Saturday, August 31, 2019

मराठवाड्यात पावसाचे पुनरागमन
विभागात 343 मि.मी. पाऊस
अनेक जिल्ह्यांत दमदार पाऊस

औरंगाबाद,दि. 31 (विमाका) :- अनेक दिवसानंतर मागील चोवीस तासांत मराठवाड्यातील अनेक तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावून सुखद धक्का दिला. विभागातील सर्वच जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. विभागात एकूण 343.29 मि.मी. पाऊस झाला आहे. औरंगाबाद, जालना, नांदेड जिल्ह्यातील काही मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
मागील चोवीस तासांत औरंगाबाद जिल्ह्यात 22.70 मि.मी. पाऊस झाला. औरंगाबाद तालुक्यातील चितेपिंपळगाव (80.00 मि.मी.) आणि वैजापूर तालुक्यातील गारज (80 मि.मी.) मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जालना जिल्ह्यात 32.59 मि.मी. पाऊस झाला आहे. जालना तालुक्यातील जालना (75 मि.मी.), पाचनवडगाव (70 मि.मी.), भोकरदन तालुक्यातील भोकरदन (77 मि.मी.), राजूर (79 मि.मी.) मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. परभणी जिल्ह्यात 21.63 मि.मी. पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यातील झरी बु.(83 मि.मी.) मंडळात अतिवृष्टी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात 17.83 मि.मी. पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात 25.03 मि.मी. पाऊस झाला आहे. कंधार तालुक्यातील कुरूला (70 मि.मी.), उस्माननगर (80 मि.मी.), फुलवळ (80 मि.मी.), लोहा तालुक्यातील कलंबर (92 मि.मी.) आणि कापशी (79 मि.मी.) मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यात 16.15 मि.मी. पाऊस झाला आहे. बीड तालुक्यातील पिंपळनेर (95 मि.मी.) मंडळात अतिवृष्टी झाली आहे. लातूर जिल्ह्यात 28.12 मि.मी. पाऊस झाला आहे. चाकुर तालुक्यातील शेळगाव (72 मि.मी.) मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 13.86 मि.मी. पाऊस झाला आहे. उमरगा तालुक्यातील नारगवाडी (77 मि.मी.) मंडळात अतिवृष्टी झाला आहे.
जिल्हानिहाय  आजपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. औरंगाबाद- 360.22 मि.मी, जालना -317.48  मि.मी, परभणी -312.65 मि.मी, हिंगोली - 407.96 मि.मी, नांदेड 520.83 मि.मी, बीड 202.06 मि.मी. लातूर 334.29 मि.मी, आणि उस्मानाबाद 290.85 मि.मी.
आज सकाळी मागील चोवीस तासांतील पाऊस व कंसात आजपर्यंत झालेला पाऊस याची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
औरंगाबाद जिल्हा- औरंगाबाद 34.00 (307.90), फुलंब्री 30.25 (358.50), पैठण 35.00 (268.63), सिल्लोड 6.50 (475.69), सोयगाव 8.67 (536.33), वैजापूर 28.40 (319.00), गंगापूर 23.78 (288.00), कन्नड 27.00 (387.63), खुलताबाद 10.67 (300.33). जिल्ह्यात एकूण 360.22 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जालना जिल्हा- जालना 40.00 (261.19), बदनापूर 45.20 (312.80), भोकरदन 37.38 (433.75), जाफ्राबाद 19.20 (332.80), परतूर 25.16 (312.42), मंठा 18.75 (292.00), अंबड 40.00 (316.57), घनसावंगी 35.00 (278.29), जिल्ह्यात एकूण 317.48 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
परभणी जिल्हा- परभणी 26.75 (282.31), पालम 5.67 (262.33), पूर्णा 34.80 (421.40), गंगाखेड 30.75 (318.00), सोनपेठ 30.00 (309.00), सेलू 15.20 (274.00), पाथरी 11.00 (283.33), जिंतूर 26.17 (305.83), मानवत 14.33 (357.67), जिल्ह्यात एकूण पावसाची नोंद 312.65 मि.मी. झाली आहे.
हिंगोली जिल्हा- हिंगोली 16.86 (376.86), कळमनुरी 2.17 (489.08), सेनगाव 10.83 (368.83), वसमत 18.29 (302.29), औंढा नागनाथ 41.00 (502.75). जिल्ह्यात एकूण 407.96 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्हा- नांदेड 23.13 (528.75), मुदखेड 25.00 (562.00), अर्धापूर 25.00 (445.66), भोकर 2.75 (508.25), उमरी 20.67 (513.79), कंधार 60.83 (493.83), लोहा 54.50 (452.25), किनवट 7.43 (676.76), माहूर 13.00 (666.81), हदगाव 4.86 (466.56), हिमायत नगर 14.67 (570.99), देगलूर 25.00 (387.66), बिलोली 23.80 (554.40), धर्माबाद 34.67 (539.67), नायगाव 41.40 (517.20), मुखेड 23.71 (448.71), जिल्ह्यात एकूण 520.83 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
बीड जिल्हा- बीड 18.91 (210.18), पाटोदा 1.75 (222.50), आष्टी 3.80 (179.14), गेवराई 27.70 (185.00), शिरुर कासार 20.33 (149.67), वडवणी 36.00 (222.50), अंबाजोगाई 16.40 (187.60), माजलगाव 19.17 (286.70), केज 1.57 (166.29), धारुर 11.67 (166.00), परळी 20.40 (247.11), जिल्ह्यात एकूण 202.06 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
लातूर जिल्हा- लातूर 13.25 (216.25), औसा 17.86 (233.57), रेणापूर 22.50 (283.75), उदगीर 31.86 (326.00), अहमदपूर 47.67 (469.83), चाकुर 49.80 (320.60), जळकोट 20.50 (447.50), निलंगा 31.75 (375.88), देवणी 28.67 (361.50), शिरुर अनंतपाळ 17.33 (308.00), जिल्ह्यात एकूण 334.29 मि.मी. पाऊस झाला आहे.
उस्मानाबाद जिल्हा- उस्मानाबाद 5.75 (282.25), तुळजापूर 17.57 (382.29), उमरगा 32.00 (382.80), लोहारा 54.00 (427.33), कळंब 1.33 (216.67), भूम 0.20 (241.50), वाशी 0.00 (253.00), परंडा 0.00 (141.00), जिल्ह्यात एकूण 290.85 मि.मी. पाऊस झाला आहे.
******

