Monday, April 27, 2026



 

 वृत्त क्रमांक 89                                                                                                                     दिनांक 27 एप्रिल 2026

मानसिक आरोग्य आढावा मंडळावर

अशासकीय सदस्यांना अर्ज करण्याचे आवाहन

v अर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत अंतिम मुदत

v मंडळात लातूर, नांदेडबीड,धाराशिव जिल्ह्याचा समावेश

लातूरदिनांक २७ (विमाका) : लातूरबीड मानसिक आरोग्य आढावा मंडळावर अशासकीय सदस्य पदासाठी इच्छुकांनी सर्व संबंधित कागदपत्रांसह अर्ज आरोग्य संकुलदुसरा मजला उपसंचालकआरोग्य सेवा परिमंडळ लातूर कार्यालयनवीन जिल्हाधिकारी कार्यालया शेजारीलातूर येथे व्यक्तीशकिंवा कार्यालयाच्या ddhslatur2008@yahoo.com  ddhsest12@rediffmail.com मेलवर सादर करावा.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ०१ मे २०२६ रोजी सायंकाळी .१५ वाजेपर्यंत आहेयाबाबत अधिक माहिती पाहण्यासाठी https://nhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावीअधिकाधिक इच्छुकांनी अर्ज करावेतअसे आवाहन लातूरचे प्रभारी उपसंचालक डॉसंजय ढगे यांनी केले आहे.

राज्य शासनाने राज्यातील १६ ठिकाणी मानसिक आरोग्य आढावा मंडळ स्थापन करण्यास मान्यता दिली आहेलातूर परिमंडळांतर्गत लातूर मानसिक आरोग्य आढावा मंडळासाठी लातूर आणि नांदेडबीड मानसिक आरोग्य आढावा मंडळासाठी बीड आणि धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे.

*****


 वृत्त क्रमांक 

राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

नांदेड दि. 27 एप्रिल :-  भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या 'ज्ञानभारतम्' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिम १६ मार्च २०२६ पासून सुरु आहे, नागरिकांकडे असलेल्या हस्तलिखितांची माहिती ज्ञानभारतम् या मोबाईल अॅपवर अपलोड करुन राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

भारताला हस्तलिखितांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. पारंपारिक ज्ञान हे पिढीदर पिढी या हस्तलिखितांद्वारे प्रसारित होत आलेले आहे. परंतू हे सर्व हस्तलिखिते जागोजागी विखुरलेल्या स्वरुपात आहेत. या हस्तलिखिताचे ज्ञानभंडार एकत्र करुन एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने भारत सरकारने ज्ञानभारतम् या प्रकल्पाची आखणी केली आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भारतातील मौल्यवान हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन व प्रसार करणे हा आहे. 

केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था,संग्रहालये, ग्रंथालये, धार्मिक संस्था तसेच खासगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. यामध्ये हस्तलिखितांची मालकी ही संबंधित संस्था, ग्रंथालय अथवा खाजगी संग्राहक यांचीच राहणार आहे. परंतू ही हस्तलिखिते स्वखुशीने शासनाकडे सुपूर्द करावायाची झाल्यास शासन स्वीकारणार आहे. 

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांची महत्त्वपूर्ण भूमिका असून राज्यातील विविध सांस्कृतिक संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था, हस्तलिखित संग्रहालये तसेच विद्वान यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र राज्यात या प्रकल्पासाठी खालील संस्था क्लस्टर केंद्र व स्वतंत्र केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहेत, यामध्ये कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर क्लस्टर केंद्र, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे क्लस्टर केंद्र, आनंद आश्रम संस्थान, पुणे - स्वतंत्र केंद्र, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे स्वतंत्र केंद्राचा समावेश करण्यात आलेला आहे. 

महाराष्ट्र राज्यासाठी राज्य नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्य नोडल अधिकारी म्हणून सुजितकुमार उगले, संचालक, पुराभिलेख संचालनालय तसेच अंजली ढमाळ, उपसंचालक, मराठी भाषा विकास संस्था, तथा अभिजात मराठी भाषा कक्षा, मराठी भाषा विभाग या सहनोडल अधिकारी म्हणून कामकाज करणार आहेत. 

या सर्वेक्षणासाठी ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत "Gyan Bharatam" हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले असून त्याद्वारे हस्तलिखितांचे क्षेत्रीय मूल्यांकन, पडताळणी व दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. 

या मोहिमेच्या अनुषंगाने सर्व जिल्हाधिकारी यांना त्यांच्या जिल्ह्यात ज्ञानभारतम् प्रकल्पासाठी जिल्हा नोडल अधिकारी नियुक्त करणे, जिल्हास्तरीय समिती स्थापन करणे, तसेच मंदिरे, मठ, धार्मिक संस्था, विद्यापीठे, ग्रंथालये, शैक्षणिक संस्था व खाजगी संग्राहक यांना सर्वेक्षणात सहभागी करून घेणे याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. 

या सर्वेक्षण मोहिमेत शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, संग्रहालये, संस्कृत पाठशाळा, धार्मिक संस्था, संशोधक, पारंपरिक पंडित, तसेच एनसीसी, एनएसएस स्वयंसेवक, विद्यार्थी व वारसा संवर्धन संस्था यांचा सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 *****

वृत्त क्रमांक 

मानसिक आरोग्य आढावा मंडळावर अशासकीय सदस्यांना अर्ज करण्याचे आवाहन

अर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत अंतिम मुदत

मंडळात लातूर, नांदेड, बीड,धाराशिव जिल्ह्याचा समावेश

नांदेड दि. 27 एप्रिल :-  लातूर, बीड मानसिक आरोग्य आढावा मंडळावर अशासकीय सदस्य पदासाठी इच्छुकांनी सर्व संबंधित कागदपत्रांसह अर्ज आरोग्य संकुल, दुसरा मजला उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळ लातूर कार्यालय, नवीन जिल्हाधिकारी कार्यालया शेजारी, लातूर येथे व्यक्तीश: किंवा कार्यालयाच्या ddhslatur2008@yahoo.com व ddhsest12@rediffmail.com मेलवर सादर करावा.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ०१ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत आहे. याबाबत अधिक माहिती पाहण्यासाठी https://nhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिकाधिक इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन लातूरचे प्रभारी उपसंचालक डॉ. संजय ढगे यांनी केले आहे.

राज्य शासनाने राज्यातील १६ ठिकाणी मानसिक आरोग्य आढावा मंडळ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. लातूर परिमंडळांतर्गत लातूर मानसिक आरोग्य आढावा मंडळासाठी लातूर आणि नांदेड, बीड मानसिक आरोग्य आढावा मंडळासाठी बीड आणि धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे.

***

 वृत्त क्रमांक 

नांदेड तालुका महसूल  प्रशासनाचा "शोध वंचित लाभार्थ्यांचा" विशेष उपक्रम

30 एप्रिल रोजी वाजेगाव येथे 

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

नांदेड दि. 27 एप्रिल : नांदेड तालुक्यात महसूल विभागाने महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून "शोध वंचित लाभार्थ्यांचा" या नावीन्यपूर्ण विशेष उपक्रमांतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही वंचित असणाऱ्या लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना लाभ देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थी संख्येत वाढ होणार आहे. नांदेड तालुक्यातील हा नावीन्यपूर्ण उपक्रम राज्यात लक्षवेधी ठरू शकतो.  

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात व उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड यांच्या सूक्ष्म नियोजनात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर नांदेड तालुक्यातील वाजेगाव महसूल मंडळातील वाजेगाव येथे राष्ट्रमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात येत्या 30 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता घेण्यात येणार आहे. सदर शिबिराचे उद्घाटन नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांच्या हस्ते होणार आहे. या शिबिरात महसूल विभागाबरोबरच शासनाच्या विविध विभागाकडून लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. 

सदर शिबिराच्या माध्यमातून "शोध वंचित लाभार्थ्यांचा" या नावीन्यपूर्ण विशेष उपक्रम राबविला जात आहे.  शासनाच्या विविध योजनेची माहिती गाव पातळीवर देऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही वंचित असणाऱ्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत निराधार विधवा, दिव्यांग , वयोवृद्ध, दुर्धर आजार ग्रस्त, अत्याचारित महिला, परितक्त्या, अनाथ मुले, एकल महिला, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, घटस्फोटीत महिला आदी लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचे अर्ज भरून घेऊन लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या उपक्रमात नायब तहसीलदार महसूल सुनील माचेवाड, स्वप्नील दिगलवार तसेच महसूल विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाचे अधिकारी, अंगणवाडी कर्मचारी तसेच अनुलोम, विहान या सामाजिक संस्था प्रयत्नशील असून विशेष कॅम्प आयोजित करून योजनेसाठी आवश्यक कागदपत्रासह अर्ज भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. राज्यात महाराजस्व समाधान शिबिर सध्या चालू असून नांदेड मधील या उपक्रमामुळे शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थी संख्येत लक्षणीय वाढ होणार असल्याने सदर उपक्रम लक्षवेधी ठरणार आहे.

00000

 वृत्त क्रमांक 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड दि. 27 एप्रिल : नांदेड जिल्ह्यात 27 एप्रिल सकाळी 6 वाजेपासून ते 11 मे 2026 मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 27 एप्रिल सकाळी 6 वाजेपासून ते 11 मे 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल.  

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

वृत्त क्रमांक 

बुधवारी हदगाव येथे पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड दि. 27 एप्रिल :- नांदेड जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व वैराग्यमूर्ती दत्ताबापू शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था हदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजेपासून वैराग्यमूर्ती दत्ताबापू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हदगाव येथे पंडीत दिनदयाळ उपाध्याय प्लेसमेट ड्राईव्ह/ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक तसेच शाळा व महाविद्यालय तसेच इतर खाजगी आस्थापनांमध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी बुधवार 29 एप्रिल 2026 रोजी रोजगार मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ.रा.म. कोल्हे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ,  आनंदनगर रोड,  बाबा नगर नांदेड कार्यालयाचा ई-मेल आयडी nandedrojgar01@gmail.com आणि कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02462-251674  यावर संपर्क साधावा, असेही आवाहन  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

#Census2027 #जनगणना2027 Census India 2027