Friday, August 23, 2024

 वृत्त क्र. 764

स्थायी लोकअदालतीची निर्मिती  

नांदेड दि. 23  ऑगस्ट :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या अधिपत्याखाली स्थायी लोक अदालतींची मुंबई, नागपुर, छत्रपती संभाजीनगर व पुणे येथे स्थापना करण्यात आली आहे. तेथे विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 चे कलम 22-अ मध्ये विषद केलेल्या लोकोपयोगी सेवा जसे विद्युत, पाणी, गॅस इत्यादी संबंधी प्रकरणे तडजोडी करीता ठेवता येतात. या स्थायी लोक अदालतीत मोठया संख्येने प्रकरणे तडजोडीसाठी ठेवावीत. संबंधीतांनी वरील ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या स्थायी लोक अदालती समक्ष आपली प्रकरणे ठेवून ती तडजोडीद्वारे मिटवून  घेवून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती सुरेखा कोसमकर व जिल्हाविधी  सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी केले आहे.  

0000

 वृत्त क्र. 763

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांचा दौरा

नांदेड दि. 23  ऑगस्ट :- केंद्रीय रेल्‍वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंघ यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

रविवार 25 ऑगस्ट रोजी हैद्राबाद येथून विमानाने सकाळी 10.20 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 11 वा. गुरूद्वारा साहिब नांदेड येथे भेट. दुपारी 12 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे विशेष रेल्वेला झेंडी दाखवतील. दुपारी 2 वा. राखीव. दुपारी 2.30 वा. येथील विभागीय रेल्वे कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक. सायं. 5.40 वा. नांदेड येथून विमानाने हैद्राबादकडे प्रयाण करतील.
00000

वृत्त क्र. 762

नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी आपले सरकार पोर्टल प्रभावीपणे पध्दतीने राबवा- जिल्हाधिकारी 

आपले सरकार पोर्टल 2.0 नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा

विभागप्रमुखांनी प्रलंबित तक्रारीचा निपटारा करण्यावर भर द्यावा

जिल्हाधिकारी कार्यालयात  विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन 

नांदेड दि. 23  ऑगस्ट :- सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी वारंवार भेट देण्याची गरज नसून, त्यांचा वेळ आणि मेहनत वाचविण्यासाठी शासनामार्फत आपले सरकार पोर्टल 2.0 ही तक्रार प्रणाली सर्व जिल्ह्यामध्ये कार्यान्वित केली आहे. आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या तक्रारी करता येणार आहेत. या तक्रारीचे विहित कालावधीत  निपटारा करण्यावर विभाग प्रमुखांनी प्राधान्याने भर  द्यावा. तसेच त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी पोर्टल प्रभावी पध्दतीने राबवा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. 

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनाच्या कॅबिनेट हॉलमध्ये आपले सरकार पोर्टल प्रभावी पध्दतीने राबविण्यासाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

राज्यामध्ये आपले सरकार पोर्टलची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारीचा 100 टक्के निपटारा व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येत आहे. आज या प्रशिक्षण सत्रात ई-गव्हर्नस तज्ञ देवांग दवे यांनी या पोर्टलबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच तक्रार करण्यापासून ते तक्रारीचा निपटारा होण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले. तसेच तालुका, जिल्हा पातळीवर या पोर्टलद्वारे तक्रारीच्या निवारणाबाबत पोर्टल अद्ययावत करावे. 

आपले सरकार पोर्टल 2.0 ही प्रणाली पारदर्शक असून प्रत्येक तक्रारीचे ट्रकिंग आणि निराकरण सुनिश्चित केले जाते, त्यामुळे शासनावर विश्वास निर्माण होतो. आपले सरकार हे पोर्टल लोकांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी शासनाची कटिबध्दता दर्शविते. अधिकाऱ्यांनी हे पोर्टल कार्यक्षमतेने राबविणे अत्यंत महत्वाचे असून ही प्रणाली डेटा विश्लेषणाद्वारे मौल्यवान माहिती प्रदान करते. जी पुनरावृत्ती होणाऱ्या समस्यांची ओळख करुन देवून प्रणालीतील समस्यांचे निराकरण करण्यास मदत करते. हे पोर्टलवर केलेल्या तक्रारीचे निवारण करुन सर्व शासकीय विभाग आपल्या कामाची गुणवत्ता सिध्द करु शकते. तसेच तक्रार करणारा व वरिष्ठ कार्यालये या कार्यवाहीचे अवलोकन करु शकतात अशी सविस्तर माहिती ई-गव्हर्नन्स तज्ञ देवांग दवे यांनी या पोर्टलच्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली. 

00000










वृत्त क्र. 761

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता देऊन

केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे केले स्वागत

नांदेड दि. 23  ऑगस्ट :- केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे परळी वैजनाथ या ठिकाणच्या कृषी महोत्सवासाठी 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता नांदेडच्या गुरुगोविंद सिंगजी विमानतळावर दिल्ली येथून आगमन झाले होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता देऊन मंत्री महोदयांचे स्वागत केले. स्वागतानंतर ही ग्रामगिता मी वाचणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
0000

 


मुलींना आता व्यावसायिक अभ्यासक्रमाचे मोफत शिक्षण
नांदेड विभागात जवळपास 10 हजार मुलींना योजनेचा लाभ
मुलींना परीक्षा व शिक्षण शुल्कात 100 टक्के लाभ मंजूरीसाठी महाविद्यालयांना निर्देश

नांदेड दि. 23 ऑगस्ट :- व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग तसेच इतर मागासवर्ग प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्कात 50 टक्के ऐवजी आता 100 टक्के लाभ मंजूर करण्याबाबतचा निर्णय 8 जुलै रोजी राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे नांदेड विभागातील जवळपास 10 हजार मुलींना याचा लाभ होणार असून जास्तीत जास्त मुलींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक किरणकुमार बोंदर यांनी केले आहे.

आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील अनेक मुलींना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अनेक मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहत राहण्याची शक्यता होती. मुलींना मोफत उच्च शिक्षण या योजनेत आता त्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. नांदेड विभागात एकूण 97 अनुदानित महाविद्यालय, 219 विनाअनुदानित महाविद्यालय व एक कृषि विद्यापिठ यांचा अंतर्भाव होतो. मुलींना मोफत उच्च शिक्षण या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी नांदेड विभागातील सर्व शैक्षणिक संस्थाना तसे आदेश दिले आहेत. शैक्षणिक संस्थानी देखील या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक यांनी दिली. या योजनेची माहिती व जागृती विद्यार्थींनीमध्येही झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

या योजनेमुळे मुलींना उच्च शिक्षण घेण्यास नक्कीच प्रोत्साहन मिळणार असून या निर्णयामुळे उच्च शिक्षणातील मुलीचा टक्का वाढणार आहे. एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. या महत्वाकांक्षी निर्णयामुळे मुली व महिला आत्मनिर्भर व स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे.

मुलींनी व्यक्त केला आनंद
या योजनेसंदर्भात आम्ही नांदेड जिल्ह्यातील अनेक युवतींशी संपर्क साधला असतात त्यांनी या योजनेबद्दल सकारात्मकता नोंदवली आहे. शासनाच्या या योजनेमुळे मुलीच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाल्याचे मत ऋतुजा पाटील, उन्नती देशमुख, केसर अग्रवाल, मृणाली कदम, तनया हातने, जान्हवी भूजवळ, सोनाली आसटकर, प्रतिक्षा मोरे, गायत्री जोशी, ज्योति पुंडलिक, जानव्ही उदगीरकर विद्यार्थींनींने व्यक्त केले.
00000

वृत्त क्र. 760

मुलींना आता व्यावसायिक अभ्यासक्रमाचे मोफत शिक्षण

नांदेड विभागात जवळपास 10 हजार मुलींना योजनेचा लाभ
मुलींना परीक्षा व शिक्षण शुल्कात 100 टक्के लाभ मंजूरीसाठी महाविद्यालयांना निर्देश

नांदेड दि. 23 ऑगस्ट :- व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग तसेच इतर मागासवर्ग प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्कात 50 टक्के ऐवजी आता 100 टक्के लाभ मंजूर करण्याबाबतचा निर्णय 8 जुलै रोजी राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे नांदेड विभागातील जवळपास 10 हजार मुलींना याचा लाभ होणार असून जास्तीत जास्त मुलींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक किरणकुमार बोंदर यांनी केले आहे.

आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील अनेक मुलींना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अनेक मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहत राहण्याची शक्यता होती. मुलींना मोफत उच्च शिक्षण या योजनेत आता त्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. नांदेड विभागात एकूण 97 अनुदानित महाविद्यालय, 219 विनाअनुदानित महाविद्यालय व एक कृषि विद्यापिठ यांचा अंतर्भाव होतो. मुलींना मोफत उच्च शिक्षण या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी नांदेड विभागातील सर्व शैक्षणिक संस्थाना तसे आदेश दिले आहेत. शैक्षणिक संस्थानी देखील या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक यांनी दिली. या योजनेची माहिती व जागृती विद्यार्थींनीमध्येही झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

या योजनेमुळे मुलींना उच्च शिक्षण घेण्यास नक्कीच प्रोत्साहन मिळणार असून या निर्णयामुळे उच्च शिक्षणातील मुलीचा टक्का वाढणार आहे. एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. या महत्वाकांक्षी निर्णयामुळे मुली व महिला आत्मनिर्भर व स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे.

मुलींनी व्यक्त केला आनंद
या योजनेसंदर्भात आम्ही नांदेड जिल्ह्यातील अनेक युवतींशी संपर्क साधला असतात त्यांनी या योजनेबद्दल सकारात्मकता नोंदवली आहे. शासनाच्या या योजनेमुळे मुलीच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाल्याचे मत ऋतुजा पाटील, उन्नती देशमुख, केसर अग्रवाल, मृणाली कदम, तनया हातने, जान्हवी भूजवळ, सोनाली आसटकर, प्रतिक्षा मोरे, गायत्री जोशी, ज्योति पुंडलिक, जानव्ही उदगीरकर विद्यार्थींनींने व्यक्त केले.
00000


  वृत्त क्र.  855   जिल्ह्यात  " हरित ऊर्जा सौर क्रांती "  मो ही म     ·    5 हजार   पेक्षा जास्त लोकसं ख्येचे गाव  मॉडेल सोलर व्ह...