वृ.वि.2330
31ऑगस्ट, 2019
विशेष वृत्त :

महाराष्ट्र राज्यांतर्गत एक लाख रुपयांपर्यंतच्या
मालवाहतुकीवर ई वे बिल नाही
- सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 31: महाराष्ट्रात एक लाख रुपयांपर्यंत माल वाहतुकीवर "ई-वे" बील नाही.इतर राज्यात ई वे देयकासाठी ५०  हजार रुपयांपर्यंतच्या पुरवठा मुल्याचा माल अशी मर्यादा असल्याचेवित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
कराचे व्यवस्थित अनुपालन व्हावे, कर चुकवेगिरीला आळा बसावा  या उद्देशाने वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत ई वे बिल ची  अंमलबजावणी सुरु झाली आहे. राज्यात ई वे बिल प्रणाली १ एप्रिल २०१८ पासून लागू झाली. त्यानंतर आतापर्यंत ११ कोटी ९२ लाख ५७ हजार ३१५ इतकी ई वे देयके तयार झाली आहेत.  एका जून महिन्यातच ७७ लाख ४१ हजार ४०७ इतकी ई वे देयके तयार झाली आहेत.   ई वे देयक निर्मितीमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी आहे.
यात राज्य निहाय ई वे देयक देण्याची आवश्यकता नसते. संपूर्ण देशात एकच ई वे देयक वापरता येते. वेगवेगळ्या तपासणी नाक्यांवर वाहने न थांबवल्यामुळे मालाची वाहतूक मुक्त होऊन वाहतूक व्यवस्था गतिमान झाल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
आंतरराज्य माल वाहतूक करताना देशात सर्वत्र  ५० हजार रुपये इतकी  ई- वे बिल मर्यादा आहे. राज्यातील लहान व्यापाऱ्यांना त्यांचा उद्योग व्यवसाय करणे सोपे जावे, अडचणीचे ठरू नये यादृष्टीने छोट्या व्यापाऱ्यांसाठी ई वे बिलची राज्यांतर्गत मालवाहतूकीसाठीची मर्यादा १ लाख रुपये इतकी ठेवण्यात आल्याने  राज्यातील छोटे व्यापारी, , उद्योग-व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
कोणत्याही मूल्याच्या कापसाच्या लडी, सूत, कापड, कपडे यासारखा माल राज्यांतर्गत ५० कि.मी पर्यंतच्या अंतरावर प्रक्रिया करण्यासाठी पाठवल्यास त्यास ही ई वे बिलामधून वगळण्यात आले असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
००००


वृ.वि.2331
31ऑगस्ट, 2019
विशेष वृत्त :
२४ तासात शिष्यवृत्ती आणि जातपडताळणी प्रमाणपत्र मिळणार
- सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे

