Friday, June 27, 2025

वृत्त क्र. 670

'विकसित महाराष्ट्र 2047साठी सर्वेक्षणामध्ये

17 जुलैपर्यंत नागरिकांनी मत नोंदवावे

नांदेड दि.27 जून : भारत सरकारच्या विकसित भारत 2047 या दूरदृष्टी कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने विकसित महाराष्ट्र 2047 ही महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. यामध्ये विकसित महाराष्ट्र 2047 साठी व्हिजन डाक्यमेंट तयार करण्यात येणार आहे.  तरी नागरिकांनी 17 जुलै 2025 पर्यत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या क्युआर कोडवर व या लिंकवर https://wa.link/o93s9यावर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन नियोजन विभागाने केले आहे.

व्हिजन डाक्युमेंट तयार करण्याच्या अनुषंगाने नियोजन विभागाच्या 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये 6 मे 2025 ते 2 ऑक्टोंबर 2025 अशा 150 दिवसांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासाठी व्हिजन डाक्युमेंट तयार केला जात आहे. व्हिजन डॉक्युमेंटचा आराखडा तयार करण्यासाठी 16 संकल्पनांवर आधारीत क्षेत्रनिहाय गट बनविण्यात आले आहेत. यामध्ये कृषिशिक्षणआरोग्यग्राम विकासनगर विकासभूसंपदाजलसंपदापायाभूत सुविधावित्तउद्योगसेवासामाजिक विकाससुरक्षासॉफ्ट पॉवरतंत्रज्ञान व मानव विकासमनुष्यबळ व्यवस्थापन असे हे क्षेत्रनिहाय गट असतील. या सर्व गटांनी प्रगतीशीलशाश्वतसर्वसमावेशक व सुशासन यावर आधारित आराखडा तयार करावयाचा आहे. आराखडा तयार करताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीशासकीय/अशासकीय संस्थांशी सल्लामसलत करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमामध्ये व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे. व्हिजन डॉक्युमेंट तयार करताना दीर्घकालीनमध्यमकालीन व अल्पकालीन अशी टप्पानिहाय उद्दिष्टे ठेवण्याचे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले आहेत.

00000

 


  वृत्त क्र. 669

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन


नांदेड दि27 जून :- केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार दिला जातो. ज्या मुलांचे वय 5 वर्षापेक्षा अधिक व 18 वर्षापेक्षा कमी आहे, अशा मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जातो. तरी बाल शक्ती पुरस्कारासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश डी. वाघ यांनी केले आहे.  

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी अर्ज मागविले आहेत. हे अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जाणार आहेत. अर्ज करणाऱ्या मुलांचे वय 5 वर्षापेक्षा अधिक व 31 जुलै 2025 रोजी 18 वर्षापेक्षा कमी असावे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांचे प्रस्ताव वरीलप्रमाणे नमुद संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, जिल्हाधिकारी, जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था इत्यादी अर्ज करु शकतात असे  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 668

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

सांडपाणी प्रक्रिया संयंत्राची लवकरच उभारणी

सांडपाणी प्रक्रिया संयंत्र उभारणीसाठी 75 लक्ष रुपये निधी मंजूर

नांदेड दि27 जून :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड येथे सांडपाण्याचे शास्त्रशुध्द व्यवस्थापन करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया संयंत्राची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून 75 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली आहे.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सन 2021 पासून 450 केएलडी क्षमतेचा सिव्हेज ट्रीटमेंट प्लॉट एसटीपी कार्यान्वित आहे. हा एसटीपी प्लांट रुग्णालयातून येणाऱ्या सामान्य सांडपाण्याचे जैविक प्रक्रीयेद्वारे शुध्दीकरण करतो. त्याच्या मदतीने पर्यावरणपूरक पध्दतीने पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. तसेच पुनर्वापरासाठी पाणी उपलब्ध होते.

धोबीघाट, बायोमेडिकल वेस्ट साठवण क्षेत्र, ओटी कॉम्पलेक्स आणि प्रयोगशाळा यासारख्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या रासायनिक व संसर्गजन्य सांडपाण्याच्या शुध्दीकरणासाठी स्वतंत्र ईटीपी आवश्यक असल्याचे एमपीसीबीच्या अहवालात नमुद करण्यात आले होते. त्यामुळेच बीएमडब्लुएम नियम 2016 नुसार नवीन यंत्रणा उभारण्याची प्रक्रीया राबवीली जात आहे. या ईटीपी मध्ये प्राथमिक, दुय्यम आणि तृतीयक अशा तीन टप्प्यात सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. उपचारीत पाण्याचा वापर फ्लशिंग, बागकाम आणि स्क्रबरसाठी केला जाऊ शकतो. तसेच उर्वरित पाणी सुरक्षितपणे निचऱ्यात सोडले जाईल.

रुग्णालयातून होणाऱ्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे पर्यावरण रक्षण आणि सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे रुग्णालयाची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडली जाईल असे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितले आहे. तसेच रुग्णालयातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन या बाबींवर सातत्याने रुग्णालय प्रशासनाचे बारीक लक्ष असून यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना रुग्णालयात स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळण्यास मदत होणार आहे.

कोविड काळात सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट एसटीपी उभारणीसाठी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करुन मंजूरी मिळविली होती. त्याच धर्तीवर ईटीपी प्रकल्पासाठी प्रयत्न करुन हा प्रस्ताव मंजूरीपर्यत पोहोचविला असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली आहे.

00000

  वृत्त क्र. 666 

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष

ॲड निलेश हेलोंडे पाटील यांचा नांदेड दौरा  

नांदेड, दि. 27 जून :- कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड निलेश हेलोंडे पाटील हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.  

शुक्रवार 4 जुलै 2025 रोजी अमरावती येथून सकाळी 10.15 वा. नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. विश्रामभवन, जि.नांदेड येथे आगमन. दुपारी 3 वा. रोहयोअंतर्गत शासकीय गायरान जमीनीवर चारा लागवडीसंबंधी उपजिल्हाधिकारी (रोहयो) व तहसिलदार नांदेड यांनी सुचविलेल्या नांदेड तालुक्यातील जागेस भेट व पाहणी. सायं. 6 वा. सोईनुसार अमरावतीकडे प्रयाण करतील.

00000

  वृत्त क्र. 720   डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हिमालया बेबी फि डिंग सेंटर चा लोकाअर्पण सोहळा       नांदेड दि. 11 ...