Sunday, August 11, 2024

  वृत्त क्र.  694

नांदेड शहरात एक धाव सुरक्षेची मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

महसूल पंधरवडा- आपत्ती बाबत जनजागृती करीता ज‍िल्‍हाधिकारी कार्यालयाचा उपक्रम

नांदेड दि. 11 ऑगस्‍ट : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ज‍िल्‍हाधि‍कारी कार्यालय, नांदेड व महाराष्‍ट्र राज्‍य आपत्‍ती व्यवस्थापन प्राध‍िकरण, महसूल व वन, मदत व पुनर्वसन आपत्‍ती व्‍यवस्‍थापन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या तर्फे आयोजित महसूल पंधरवडाचे औचित्य साधून एक धाव सुरक्षेची-Run For Safety या उपक्रमांतर्गत नांदेड येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. 

या स्पर्धेला निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे यांनी सहभागी स्‍पर्धक - युवक युवतीना आपत्‍तीमध्‍ये बचाव कसा करावा बाबत मार्गदर्शक केले व मॅरेथॉनला ह‍िरवा झेंडा दाखवून ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय, नांदेड येथून स्पर्धेची सुरुवात केली. या मॅरेथॉन स्पर्धेचा छ. श‍िवाजी महाराज पुतळा, एस.पी.ऑफीस, आय.टी.आय. कॉर्नर व्‍हीआयपी रोड मार्गे ज‍िल्‍हा क्रिडा संकुल येथे समारोप झाला. विविध आपत्ती संदर्भात युवक व युवतींमध्ये जनजागृती व्हावी आणि त्यांनी सुरक्षिततेचे नियम पाळावे या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ज‍िल्‍हयातील एन.एस.एस.,एन.सी.सी., स्‍काऊट व गाईड, होमगार्ड, व‍िवि‍ध र्स्‍पोर्ट अॅकडमी, आपदा मित्र, महसूल व‍िभागाचे अध‍िकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. श्रीन‍िकेतन वि‍द्यालय, एन.एस.बी. कॉलेज, सायन्‍स कॉलेज, प‍िपल्‍स कॉलेज, यशवंत कॉलेज, आय. टी. एम. कॉलेज, जवाहर महाव‍िदयालय,वसंतराव नाईक कॉलेज, म.फुले कॉलेज मुखेड सह नायगांव, अर्धापुर सह ज‍िल्‍हयातील शाळा कॉलेजच्‍या व‍िदयार्थ्‍याने मोठया उत्‍साहात सहभाग घेतला होता. 

या मॅरेथॉन मध्‍ये मुलीमध्‍ये प्रथम तेजस्‍वीनी संघरत्‍न कांबळे, द्वितीय आर्या भगवान दुथडे, तृतीय रंजना रमेश यादव व मुलामध्‍ये प्रथम र‍ितेश साहेबराव टोमके, द्वि‍तीय परमेश्‍वर सुर्यकांत रामापुरे, तृतीय लक्ष्‍मण दत्‍ता राठोड व‍िजेते ठरले. सायन्‍स कॉलेल व एन.एस.बी.कॉलेजच्‍या व‍िदयार्थानी चांगली कामगीरी केली.

