Friday, March 13, 2026

#घरगुतीएलपीजी चा तुटवडा नाही

वृत्त क्रमांक 

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

नांदेड दि. 13 मार्च :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था हिमायतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 16 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वा. पासून शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था हिमायतनगर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह (जागेवर निवड संधी) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या प्लेसमेंट ड्राईव्ह /रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापनामध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी सोमवार 16 मार्च 2026 सकाळी 10 वा. पासून शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था हिमायतनगर येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्कासाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दुरध्वनी  क्रमांक 02462-251674 व मो. 9860725448 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 

मिनी सरस – रेणुका महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; महिलांच्या उत्पादनांना विक्रीचे व्यासपीठ

नांदेड, दि. १३ मार्च : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नांदेड यांच्या वतीने मिनी सरस – जिल्हास्तरीय रेणुका महोत्सव २०२६ अंतर्गत महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भव्य विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.

वजीराबाद येथील मल्टीपर्पज हायस्कूल परिसरात आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उमेद अभियानाच्या जिल्हा अभियान संचालक मेघना कावली व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. पूनमताई राजेश पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अभियान सहसंचालक तथा प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) डॉ. संजय तुबाकले यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वसरणी येथील निवासी अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संगीत दिग्दर्शक पंकज शिरभाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्फूर्तीदायक गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच विनोदी वासरे यांनी केलेल्या बासरी वादनाने कार्यक्रमात रंगत आणली.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) अमित कुमार राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पापु व मयूरकुमार अंदेलवाड, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, कार्यकारी अभियंता संजय शिंदे, स्वीय सहाय्यक बालाजी नागमवाड, शुभम तेलेवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुंडे व त्यांची टीम तसेच आरोग्य विभागाच्या डॉ. प्रगती निलपत्रेवार उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय तुबाकले यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा स्मिता मोहोरी यांनी मांडली तर सूत्रसंचालन इरवंत सूर्यकार व स्मिता मोहोरीर यांनी केले.

उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सौ. पूनमताई पवार यांनी महिलांनी तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उद्योग-व्यवसायाकडे वळावे, तसेच त्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

यानंतर राज्य अभियान व्यवस्थापक तथा नांदेडचे पालक अधिकारी रामदास धुमाळ यांनी उमेद अभियानाचा इतिहास, उद्दिष्टे व वैशिष्ट्ये यांची माहिती दिली. महिलांना आर्थिक पाठबळ देऊन उपजीविका, लखपती दीदी उपक्रम तसेच स्वावलंबी विचारपीठ निर्माण करण्याचे काम उमेद अभियानातून होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय समारोप करताना मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी सांगितले की, देशातील विविध राज्यांमध्ये ग्रामीण जीवनोन्नती अभियान विविध नावांनी राबविले जाते. महाराष्ट्रात ‘उमेद’ अभियानाद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांना उद्योजकतेकडे वळविण्याचे काम करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे आभार जिल्हा अभियान व्यवस्थापक द्वारकादास राठोड यांनी मानले.

या महोत्सवात नांदेड तसेच इतर जिल्ह्यांतील महिलांच्या सुमारे १०० विक्री स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. तसेच आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर यांसारखे सामाजिक उपक्रमही पुढील पाच दिवस आयोजित करण्यात येणार आहेत.

दुपारच्या सत्रात महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली, तर सायंकाळच्या सत्रात प्रसिद्ध शाहीर प्रा. गौतम पवार (भूकमारीकर) यांच्या शाहिरी प्रबोधन कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.

हा मिनी सरस – रेणुका महोत्सव १८ मार्च २०२६ पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने देण्यात आली.

000000



 गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्ननागरी पुरवठा विभागामार्फत

राज्यभर नियंत्रण कक्ष आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन

 

·         गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध

·         अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने

·         राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही

·         समाजमाध्यमांवरील खोट्या/बनावट बातम्यांवर कारवाई

·         अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन

 

मुंबई, दि. १३  : इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर सुरळीत पुरवठयाबाबत राज्य शासन  विविध उपाययोजना राबवत आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावायासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

संपूर्ण राज्यामध्ये एलपीजी सुरळीत ठेवण्याविषयी तसेच पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी दिले आहेत.

घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होत राहीलयाची नागरिकांनी निश्चिंतता बाळगावीअशी ग्वाही अन्न व नागरी पुरवठाग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

मार्च महिन्यामध्ये गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध असून युध्दाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी  घेण्याच्या सूचना  विभागामार्फत सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन

घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावायासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारीपोलीस अधीक्षकजिल्हा पुरवठा अधिकारी आणि सर्व सरकारी गॅस कंपन्यांचे अधिकारी यांचा या समित्यांमध्ये समावेश असेल. गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवणेकायदा व सुव्यवस्था राखणे तसेच दररोज परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर करणे ही समित्यांची प्रमुख जबाबदारी असेल.

मुंबई-ठाणे रेशनिंग क्षेत्रात नियंत्रकरेशनिंग यांच्या नियंत्रणाखाली स्थापन केलेल्या समितीत पोलीस उप आयुक्त आणि उपनियंत्रक (रेशनिंग) समितीत समावेश करण्यात येणार असून मुंबई आणि ठाणे शहरातील सर्व उपायुक्तांशी सह पोलीस आयुक्त (प्रशासन) समन्वय साधणार आहेत.

पर्यायी इंधनाच्या वापराची शक्यता तपासण्याचे निर्देशही यंत्रणांना देण्यात आले आहेत. यामध्ये कोळसारॉकेल आदी पर्यायांचा विचार केला जाणार असला तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार आहे.  तसेच जिल्हास्तरीय समित्यांनी हॉटेल व रेस्टॉरंट संघटनांसोबत बैठक घेऊन पर्यायी इंधनाच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्याचे निर्देश दिले आहेत.

अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने

रुग्णालयेशासकीय वसतिगृहेशासकीय शाळा/महाविद्यालयांमधील मेसमध्यान्ह भोजन योजनाशासकीय आश्रमशाळा आदी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्थांना घरगुती/व्यावसायिक गॅसचा पुरवठा प्राधान्याने देण्यात येणार असून अशा संस्थांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.  अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने देण्यासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रमही निश्चित केला जाणार आहे.

गॅस पुरवठ्याबाबत अफवा पसरू नयेतयासाठी दररोज रेडिओएफएमदूरदर्शन तसेच मुद्रित माध्यमांद्वारे माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि जिल्हा समित्या यांसंदर्भातील जबाबदारी पार पाडतील. समाज माध्यमांवरील खोट्या/बनावट बातम्यांवरही कारवाई करण्यात येईल.

गॅस बुकींग अॅप आणि मिस्ड कॉल सेवांमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देश तेल कंपन्यांना देण्यात आले आहेत. तसेच राज्यविभागजिल्हा आणि तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष तातडीने सुरू करून तक्रार निवारणासाठी व्हॉट्सअॅप सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आगामी धार्मिक सण व उत्सवांचा विचार करून सार्वजनिक संस्थांना एलपीजी सिलिंडरचा पुरवठा अखंड ठेवण्यासाठी प्राधान्य राहील.

गॅस सिलिंडर पुरवठ्या संदर्भात नागरिकांमध्ये घबराट निर्माण होऊ नयेयासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत सदस्यांची मदत घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.  एलपीजी वाहतूक करणाऱ्या वाहनांना तसेच गॅस एजन्सींना आवश्यक पोलीस संरक्षण देण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर सोपविण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनरेशनिंग नियंत्रक आणि तेल कंपन्यांनी दररोज  साठा स्थिती व अद्ययावत अहवाल राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही

महाराष्ट्र राज्यात दररोज सरासरी सुमारे ९,००० मेट्रिक टन एलपीजी ची मागणी असते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी रिफायनरीमधील एलपीजी उत्पादन वाढविण्यात आले असूनगेल्या दोन दिवसांत दैनिक उत्पादन ९,००० मेट्रिक टनांवरून ११,००० मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्यात आले आहे.  त्यामुळे राज्यात घरगुती एलपीजीचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. घरगुती गॅसची मागणी पूर्ण करण्याइतके पुरेसे उत्पादन आणि साठा उपलब्ध आहे.