मुंबई, दि.३१ : शिष्यवृत्ती आणि जातपडताळणी प्रमाणपत्र हे महत्त्वाचे दस्तऐवज असल्यानेअवघ्या २४ तासात दोन्ही प्रमाणपत्र मिळवून देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री डॉ. खाडे यांनी दिली.
  शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी समाज कल्याण विभागाचे अधिकारी स्वतः महाविद्यालयात जाऊन वैयक्तिक पातळीवर मदत करतात मात्र  शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाशी सम्पर्क साधल्यास या विद्यार्थ्यांना अवघ्या २४ तासात जातपडताळणी आणि शिष्यवृत्ती प्रमाण पत्र मिळवून देण्यात येईल.
दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक देशाची संपत्ती असल्यामुळे यांचे हक्क मिळवून देण्यास विभाग प्रयत्नशील आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना विसावण्यासाठी विरंगुळा केंद्र बांधले,अपंगांनी जिल्हा निहाय नोंद केल्यास त्यांचे हक्क मिळून दिले जातील तसेच उद्योग, व्यवसाय आणि शिक्षणातला वेळ वाचविण्यासाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी मागासवर्गीय प्रवर्गासाठी स्मार्टकार्ड कार्ड दिले जातील. हे स्मार्ट कार्ड अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी फायदेशीर ठरतील असा विश्वास श्री. खाडे यांनी व्यक्त केला.
  सामाजिक न्याय विभाग प्रत्येक तालुक्यात प्रत्येकी १०० खाटांचे दोन मुलींचे व मुलांचे वसतिगृह बांधणार असून वसतिगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जाईल. भाडे तत्त्वावरील वसतिगृह बंद  केले जातील,मागासवर्गीय घटकातील नवउद्योजकांना सामाजिक न्याय विभागाकडून प्रशिक्षण  दिले जाणार आहे.
  मातंग समाजातील प्रत्येकाला आश्रय असावा, हक्काचे घर असावे यासाठी घरकुल योजनेंतर्गत सव्वालाख घरकुल बांधण्यात आले आहेत. या समाजातील कलाकारांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यास सामाजिक न्याय विभागातर्फे प्रयत्न  केले जातील.
००००


वृ.वि.2332
31ऑगस्ट, 2019

'जय महाराष्ट्र' ‘दिलखुलासकार्यक्रमात
आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ.परिणय फुके

 मुंबई,दि.31: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित जय महाराष्ट्र'दिलखुलास' कार्यक्रमात आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांची आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी...या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता प्रक्षेपित होणार आहे. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दि. 3 सप्टेंबर आणि बुधवार दि.4 सप्टेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.
आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या निवारण्यासाठी आश्रमशाळा व  वसतिगृहांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छता व इतर सोयीसुविधा निर्माण करून  देण्यासाठी विभाग करत असलेले प्रयत्न, आदिवासी विकास महामंडळामार्फत खरेदी केले जाणारे धान्य, आदिवासी युवकांना मुख्य प्रवाहात आणून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख बनविण्यासाठी केलेली प्रशिक्षणाची सोय,आदिवासी आश्रमशाळेतील व वसतिगृहातील   विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विभाग करत असलेले प्रयत्न, जात वैधता प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध होण्यासाठी शासन करत असलेल्या उपाययोजना आदी विषयाची  माहिती डॉ.फुके यांनी जय महाराष्ट्रदिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.
0000


वृ.वि.2333
31ऑगस्ट, 2019
विशेष वृत्त :