ही मॅरेथॉन यशस्‍वी करण्‍यासाठी अभ‍िजीत राऊत मा.ज‍िल्‍हाध‍िकारी तथा अध्‍यक्ष ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरण नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली महेश वडदकर न‍िवासी उपज‍िल्‍हाध‍िकारी तथा मुख्‍य कार्यकारी अध‍िकारी, किशोर कुऱ्हे, ज‍िल्‍हा आपत्‍ती व्यवस्‍थापन अध‍िकारी यांच्‍या न‍ियोजनाखाली ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्रभागाचे महसूल सहायक बारकुजी मोरे यांनी सर्व व‍िभागाशी समनव्‍य ठेवून मॅरेथॉन यश्‍स्‍वी करण्‍याचा प्रयत्‍न केला. ज‍िल्‍हा क्रीडा अध‍िकारी, जयकुमार टेंभरे यांच्‍यासह ज‍िल्‍हा क्रीडा अध‍िकारी कार्यालयाचे अध‍िकारी, कर्मचारी, कोच व गणेश मुंढे -चौरंग मार्फत मॅरेथॉन स्‍पर्धेचे परीक्षण केले. यावेळी मल्‍लि‍कार्जुन करजगी- संचालक एन.एस.एस. स्‍वामी रामानंद ति‍र्थ मराठवाडा व‍ि‍द्यापीठ, एस.डी.आर.एफ. चे पोलीस निरीक्षक पी.एस. रुपदास सोनवणे, होमगार्डचे वरीष्‍ठ पलटन नायक शेख बसीरोद्दीन, बळवंत आटकोरे, शंकपाळे, आदीसह व‍िव‍िध शाळा महाविदयालय,एन.एस.एस,एन.सी.सी.,स्‍काऊट गाईड,होमगार्ड,एस.डी.आ.एफ.आपदा मित्र संबंधीत अध‍िकारी, कर्मचारी , प्राध्‍यापक, श‍िक्षक व कोच यांची उपस्‍थ‍िती होती.

000




  वृत्त क्र.  693

 20 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा कंपनीकडून जमा होणार रक्कम 

 जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 119 कोटी जमा 

नांदेड दि. १० ऑगस्ट : प्रधानमंत्री पिक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम 20 ऑगस्ट पर्यंत जमा केली जाणार आहे. आतापर्यंत 119 कोटी जमा झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नसेल त्यांनी 20 ऑगस्टनंतर तालुकास्तरीय कार्यालयात चौकशी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना हा लाभ दिला जात आहे .त्यासाठी त्यांच्या खात्यामध्ये थेट नुकसान भरपाई वितरित केली जात आहे.

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा नियोजन बैठकीमध्ये 20 ऑगस्ट पर्यंत विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई जमा करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार विमा कंपन्यांनी कारवाई सुरू केली आहे. 2लक्ष 54 हजार 333 शेतकरी नुकसान भरपाई साठी विमा कंपनीकडून लाभार्थी ठरले आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 178.61 कोटी रुपये मंजूर झाले आहे. 20 ऑगस्ट पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभाची रक्कम मिळावी असे निर्देशित करण्यात आले आहे.

10 ऑगस्टपर्यंत 1 लक्ष 41 हजार 575 शेतकऱ्यांच्या खात्यावर 119.2 कोटी रक्कम जमा झाली आहे. शेतकऱ्यांनी आपले खाते तपासून घ्यावे. जर विम्याची रक्कम आपल्या खात्यात जमा झाली नसेल तर मात्र 20 ऑगस्टपर्यंत वाट बघावी. 20 ऑगस्टपर्यंत ही विम्याची रक्कम खात्यावर जमा नसेल झाली तर विमा कंपनीच्या तालुकास्तरीय कार्यालयात चौकशी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

0000

Saturday, August 10, 2024

#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण

 वृत्त क्र.  692

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात पाच लक्ष अर्ज पात्र

17 ऑगस्टला डीबीटीद्वारे लाभ जमा होणा

नांदेड दि. 10 ऑगस्ट : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील महिलांचे पाच लक्ष अर्ज पात्र ठरले आहेत. या सर्वांच्या बँक खात्यामध्ये 17 ऑगस्ट रोजी दोन महिन्यांचा अर्थात तीन हजार रुपये जमा होणार आहे.

महिला व बालकल्याण विभागाने जारी केलेल्या एका पत्रकामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. पाच लक्ष अर्ज मंजूर झाले तरी ज्यांच्या खात्याशी आधार कार्ड संलग्न आहेत अशाच खात्यांमध्ये हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत. त्यामुळे आपले आधार कार्ड आपल्या बँक अकाउंटशी जोडले गेले आहे की नाही याची खातरजमा करण्याचे आवाहनही विभागामार्फत करण्यात आले आहे.

