) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते उदात्त कार्यक्रमाचा शुभारंभ आज महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसर आयटीआय चौक येथे करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज, वाहतूक पोलीस इन्स्पेक्टर भागवत नागरगोजे हे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हेल्मेट आणि सीट बेल्ट घालून वाहतुकीचे नियम व कायदे पाळणाऱ्या नागरिकांना रस्ते सुरक्षा सरप्राईज भेटवस्तू आणि रस्ते चिन्हांचा तक्ता देऊन सन्मानित केले. नागरिकांशी बोलताना, त्यांनी रस्ते चिन्हांच्या तक्त्याचे प्रकाशन केले. जो शैक्षणिक संस्था, महाविद्यालये आणि शाळांना दिला जाईल. ते म्हणाले की, रस्ते सुरक्षा ही एक सामायिक जबाबदारी आहे आणि प्रत्येक रस्ता वापरकर्त्याने वाहतुकीचे नियम व चिन्हे यांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. तसेच त्यांनी इतर रस्ता वापरकर्त्यांचा आदर करण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले की, मोटार आणि मानवी लोकसंख्येच्या झपाट्याने वाढीमुळे धोकादायक #रस्ता वापरकर्त्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे आणि जीवघेणे रस्ते अपघात थांबवण्यासाठी प्रत्येक रस्ता वापरकर्त्याने आदराने रस्ते सुरक्षेचे पालन केले पाहिजे.

कार्यक्रमात पोलीस वाहतूक नांदेडचे संतोष तिडके, श्रीमती शिवकांथा जयलवालजी, घनशाम ओझा, परीक्षित ओझा, महेश तिवारी, भास्कर थेटे, सोनू उपाध्याय, तरुण तिवारी, विवेक तिवारी, वरुण तिवारी, श्रीमती ओझा, श्रीमती ओझा, श्रीमती स्वाती उपाध्याय, श्रीमती अनमोल पंडित, कु.नेतल तिवारी, कु.सृष्टी उपाध्याय, बेबी प्रमुघडा सहभागी झाले होते.

00000



















पिछले एक हजार वर्षों में सोमनाथ मंदिर पर अनेक आक्रमण हुए और हर बार श्रद्धालुओं की अटूट आस्था, त्याग और बलिदान ने इसका पुनर्निर्माण किया। आज़ा...