Sunday, March 1, 2026

प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के प्रेरक शब्दों के साथ जुड़िए "हिंद-दी-चादर" ३५०वें शहीदी समागम से।


 

 "हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के 350वें शहीदी समागम के पावन अवसर पर, माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने सामाजिक एकता और गुरुओं के त्याग पर अपने विचार साझा किए। आइए, गुरु साहिब के चरणों में नमन करें और उनके बताए एकता के मार्ग पर चलें।


“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वा शहीदी समागम
मा. शरद राव ढोले यांनी आपल्या भाषणातून गुरु साहिबांच्या पवित्र शहीदीचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
श्रद्धा, सेवा आणि एकतेचा संदेश त्यांनी संगतपर्यंत पोहोचवला.



 

 “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वा शहीदी समागम

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा ताई अजित पवार यांच्या प्रभावी भाषणातून गुरु साहिबांच्या पवित्र शहीदीचा गौरवपूर्ण उल्लेख.
धर्म, मानवता आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे त्यांनी आवाहन केले.



“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वा शहीदी समागम

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या प्रभावी भाषणातून गुरु साहिबांच्या पवित्र शहीदीचा गौरवपूर्ण उल्लेख.
धर्म, मानवता आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश त्यांनी दृढपणे मांडला.



 

 “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वा शहीदी समागम

भारताचे केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह यांनी आपल्या भाषणातून गुरु साहिबांच्या पवित्र शहीदीचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
राष्ट्रएकता, श्रद्धा आणि सेवाभाव दृढ करण्याचा संदेश त्यांनी दिला.



अहंकारातून अहं-शून्यतेकडे… खारघरमध्ये उभारले ‘जुता घर’ सेवाभावाचे पवित्र प्रतीक

नवी मुंबई,दि.१: हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई  येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमासाठी लाखो भाविक उपस्थित राहणार असल्याने नियोजन अत्यंत बारकाईने करण्यात आले आहे.

 या नियोजनाचा एक अत्यंत भावनिक आणि आध्यात्मिक भाग म्हणजे कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेले ‘जुता घर’ भाविकांची पादत्राणे, बूट व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रवेशद्वाराजवळच डाव्या आणि उजव्या बाजूस उभारण्यात आलेले हे जुता घर चार विभागांत विभागलेले असून त्याची क्षमता  जवळपास दहा हजार पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था येथे करण्यात आली आहे.

 प्रत्येक विभागनिहाय नियोजनासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करून शिस्तबद्ध सेवा सुनिश्चित करण्यात आली आहे.परंतु हे केवळ पादत्राणे ठेवण्याचे ठिकाण नाही…

हे आहे अहंकारातून अहं-शून्यतेकडे नेणाऱ्या प्रवासाची सुरुवात.

माणसातला अहंकार कमी करण्याच्या भावनेतून अनेक भाविक स्वतःहून येथे सेवा देतात. इतरांची पादत्राणे नीट लावणे, त्यांची काळजी घेणे, हरवू नयेत म्हणून दक्ष राहणे—ही केवळ व्यवस्था नाही; ही नम्रतेची साधना आहे. सेवेतून आत्मिक समाधान मिळते, आणि ‘मी’पणाचा अंश हळूहळू विरघळत जातो.

मलाड, नेरुळ तसेच गुरु तेज बहादूर नगर येथील सेवक जत्थे या जुता घरात अहोरात्र सेवा बजावत आहेत. हजारो भाविकांच्या ये-जा मध्येही त्यांच्या चेहऱ्यावर समाधान, डोळ्यांत भक्ती आणि मनात समर्पण दिसून येते.

या सेवेमुळे कार्यक्रमस्थळावर शिस्त, स्वच्छता आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिथे पादत्राणे काढली जातात, तिथेच अहंकारही उतरवला जातो आणि खरी भक्ती तेव्हाच सुरू होते.

०००००००



  भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद #भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR