Thursday, March 29, 2018


हिरवळी, जैविक खताची योग्य सांगड
रासायनिक खताशी केल्यास उत्पन्नात वाढ
- प्रगतशील शेतकरी पांडुरंग आव्हाड
नांदेड दि. 30 :- जमिनीतील सेंद्रीय कर्बाची वाढ करण्यात हिरवळी व जैविक खताची योग्य सांगड रासायनिक खताशी केल्यास हमखास उत्पन्नात वाढ होते, असे प्रतिपादन प्रगतशील शेतकरी पांडुरंग आव्हाड यांनी केले.   
नांदेड जिल्हा कृषि महोत्सवात गुरुवार 29 मार्च रोजीच्या चर्चासत्रात "सुधारीत ऊस लागवड तंत्रज्ञान" या विषयावर कळंब तालुक्यातील शिरपूर येथील प्रगतशील श्री आव्हाड हे मार्गदशन करतांना बोलत होते.
प्रगतशील शेतकरी श्री आव्हाड यांनी एकरी 110 टन ऊस उत्पादन घेतल्याचे स्वताचा अनुभव शास्त्रोद्योत पद्धतीने शेतकऱ्यास सांगितला. ऊस पीकावरील पंचसुत्रीची सविस्तर माहिती देताना सुपीकत, हंगाम  लागवड पद्धत, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापनात ठिबक सिंचनाचा वापर, किड रोग व्यवस्थापनाची सविस्तर माहिती दिली. कृषि महोत्सवास ग्राहकांनी भरघोस प्रतिसाद दिला असून शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेला शेतमालास पसंती देऊन खरेदी केली. अशी माहिती नांदेडचे प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी दिली.
00000

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...