Tuesday, August 5, 2025

वृत्त क्रमांक 816

 

उत्तराखंड येथे गेलेले नांदेड जिल्ह्यातील सर्व यात्रेकरू सुखरुप

 

नांदेड दि. 5 ऑगस्ट :- उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे आज ऑगस्ट 2025 रोजी परिस्थिती गंभीर आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे ढगफुटी झाली असून ज्यामुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले आहे आणि काही ठिकाणी भूस्खलन देखील झाले आहे.  उत्तराखंडमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. ज्यामुळे भूस्खलन आणि पूर आले आहेत. नांदेड जिल्ह्यातून बिलोली तालुक्यातील मौ. डोणगाव येथील 11 जण केदारनाथ बद्रीनाथ यात्रेसाठी ऑगस्ट रोजी नांदेड येथून निघाले होते त्यांचा संपर्क झाला  आहे.  ते सर्व सद्यस्थितीत घटनास्थळापासून 150 किमी दूर असून सर्व 11 जण सुखरूप असल्याचे जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रास सचिन पत्तेवार यांनी कळविले आहे. 

 

त्या अकरा जणांची नावे पुढील प्रमाणे आहेत. सचिन पत्तेवार वय 25,शिवचंद्र सुकाळे वय 30,शिवा कुरे वय 32,स्वप्निल पत्तेवार वय 25,शिवा ढोबळे वय 28,धनंजय ढोबळे वय 26,नागनाथ मुंके वय 28,देवानंद गौण्डगे वय 24,अमोल कुरे वय 28,सोमनाथ चंदापुरे वय 29, देवानंद चंदापुरे वय 27.  

 

उत्तरकाशी येथे घडलेल्या परिस्थितीवर नांदेड जिल्ह्याचे  पालकमंत्री अतुल सावे हे लक्ष ठेवून असून आवश्यकते नुसार कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील अजून कुणी उत्तराखंड येथे अडकून पडले असेल तर त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडे किंवा जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे (02462) 235077 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...