आपण अर्जात नमूद केलेले बँक खाते हे आधार सिडेट आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. बँक खात्याला आधार सीडींग केलेले नसल्यास तात्काळ आपले खाते ज्या बँकेत आहे, अशा बँकेत जाऊन आधार जोडणी करून घ्यावी. डीबीटीद्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी सदरची बाब आवश्यक आणि अनिवार्य आहे. 31 ऑगस्ट पर्यंत या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत आहे. 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज केला तरी सर्व पात्र लाभार्थ्यांना जुलै 2024 पासून दरमहा पंधराशे रुपये लाभ मिळणार आहे.

एक जुलै ते 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थींना 17 ऑगस्ट रोजी थेट डीबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट असे दोन महिन्याचा लाभ जमा होणार आहे. एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान प्राप्त अर्जाची छाननी होऊन दुसऱ्या टप्प्यात लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांना सूचना

नागरिकांना आवाहन करतानाच जिल्हा प्रशासनाने या कार्यात सहभागी असणाऱ्या समूह संसाधन व्यक्ती, बचत गट अध्यक्ष, बचत गट सचिव, गृहिणी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू बालवाडी सेविका, आशा सेविका, पर्यवेक्षिका, मदत कक्ष प्रमुख, या सर्वांना आवाहन केले आहे की, त्यांनी देखील ज्यांचे अर्ज नामंजूर असतील त्या सर्व लाभार्थ्यांची संपर्क करावा. त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्राची पूर्तता करावी. पुन्हा ऑनलाईन जमा करावेत. ज्यामुळे लाभार्थ्यांना लाभ मिळेल. त्यामुळे ज्यांच्या त्रुटी असतील त्यांच्याशी संपर्क साधून त्रुटी दूर करण्यात यावी, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

0000



वृत्त क्र. 691

विधानसभेसाठी आज विशेष मतदार नोंदणी अभियान
 
नांदेड, दि. 10 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीमध्ये आपण मतदार आहोत अथवा नाही याची खातरजमा करून घेण्यासाठी व नसेल तर आपले नाव यादीत घालण्यासाठी उद्या विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मतदान केंद्रावर जाऊन याबाबतची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 रविवार 11 ऑगस्ट रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविले जात आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन बीएलओकडे नाव वगळणे, कमी करणे, समाविष्ट करणे,तपासणी करणे ,ही प्रक्रिया करता येणार आहे.

जिल्ह्यामध्ये मतदार प्रारूप यादीचे दुसरे पुननिरीक्षण अभियान 6 ऑगस्ट पासून सुरू झाले आहे.उद्या दिनांक 11 ऑगस्ट रोजीही मतदान पुनरिक्षण राबविण्यात येणार आहे. याशिवाय पुढच्या आठवड्यात दिनांक 17 व 18 ऑगस्ट रोजी हे अभियान राबविण्यात येणार आहे.

000000


वृत्त क्र. 690

मोटार सायकल वाहनासाठी नविन मालिका 

पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 10 ऑगस्ट : परिवहन्नेतर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी MH26- CQ ही नविन मालिका मंगळवार 13 ऑगस्ट पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईलनंबर व ईमेलसह अर्ज 12 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 12 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता Text message/ दूरध्वनीद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. सर्वांनी याबाबतची नोंद घ्यावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 


 

सुधारित वृत्त क्र. 689 

मातंग समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन वचनबद्ध : शंभूराज देसाई

'आर्टी 'ची मागणी पूर्ण केल्याबद्दल राज्यस्तरीय मातंग समाजाच्या मेळाव्यात शासनाचे आभार

ना. देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्यावतीने समाज बांधवांतर्फे स्वीकारला सत्कार 

नांदेड दि. 10 ऑगस्ट : अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थे (आर्टी )ची स्थापना झाली आहे. आरक्षणाचाही प्रश्न लवकरच निकाली निघेल.राज्य शासन मातंग समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यास वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे केले. मुखेड येथे कै. गोविंदराव राठोड सभागृह क्रीडा संकुल येथे या कार्यक्रमाचे आयोजण करण्यात आले होते. 