महाआरोग्य शिबिराद्वारे आदिवासी भागात केवळ चार दिवसात
60 हजार रुग्ण तपासणी तर 2000 शस्त्रक्रिया!
मुंबई, दि. 31 : राज्यात आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून 16 जिल्ह्यांमध्ये केवळ चार दिवसांत सुमारे 60 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली, तर सुमारे 2 हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गरजू व गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आल्याने त्यांना या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून दिलासा देण्यात आला आहे. सुमारे 1 हजाराहून अधिक शासकीय, खासगी डॉक्टर आणि विशेषज्ज्ञांनी सहभाग घेऊन रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया केल्या. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 9100 रुग्णांची तपासणी करतानाच गडचिरोली जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक 325 शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
 संकल्प निरोगी महाराष्ट्राचाहे ब्रीद घेऊन राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे, पुणे आणि अहमदनगर या 16 जिल्ह्यांमध्ये 26 ते 29 ऑगस्ट दरम्यान महा‍शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा राज्यस्तरीय शुभारंभ ठाणे येथून करण्यात आला होता.
 त्यामध्ये आरोग्य तपासणी, मोफत चाचण्या, मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून दंत, कान, नाक, घसा, त्वचा या विशेषज्ज्ञांनी रुग्णांची तपासणी करतानाच एमबीबीएस, बीएएमएस, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी अशा सुमारे हजाराहुन अधिक डॉक्टरांनी महाशिबिरात तपासणी केली.
अमरावती जिल्ह्यामध्ये सुमारे 5 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली तर 152 जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. नांदेडमध्ये 4 हजार रुग्णांची तपासणी आणि 275 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याच पद्धतीने धुळे जिल्ह्यात 1600 रुग्णांची तपासणी आणि 50 जणांवर शस्त्रक्रिया झाली. नागपूर जिल्ह्यात 2200 रुग्णांची तपासणी करुन सुमारे 90 रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली. नंदुरबार येथे 1500 रुग्णांची तपासणी तर 70 शस्त्रक्रिया झाल्या. पालघरमध्ये 4 हजार रुग्ण तपासणी आणि 200 शस्त्रक्रिया, यवतमाळ येथे 4 हजार 100 रुग्ण तपासणी आणि 50 शस्त्रकिया, जळगाव येथे 950 रुग्ण तपासणी तर 60 शस्त्रक्रिया, गडचिरोली येथे 3800 रुग्ण तपासणी तर 325 शस्त्रक्रिया, चंद्रपूर येथे 2700 रुग्ण तपासणी तर 75 शस्त्रक्रिया, ठाणे येथे 5540 रुग्ण तपासणी आणि 125 शस्त्रक्रिया, गोंदिया येथे 4220 रुग्ण तपासणी आणि 40 शस्त्रक्रिया, रायगड येथे 7325 रुग्ण तपासणी आणि 105 शस्त्रक्रिया, पुणे येथे 1600 रुग्ण तपासणी आणि 225 शस्त्रकिया करण्यात आल्या. अहमदनगर येथे 2100 रुग्ण तपासणी तर 80 शस्त्रक्रिया झाल्या. आणि नाशिक येथे 9100 रुग्ण तपासणी आणि 25 शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
शेवटच्या घटकातील नागरिकांना दिलासा
आदिवासी भागातील शेवटच्या घटकातील गरजू रुग्णापर्यंत आरोग्य सेवा मिळावी या हेतूने या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व रुग्णांची मोफत तपासणी करतानाच आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या आणि गरजेनुसार शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात आल्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या शिबिरांमध्ये 14 विविध प्रकारच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून तपासण्या करण्यात आल्या. त्याचाआदिवासी भागातील जनतेला लाभ झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आजाराच्या उपचारासोबतच आजार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर विभागाने भर दिला असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
००००
अजय जाधव/वि.सं.अ./31.8.19

 वृ.वि.2335

31ऑगस्ट, 2019
विशेष वृत्त :

स्पॉट पंचनामा ग्राह्य धरणार
पुरात वाहून गेलेल्यापशुधनासाठीप्रत्येकी 30 हजार रुपयांचे साहाय्य
-सुभाष देशमुख
मुंबई, दि. 31 :पुरात वाहून गेलेल्या दुधाळ जनावरांसाठी प्रत्येकी 30 हजार रुपय मदत दिली जाणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.
पुरग्रस्त भागातील  पशुधन वाहून गेलेल्या पशुधनाला आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अशा पशुधनाचे मालक असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी तलाठी, पोलीस पाटील, सरपंच, ग्राम पातळीवरील सहकारी दूध संघाचे संचालक व संबंधित पशुधनाचे मालक यांनी स्वाक्षरी केलेला स्पॉट पंचनामा, मदतीसाठी ग्राह्य घरण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
नुकसान झालेल्या जनावरांच्या गोठ्यांसाठीही मदत करण्यात येत आहे. असा गोठा घराला जोडून असला किंवा शेतात असला तरीही  राज्य आपत्ती प्रतिसाद  निधीच्या दरानुसार 2100 रुपये प्रती गोठा मदत देण्यात येईल.
शेतीसाठी एक हेक्टरपर्यंत पीक कर्ज माफ, बाधीत कुटुंबांना तीन महीने गहू आणि तांदूळ मोफत वाटप करण्यात येत आहे. पडझड झालेल्या घरांचे बांधकाम प्रधानमंत्री आवास योजनेतून करतानाच राज्य शासनाकडून अतिरीक्त एक लाख रुपये दिले जातील. घरांचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या निवाऱ्यासाठी ग्रामीण भागात 24 आणि शहरी भागात 36 हजार रुपये देण्यात येतील. कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुली तीन महिने स्थगित करण्यात आली आहेत.
सामाजिक संस्थांची आर्थिक व कामाची कुवत  विचारात घेवून त्यांना कोणते गाव दत्तक देता येईल याबाबत जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त हे संयुक्तपणे निर्णय घेतील. या कार्यक्रमातंर्गत घर बांधणीसाठी शासकीय जागा उपलब्ध नसल्यास  भूसंपादन करून जागा उपलब्ध करून दिली जाईल. पायाभूत सुविधांमध्ये विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, रस्ते या सुविधा जिल्हाधिकारी यांनी नियमित योजनेमधून निर्माण करून देण्यात येतील.
छोटे गॅरेज,छोटे व्यावसायिक, हस्तकला, हातमाग कारागिर,बारा बलुतेदार, दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारक यांना नुकसानीच्या 75 टक्के किंवा 50 हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
 कुटुंब निश्चित करण्यासाठी केवळ शिधापत्रिकेचा आधार न धरता दोन वेगवेगळी घरे,दोन वेगवेगळी वीज देयके, दोन  गॅस  कनेक्शन किंवा इतर असा पुरावा जो कुटुंब स्वतंत्र असल्याचे सिध्द होत असेल तर तो ग्राह्य धरण्यात येणार आहे. असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
००००