व्यावसायिक एलपीजीच्या बाबतीत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार रुग्णालयेशाळांमधील मध्यान्ह भोजन योजनाशासकीय आश्रमशाळासामुदायिक स्वयंपाकगृहे (कम्युनिटी किचन)तसेच शासकीय शाळा व महाविद्यालयांच्या मेस यांसारख्या अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्यात येत आहे.  उपलब्ध उत्पादनातून या सर्व गरजा पूर्ण होऊ शकतात.

घरगुती वापरासाठीच्या पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजीचा देखील पुरेसा साठा उपलब्ध आहे. इंधनाच्या बाबतीतही राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी राज्यातील रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत असून दररोज सुमारे १५,००० किलो लिटर पेट्रोल आणि ३८,००० किलो लिटर डिझेल या मागणीची पूर्तता केली जात आहे. त्यामुळे इंधन पुरवठ्याबाबत नागरिकांनी  काळजी करू नये असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ

वृत्त क्रमांक 

सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

नांदेड, दि. 13 मार्च :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार दिनांक 16 मार्च 2026 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी महिला लोकशाही दिनाच्या दिवशी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 16 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधिनी (प्रशिक्षण केंद्र), एसबीआय एटीएमच्या मागे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 

चढया दराने खताची विक्री केल्याने देगलूर तालुक्यातील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

नांदेड, दि. 13 मार्च : देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्रांवर कारवाई केली आहे. रासायनिक खतांची कमाल विक्री किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री केल्याप्रकरणी पाच कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांकडून मिळालेल्या तक्रारीनंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय, देगलूर यांना तपासणीचे आदेश दिले होते. या तपासणी अहवालानुसार पांडुरंग कृषी सेवा केंद्र, गणेश कृषी सेवा केंद्र, जिजाई कृषी सेवा केंद्र, सोनी कृषी सेवा केंद्र आणि आनंद फर्टिलायझर्स, देगलूर या पाच कृषी निविष्ठा केंद्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या.
तपासणीदरम्यान रासायनिक खतांची कमाल किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे, तसेच युरिया खत उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना विक्री न करणे अशा प्रकारच्या तक्रारींची पुष्टी झाल्याने सुनावणीनंतर संबंधित केंद्रांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात कुठेही रासायनिक खतांची जादा दराने विक्री होत असल्यास, विनापरवाना विक्री होत असल्यास किंवा खते उपलब्ध असूनही विक्री केली जात नसल्यास नागरिकांनी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा. तसेच शेतकऱ्यांनी केवळ परवानाधारक कृषी निविष्ठा केंद्रातूनच खते व इतर निविष्ठांची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
00000

वृत्त क्रमांक 

बिलोली शहरात 15 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही

नांदेड दि. 13 मार्च :- बिलोली शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा २००३ कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 12 मार्च 2026 रोजी बिलोली शहरात विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून एकूण 15 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही करून 6 हजार 400 रुपये दंड वसूल केला.

ही कार्यवाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे, डॉ.संजीवनी जाधव, डेंटल सर्जन डॉ. पूजा काळे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड व समुपदेशक सुंदर चव्हाण तसेच बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्सटेबल एम एस मुद्देमवार व पोलीस कॉन्सटेबल एन एम अंबुरे उपस्थित होते.

 सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केले आहे.

 00000



#घरगुतीएलपीजी चा तुटवडा नाही #महाराष्ट्रशासन #LPG #गॅससिलेंडर #पेट्रोल #डिझेल #इंधन