आज नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात राज्यातील समस्त मातंग समाजाच्यावतीने राज्यस्तरीय समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये राज्य शासनाने 'आर्टी 'ची मागणी पूर्ण केल्याबद्दल राज्य शासनाचे मातंग समाजाच्या धुरीनांकडून जाहीर आभार व्यक्त करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी समाजाकडून जाहीर सत्कार स्वीकारला. 

या कृतज्ञता सोहळ्याला मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह आ.डॉ. तुषार राठोड,आ.बालाजी कल्याणकरमाजी खासदार हेमंत पाटीलमाजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळेमाजी आ. सुभाष साबणेमाजी आ. अविनाश घाटेमाजी आ. राम पाटील रातोळीकरमा.मुख्यमंत्री महोदयाचे खासगी सचिव बालाजी पाटील खतगावकर,आयोजक नारायणराव गायकवाड यांच्यासह महाराष्ट्रातील मातंग समाज संघटनेचे राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

1 ऑगस्टला  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती  महोत्सवानिमित्त अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)या संस्थेचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झाले. 

 राज्यातील मातंग समाजाच्या सामाजिकशैक्षणिक व आर्थिकविकास करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)ची स्थापना करण्याची मागणी मातंग समाजाची होती. आझाद मैदानामध्ये यासाठी आंदोलनही झाले होते.ही मागणी पूर्ण झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील सामाजिक कार्यकर्ते नारायणराव गायकवाड यांच्या पुढाकारात समस्त मातंग समाज बांधवाकडून  महाराष्ट्र सरकारचे जाहीर आभार व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.   

यावेळी बोलताना शंभूराज देसाई यांनी राज्य शासन मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी सकारात्मक  असल्याचे सांगितले. मातंग समाजाने आझाद मैदान येथे ज्या ज्या प्रमुख मागण्या मागितल्या होत्या. त्या मागण्या जवळपास पूर्ण झाल्या असून अन्य मागण्याही कायद्याच्या चौकटीत राहून पूर्ण करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात शासन कटीबद्ध असल्याचे सांगितले.   

आझाद मैदान येथील मातंग समाजाच्या आंदोलनातील आपल्या आश्वासनानंतर व त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिला होता तो पूर्ण केला आहे.अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)ची स्थापना झाली असून गोवंडी ( मुंबई ) येथे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. अंतर्गत आरक्षण अबकड गटाचा प्रश्न सोडविण्यासाठी सुरुवातीला अभ्यास गट गठीत करून ज्या राज्यामध्ये हे आरक्षण देण्यात आले होते. तेथील अभ्यास करण्यात आला. आरक्षण विषयक अंतर्गत वर्गवारी न्यायालयाच्या निर्देशानंतर पूर्ण केल्या जाईल असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी या विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.तुषार राठोड यांनी 'आर्टी 'साठी आपण सभागृहात बोललो होतो. त्याची पूर्तता झाल्याचे समाधान आहेअसे सांगितले. मुखेड एमआयडीसीचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. तसेच लेंडी नदीवरील प्रकल्प पूर्णत्वास नेण्याबाबतही पाठपुरावा करण्याची विनंती केली. 

मुखेड -देगलूर परिसरातील भूमिपुत्र आणि मुख्यमंत्री महोदयांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांनी 'आर्टी 'च्या माध्यमातून समाजाच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी देखील यावेळी समाजाने आपला शैक्षणिक आलेख वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. माजी खासदार हेमंत पाटील यांनीही यावेळी संबोधित केले. तसेच समाजाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.या कृतज्ञता सोहळ्याला राज्यभरातील विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध गायिका कोमल पोटाळे यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला.

0000


सुधारित वृत्त क्र. 689 

मातंग समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन वचनबद्ध : शंभूराज देसाई

'आर्टी 'ची मागणी पूर्ण केल्याबद्दल राज्यस्तरीय मातंग समाजाच्या मेळाव्यात शासनाचे आभार

ना. देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्यावतीने समाज बांधवांतर्फे स्वीकारला सत्कार 

नांदेड दि. 10 ऑगस्ट : अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थे (आर्टी )ची स्थापना झाली आहे. आरक्षणाचाही प्रश्न लवकरच निकाली निघेल.राज्य शासन मातंग समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यास वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे केले. मुखेड येथे कै. गोविंदराव राठोड सभागृह क्रीडा संकुल येथे या कार्यक्रमाचे आयोजण करण्यात आले होते. 

