Friday, April 27, 2018


प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजना
लाभासाठी ग्रामसभेत उपस्थित राहून
माहिती संकलीत करण्यास सहाय्य करावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 27 :- प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजनेचा लाभासाठी सोमवार 30 एप्रिल 2018 रोजी ग्रामसभेत उपस्थित राहून माहिती संकलीत करण्यास सहाय्य करावे. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना देशभरात कोणत्याही अंगिकृत रुग्णालयात 5 लाख रुपयापर्यंत विनामुल्य शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे. 
जिल्ह्यात प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन राबविण्यात येत आहे. देशातील 10 कोटी कुंटुंबाना (50 कोटी लाभार्थी ) आरोग्य संरक्षण पुरविण्याचा भारत सरकारच्या नियोजनांतर्गत आरोग्य हे देशातील धोरण व राजकीय परिसंवादाचा मुख्य टप्पा बनला आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी लाभार्थ्यापर्यंत परिणामकारकरितीने पोहचणे आणि त्यांना योजनेचा तपशीलाविषयी माहिती देणे अत्यावश्यक आहे. याशिवाय योजना परिणामकारक राबविण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांची काही अतिरिक्त माहिती जमा करणे आवश्यक आहे.  त्याकरीता पहिली पायरी म्हणून आयुष्यमान भारत दिवस देशभरात 30 एप्रिल 2018 रोजी आयोजित होत असलेल्या ग्राम स्वराज्य अभियानादरम्यान लाभार्थी पडताळणी, अतिरिक्त माहिती जमा मोहिम सुरु करण्यात येत आहे.
या मोहिमेची दोन उद्दीष्टे असून पहिले उद्दीष्टे कार्यक्रमाविषयी त्याच्या लाभाबद्दल पात्र लाभार्थ्यांना माहिती देणे, दुसरे उद्दीष्टे विद्यमान लाभार्थ्यांच्या यादीचे प्रमाणीकरण आणि जेथे ग्रामसेवक, आशा आणि एएनएम यांच्या माध्यमातून अतिरिक्त माहिती जमा करणे. या योजनेंतर्गत ग्रामीण लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहिती संकलन मोहिम 15 एप्रिल ते 21 मे 2018 या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
अतिरिक्त माहिती संकलन मोहिमेमध्ये लाभार्थ्यांची पुढील बाबीवरील माहिती घेण्यात येणार आहे. मोबाईल व शिधापत्रिका क्रमांक, कुटुंबाच्या सदस्य स्थितीमधील बदल. या ग्रामसभेमध्ये याद्यांचे वाचन करुन अतिरिक्त माहिती संकलन करण्यात येणार आहे. ग्रामसभेमध्ये उपस्थित न राहणाऱ्या कुटुंबाची माहिती आशा, आरोग्य सेविकाद्वारे गृहभेटी देऊन 1 ते 8 मे 2018 या कालावधीत संकलीत केली जाणार आहे. ही माहिती संकलीत करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती यांची प्रशिक्षण घेण्यात येत आहे.
संकलित केलेली माहिती 8 ते 21 मे 2018 या कालावधीत वेबसाईटवर अपलोड केली जाणार आहे. लाभार्थी यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक कुटुंबास प्रती वर्षे 5 लाख रुपये इतके आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे. नागरिकांनी सोमवार 30 एप्रिल 2018 रोजी ग्रामसभेला उपस्थित राहून माहिती संकलित करण्यास सहाय्य करावे. त्यामुळे जास्तीतजास्त कुटुंबाना प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना देशभरात कोणत्याही अंगिकृत रुग्णालयात 5 लाख रुपयापर्यंत विनामुल्य शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे, असेही आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
00000



पालकमंत्री रामदास कदम यांचा दौरा 
नांदेड, दि. 27 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 30 एप्रिल 2018 रोजी औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वा. खरीप हंगाम आढावा बैठक स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड.  रात्री नांदेड येथे राखीव व मुक्काम.
मंगळवार 1 मे 2018 रोजी सकाळी 8 वा. महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.45 वा. नांदेड येथुन परभणीकडे प्रयाण करतील.
00000

