वृत्त क्र. 659
आणीबाणी काळात लढा देणाऱ्या व्यक्तींचा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन गौरव
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाला सन्मान
नांदेड, दि. 25 जून :- दिनांक 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या घोषीत कालावधीत आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या आणि त्यासाठी बंदिवास सोसावा लागला अशा व्यक्तींचा सन्मान, यथोचित गौरव आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात आणीबाणीत सहभागी असलेल्या संघर्षयात्रींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र व शाल देऊन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी काही वयोवृद्ध ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित होत्या. त्यांचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जागेवर जावून सन्मान केला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, आणीबाणीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेले लक्ष्मण कुलकर्णी, तुकाराम वारकड, प्रभाकर उंचाडकर, नंदकुमार कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील आणीबाणीत सहभाग घेतलेले विविध नागरिक व त्यांचे वारसदार यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाला सन्मान
यावेळी लक्ष्मण किशनराव कुलकर्णी, तुकाराम शंकरराव वारकड, श्यामसुंदर शंकरराव जहागीरदार, मनोहर एकनाथ केंद्रे, महाजन शंकर पिंपळदरे, वारसपत्नी उषा अरुणराव नातु, वारसपत्नी प्रभावती शंकरराव सरदेशपांडे, वारसपत्नी लिलाबाई विष्णुपंत ब्रम्हनाथकर, वारसपत्नी संजीवनीबाई बस्वेश्वर दरगु, वारसपत्नी शांताबाई गंगाधर तीवाडी, वारसपत्नी मथुराबाई अनंतराव जोशी, विजयकुमार श्रीनिवासराव कुलकर्णी, नंदकुमार माधवराव कुलकर्णी, वारसपत्नी कांताबाई शंकर अंकमवार, वारसपत्नी संगिता आनंदराव साखरेकर, रामा शेषेराव केंद्रे , मारोती गोविंद केंद्रे , शिवाजी भिमराव वाघमारे, शिवाजी गंगाराम देशमुख, दत्ता जळबा वाघमारे, वारसपत्नी धोंडयाबाई लक्ष्माण वाघमारे, उत्तम देवजी केंद्रे, संभाजी नागोजी केंद्रे, बालाजी मारोती मुंडकर, गंगाधर शेषेराव तेलंग, भिमराव गणपती वंजे, दशरथ नामदेव कल्याणकर, विश्वनाथ रामा गायकवाड, वारसपत्नी सोन्या बाई सुभाषराव मोरे, शेख शबीर मौलाना, आनंदा भुजंगा गायकवाड, गंगाराम ग्यानोबा कल्याणकर, नामदेव दत्ता तेलंग, वारसपत्नी निलावती भागवत ढगे, गुरुनाथ माणिकराव कुरुडे, पंढरीनाथ माणिकराव कुरुडे, आमृता मानोजी पाये, हुजुर कादरसाब शेख, निळबा सोनबा डाके, आनंदा पिराजी पाटील, बालाजी केशवराव गिरे, दादाराव मारुती शिंदे, उत्तम भिमराव तेलंग, वारसपत्नी प्रयागबाई श्रीराम शिंदे, उध्दव रामराव पुरी, वारसपत्नी रेणुकाबाई भानुदास ढाकणे, माधव मोतीराम कल्याणकर, शिवाजी शेषेराव कल्याणकर, वारसपत्नी कमलबाई संभाजी नखाते, वारसपत्नी प्रयागबाई उत्तम मुंडे, वारसपत्नी संताबाई नागोराव गित्ते, वारसपत्नी राऊबाई लक्ष्मलण केंद्रे, वारसपत्नी रुक्मनीबाई नारायण वडजे, वारसपत्नी धोंडयाबाई मारोती इप्पर, वारसपत्नी पदमीनबाई शंकर कल्याणकर, वारसपत्नी लक्ष्मीबाई बालाजी पेठकर, वारसपत्नी विमलबाई केरबा पेटकर, वारसपत्नी सखुबाई सोपान दासरे, वारसपत्नी कौतिकाबाई रघुनाथ गायकवाड, वारसपत्नी गोदावरीबाई विश्वनाथराव मानसपुरे, वारसपत्नी शकुंतला राजाराम निलावार, वारसपत्नी पदमीनबाई भाऊराव किडे, वारसपत्नी मंजुळाबाई काशीनाथ गोरे, पुरुषोत्तम धोंडोपंत देशपांडे, विठ्ठल बापुजी घोरबांड, वारसपत्नी शारदाबाई विनायकराव देशमुख , वारसपत्नी सुंदरबाई दत्तात्रय किडे, नागोराव रामजी वानखेडे, उत्तमराव गणपतराव कदम, सदाशिव साधू लोखंडे, त्र्यंबक केरबाजी कदम, दिगांबर परसराम कदम, भगवान संतराम आनेराव, बालाजी पांडूरंग आनेराव, संभा महादू कदम, किशन बाबुबुवा गोसावी, रघुनाथ सटवाजी केंद्रे, वारसपत्नी रेणुकाबाई गोविंदराव कदम, वारसपत्नी शोभाबाई श्रीराम कदम, वारसपत्नी जिजाबाई रंगनाथ कदम, वारसपत्नी रंजनाबाई विश्वांभर गंगोत्री व रुक्मीनबाई विश्वांभर गंगोत्री, प्रभाकर रामराव उंचाडकर यांचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शाल व सन्मानपत्र देवून सन्मान केला.
00000