आज नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात राज्यातील समस्त मातंग समाजाच्यावतीने राज्यस्तरीय समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये राज्य शासनाने 'आर्टी 'ची मागणी पूर्ण केल्याबद्दल राज्य शासनाचे मातंग समाजाच्या धुरीनांकडून जाहीर आभार व्यक्त करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी समाजाकडून जाहीर सत्कार स्वीकारला. 

या कृतज्ञता सोहळ्याला मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह आ.डॉ. तुषार राठोड,आ.बालाजी कल्याणकर, माजी खासदार हेमंत पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आ. सुभाष साबणे, माजी आ. अविनाश घाटे, माजी आ. राम पाटील रातोळीकर, मा.मुख्यमंत्री महोदयाचे खासगी सचिव बालाजी पाटील खतगावकर,आयोजक नारायणराव गायकवाड यांच्यासह महाराष्ट्रातील मातंग समाज संघटनेचे राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

1 ऑगस्टला  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती  महोत्सवानिमित्त अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)या संस्थेचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झाले. 

 राज्यातील मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक, विकास करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)ची स्थापना करण्याची मागणी मातंग समाजाची होती. आझाद मैदानामध्ये यासाठी आंदोलनही झाले होते.ही मागणी पूर्ण झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील सामाजिक कार्यकर्ते नारायणराव गायकवाड यांच्या पुढाकारात समस्त मातंग समाज बांधवाकडून  महाराष्ट्र सरकारचे जाहीर आभार व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.   

यावेळी बोलताना शंभूराज देसाई यांनी राज्य शासन मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी सकारात्मक  असल्याचे सांगितले. मातंग समाजाने आझाद मैदान येथे ज्या ज्या प्रमुख मागण्या मागितल्या होत्या. त्या मागण्या जवळपास पूर्ण झाल्या असून अन्य मागण्याही कायद्याच्या चौकटीत राहून पूर्ण करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात शासन कटीबद्ध असल्याचे सांगितले.   

आझाद मैदान येथील मातंग समाजाच्या आंदोलनातील आपल्या आश्वासनानंतर व त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिला होता तो पूर्ण केला आहे.अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)ची स्थापना झाली असून गोवंडी ( मुंबई ) येथे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. अंतर्गत आरक्षण अबकड गटाचा प्रश्न सोडविण्यासाठी सुरुवातीला अभ्यास गट गठीत करून ज्या राज्यामध्ये हे आरक्षण देण्यात आले होते. तेथील अभ्यास करण्यात आला. आरक्षण विषयक अंतर्गत वर्गवारी न्यायालयाच्या निर्देशानंतर पूर्ण केल्या जाईल असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी या विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.तुषार राठोड यांनी 'आर्टी 'साठी आपण सभागृहात बोललो होतो. त्याची पूर्तता झाल्याचे समाधान आहे, असे सांगितले. मुखेड एमआयडीसीचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. तसेच लेंडी नदीवरील प्रकल्प पूर्णत्वास नेण्याबाबतही पाठपुरावा करण्याची विनंती केली. 

मुखेड -देगलूर परिसरातील भूमिपुत्र आणि मुख्यमंत्री महोदयांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांनी 'आर्टी 'च्या माध्यमातून समाजाच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी देखील यावेळी समाजाने आपला शैक्षणिक आलेख वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. माजी खासदार हेमंत पाटील यांनीही यावेळी संबोधित केले. तसेच समाजाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.या कृतज्ञता सोहळ्याला राज्यभरातील विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध गायिका कोमल पोटाळे यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला.

0000

















  वृत्त  भरती परीक्षा सुधारणांवर चर्चेसाठी उपस्थित राहण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन २१ सप्टेंबर रोजी उच्चस्तरीय समिती भेट देणार  छत्रपती स...