Thursday, April 26, 2018


मन करा रे शांत !
तुमचा दिवस त्रासात जातआहे?.  तर मग येथे मन शांत आणि लक्ष केंद्रित करण्याची १५ मिनिटाची पध्दत आहे. बघा प्रयत्न करुन, जमतय का.
काही दिवस सगळ्या गोष्टी हाताबाहेर जात असतात. कामाचा ताण वाढत राहतो आणि काय करावे हे सुचत नाही. सततची येणारी कामे, अडचणी आणि लोक यांनी तुम्ही त्रासून जाता. शरीर काम करीत असत पण मनात एक वेगळे वादळ उठत असत. काहीच नीट नाही, हि भावना सर्व शक्ती शीण करीत असते.
दिवस अखेरीस, आपल्याला जड आणि तणाव पूर्ण वाटते. त्याहून वाईट म्हणजे, आपण काही तरी महत्वाचे विसरत नाहीना असे वारंवार वाटत राहते. आपण आपला मेंदू बंद करू शकत नाही, विचारांना आवर घालता येत नाही.
याचाच परिणाम म्हणून आपण घरी आल्यावर मुलांवर किंवा इतर लोकांवर चिडचिड करतो. आपला संपूर्ण तणाव मग घरच्यांवर निघतो, जे योग्य नाही. खाली नमूद असलेले साधे आणि सोपे उपाय १५ मिनिटात तुम्हाला प्रफुलीत करु शकतात.
मिनिटांची शारीरिक हालचाल
आधीच कार्यालयात कामे करताना आपले रक्त चांगलेच खवळले आहे तरी इमारतीच्या भवती जलद चालणे फायदेशीर ठरेल. हा एक ब्रेक आपल्या मनात उर्जा निर्माण करेल आणि मूड लिफ्ट करुन ताण खंडित होईल. लक्ष वेगळीकडे वळवल्याने मन शांत होईल आणि तुम्हाला हलके वाटेल. शरीराला आणि मनाला बदल मिळेल.
  मिनिटांची कृतज्ञता
आता आपल्या शरीरात हरलेल्या प्राण परत आले आहे. आपण आपले विचार साफ करण्याची सुरुवात करु शकता. आपण हे सर्व का करीत आहोत हे लक्षात घ्या. आपले जीवन मूल्यवान आहे आणि आपल्याला सुमारे किती लोकांचे समर्थन लाभले आहे ह्याचा विचार करा. त्या सर्व लोकांचे आपण भारी आहोत हि जाणीव कायम लक्षात ठेवा. चांगले आरोग्य, चांगली संधी आणि सुंदर वास्तव्य याच्याबदल कृतज्ञ राहा. आपण एक व्यापक दृष्टिकोन बाळगा. निवडक गोष्टींची टीप लिहून ठेवा. सध्या दुसऱ्या कामाची गरज नाही, महत्वाचे काम संपवा.
मिनिटाचे ध्यान
आता आपले शरीर आणि मन एका सकारात्मक स्थितीत आहेत. साफ मनाने आपले काम करु शकता. ध्यान हे स्वछ विचार आणि आपले केंद्र शोधण्याचे उत्तम साधन आहे. तुम्ही भरपूर गोष्टी ध्यान करण्यासाठी वापरु शकता. कोणी प्रार्थना म्हणत तर कोणी पाय हलवत एखाद गानं गुणगुणत. तुम्ही इंटरनेटवर छान सचित्र किंवा बातम्या वाचू शकता. ह्या सर्व गोष्टींचे तात्पर्य हे कि आपले मन शांत आणि सुखद झाले पाहिजे.
मिनिटाची शांतता
आता आपल्या मनात स्पष्ट करुन टाका की शांतता हवी.  तुम्ही बस एक शांत जागा शोधा आणि तिथे थोडा वेळ शांत बसा. आपल्या डेस्क येथील आपले फोन, दिवे, संगणक आणि सर्व इलेक्ट्रॉनिक्स उपकरण दोन मिनिटे बंद ठेवा.सर्व प्रेरणा बाहेर अवरोधित करा. स्वत: बरोबर एकटे राहा आणि आपले लक्ष शांततेकडे केंद्रित करा. फोनमध्ये दोन मिनिटाचा टाइमर सेट करा आणि शांत बसा. आता तुम्ही थंड आणि शांत आहात हे स्पष्ट होईल.
मिनिटाचा खोल श्वास
आता शांतपणे शेवटी एक मिनिट उभे रहा. अर्थात, तुम्हाला माहीत आहे की परत कामाला जुंपायचे आहे म्हणून ६० सेकंद दीर्घ श्वास घ्या. आपले पूर्ण लक्ष्य मंद श्वासाकडे केंद्रित करा. एका मिनिटाचा श्वास व्यायाम तुम्हाला ताजं आणि उत्साही बनवेल.आता जागेवर जाऊन परत काम सुरु करायचे आहे. हे काम त्रास घेता करायचे आहे असा चंग बांधा आणि कामावर नवीन जोमाने रुजू व्हा.
हे सर्व उपाय तुम्हाला शरीर आणि मन शांत करण्यास मदकरतील.चला तर मग सुरुवात करूया.!
सुजाता चंद्रकांत
******************

  वृत्त  भरती परीक्षा सुधारणांवर चर्चेसाठी उपस्थित राहण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन २१ सप्टेंबर रोजी उच्चस्तरीय समिती भेट देणार  छत्रपती स...