वृत्त क्रमांक 1007
केवायसी व प्रधानमंत्री सामाजिक सुरक्षा योजनेच्या
प्रतिसादासाठी ग्रामपंचायत पातळीवर महामेळावा संपन्न
नांदेड, दि. 24 सप्टेंबर :- नांदेड जिल्ह्यातील नायगाव व हदगाव येथे
नुकतेच 18 सप्टेंबर रोजी विशेषवित्तीय साक्षरता मेळाव्याचे
आयोजन महाराष्ट्र ग्रामीण बँक व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यावतीने करण्यात आले
होते. जिल्ह्यातील सर्व पात्र बँक ग्राहकांनी प्रधानमंत्री जनधन खाते उघडावे तसेच
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा
विमा योजना, अटल पेन्शन योजना यात सहभागी व्हावे. आपले बँक
खात्याचे री-के वायसी व नामांकन करण्यासाठी आपल्या बँक शाखेशी संपर्क करावा,
असे आवाहन करण्यात आले.
या मेळाव्यासाठी भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक
संदिप कुमार हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथि म्हणून महाराष्ट्र ग्रामीण
बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड, स्टेट बँक ऑफ इंडियाचे
सरव्यवस्थापक अनिरुद्ध चौधरी, आयडीबीआय बँकेचे सरव्यवस्थापक
पुनीत गोस्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
अर्थ मंत्रालय, भारत सरकार यांच्या
सुचनेनुसार देशभरात जनधन योजनेला दहा वर्षे झाले आहेत. त्यानिमित्ताने
ग्रामपंचायत स्तरावर जनधन बचत खाते, प्रधानमंत्री जीवन
ज्योति विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना,
अटल पेन्शन योजना यांचे 100 टक्के पात्र लाभार्थ्यांपर्यंत
जन सुरक्षा योजनांचे लाभ पोहचले पाहिजेत तसेच नामांकन सुविधा व री-केवायसी या
मुख्य उद्देशाने या ग्रामपंचायत पातळीवरील मेळव्यांचे आयोजन करण्यात येत आहे.
या अभियानाचा भाग म्हणून 18 सप्टेंबर
रोजी नायगाव व हदगाव येथे ग्राहक मेळावा व रीकेवायसी कॅम्पचे आयोजन सर्व बँकांनी
मिळून केले होते. या कार्यक्रमास भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक संदीप
कुमार यांनी मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी बँक खाते व
त्याचे महत्व उपस्थित लाभार्थ्यााना समजून संगितले तसेच या मेळाव्याबाबतची भारतीय
रिझर्व बँकेची भूमिका विषद केली. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे
अध्यक्ष मिलिंद घारड यांनी सायबर सिक्युरिटी व ऑनलाईन बँकिंग करताना घ्यावयाची
काळजी याबाबत विश्लेषण केले. तसेच स्टेट बँकेचे सरव्यवस्थापक यांनी नामांकन सुविधा
व रूपे कार्ड याचे महत्व सांगितले.
या मेळाव्याच्या आयोजनात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने सक्रिय
सहभाग घेतला. ग्रामीण बँकेच्या नांदेड विभागात 65 शाखा
असून नांदेडमध्ये असलेल्या 236 बँकमित्र (Business
Correspondent) यांच्या मार्फत या मेळाव्याच्या निमित्ताने एक
आठवड्यापासून अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत प्रत्येक शाखेने व बीसी यांनी
ग्रामपंचायत स्तरावर मेळावे आयोजित केले व त्यामधून री-केवायसी व प्रधानमंत्री
सुरक्षा योजनाची माहिती गावागावातील खातेदारांना दिली गेली. नांदेड जिल्ह्यात
ग्रामीण बँकेचे एकूण 4.26 लाख खाते री-केवायसीसाठी पात्र
होते. या एकाच दिवशी 24007 बँक खात्याचे री-केवायसी रिझर्व
बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक संदीप कुमार यांचा मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले
तर मागील आठ दिवसात मिळून 33,340 री-के वाय सी चे काम पूर्ण
केले गेले त्यामुळे असे एकूण 1,11,998 रीकेवायसी ग्रामीण
बँकेने पूर्ण केले आहे.
नांदेड जिल्ह्यात भारतीय रिजर्व बँकेचे वरिष्ठ अधिकारी येऊन
जन धन बँक खाते व त्याला उपलब्ध असलेल्या सामाजिक सुरक्षा योजना यांची माहिती
सांगतात. याबाबतीत बँक ग्राहकामधून जनजागृतीसाठी
अत्यंत उपयुक्त अशी राहिली आहे. या मेळाव्यानंतर देखील
संदीपकुमार यांनी तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांनी
उपस्थित ग्राहकांच्या शंकाचे समाधान केले. या मुळे खऱ्या अर्थाने बँक आपल्या दरी
आल्याची भावना ग्राहकांमध्ये दिसून आली.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सहाय्यक
सरव्यवस्थापक व नियोजन वित्तीय समावेशन विभाग प्रमुख संतोष प्रभावती, भारतीय रिजर्व बँकेचे नांदेड जिल्ह्याचे लीड डिस्ट्रिक्ट ऑफिसर अरुण बाबू
यांनी मार्गदर्शन केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी लीड बँक मॅनेजर सोनकांबळे,
विभागीय व्यवस्थापक नरेंद्र खत्री, सहाय्यक
विभागीय व्यवस्थापक प्रशांत राठोड यांनी परिश्रम घेतले. शाखा
व्यवस्थापक सर्वश्री राजेश मंडलिक, आनंद मुनेश्वर, चन्द्रशेखर वनखेडे, दिपंकर पाटील, आशुतोष कांबळे, अजिंक्य देशमुख, भारत नाईक, मानव कांबळे, महादेव
पावणे इ. यांनी मदत केली.
0000