वृत्त क्रमांक
भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी नागरिकांनी सूचना व अभिप्राय सादर करावेत
• परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय समितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन
• 18 सप्टेंबरपर्यंत सूचना सादर करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका), दि. 16 : राज्यातील भरती परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी शासनाने परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय समिती (Exam Reform Task Force) गठीत केली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य शाखेत (परीक्षा) विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत नांदेड जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांतील विद्यार्थी-उमेदवार, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित घटकांकडून परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी सूचना, हरकती व अभिप्राय मागविण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील इच्छुकांनी दि. 18 सप्टेंबर 2026 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत आपल्या सूचना व अभिप्राय सादर करावेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात प्रत्यक्ष भेट देऊन अथवा ई-मेलद्वारे सूचना पाठविता येतील.
ई-मेलद्वारे सूचना पाठविण्यासाठी csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in आणि nandedrdc33@gmail.com या ई-मेल पत्त्यांचा वापर करावा.
परीक्षा प्रणालीचा आढावा, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता व सुरक्षितता, प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून निकाल जाहीर करण्यापर्यंतची प्रक्रिया, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, गैरप्रकारांना प्रतिबंध, उत्तम कार्यपद्धती आणि परीक्षा केंद्रांसाठी आवश्यक मानके या विषयांवर सूचना व अभिप्राय सादर करता येतील.
तक्रार निवारण व समन्वयासाठी संपर्क
विशेष कक्षाचे प्रमुख निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड (मो. 9890282222) हे आहेत. सहायक कक्षप्रमुख तहसीलदार (सर्वसाधारण) (मो. 7719031102) यांच्यासह सहायक म्हणून गजानन ऐनवाड, सहायक महसूल अधिकारी (मो. 9604058042) आणि ए. के. हिवाळे, महसूल सहायक (मो. 7767860444) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांतील विद्यार्थी-उमेदवार, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित घटकांनी परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी आपल्या सूचना, हरकती आणि अभिप्राय विहित मुदतीत विशेष कक्षात अथवा वरील ई-मेल पत्त्यांवर सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
**
No comments:
Post a Comment