Friday, August 30, 2019

यशकथा


प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेला गावकऱ्यांचा प्रतिसाद
मुख्यमंत्री सहायता निधीतून गणीपूरचा कायापालट
           
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील मौजे गनीपूर हे गाव.... गनीपूर निसर्गरम्य डोंगराळ भागात वसलेले एक छोटेसे गांव आहे. गनीपूर गावाच्या पश्चिमेकडे असलेल्या मौ. सोमठाना गावाकडून एक नाला, पूर्वेकडे असलेल्या मौ.बिनताळ गावकडून एक नाला , उत्तरेकडून मौ. जिरोना गावाकडून एक नाला वाहत येतो. हे तिन्ही नाले मौ. गनीपूर गावानजीक येवून संगम पावतात. गावाच्या उत्तरेकडून मौ. वघाळाकडे ( दक्षिण उत्तर) वाहत जातो. हा नाला गावाच्या उत्तरेस असलेल्या दोन पर्वतामधून वाहतो. याच नाल्यावर मौ. गनीपूर, जिरोना, हिरडगाव आणि सोमठाणा या गावाकरिता पाणी पुरवठा करणाऱ्या दोन पाणी पुरवठा विहीरी आहेत. अपुऱ्या पर्जन्यामनामुळे विहीरीच्या पाणी पातळीत दिवसें-दिवस खालावली जात होत्या. परिणामी त्या दोन विहीरी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यातच कोरड्या पडत होत्या. परिणामी तेथे पाणी टंचाईचा सामना करावा आगत होता.
           
जिल्हा प्रशासन व लोक प्रतिनिधी यांच्या प्रयत्नामुळे मौ. गणीपूर गाव मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतंर्गत सन 2016-2017 मध्ये निवडले गेले होते. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली या गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी जलसंधारण विभागामार्फत एकत्रित संगम झालेल्या नाल्यावर मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून दोन पश्चिमेकडून वाहत येणाऱ्या नाल्यावर जलयुक्त शिवार अभियानातून एक असे तिन सिमेंट नाला बांध मंजूर करण्यात आला . या कामामुळे गावातून वाहून जाणारे पाणी गावातच अडविले . यातून जास्तीत-जास्त पाणीसाठा निर्माण झाला व गावाच्या बाजूच्या बोअर व विहीरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच शेतीसाठी सुरक्षित सिंचन उपलब्ध झाले आहे.
            उमरी तालुक्यातील गणीपूर हे तालुक्यापासून 6 ते 8 कि.मी. अंतरावर गाव असून 600 ते 700 लोकसंख्या असलेल्या गावात पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी सहकार्य व श्रमदानातून पाणी प्रश्न सोडवण्यात यश आले. जवळपास 47 मीटर लांबी व साडेतीन मीटर उंचीचा सिमेंट नाला बांध, तसेच दुसरा 29 मीटर लांब व 2 मीटर उंचीचा नाला बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले. या बंधाऱ्यामुळे गणीपूरसह सात ते आठ जवळपासच्या गावातील जनावरासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटला असून हा बंधारा दुष्काळात वरदानच ठरले आहे.                                                                      
-         मीरा ढास,
प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड  
00000


महाजनादेश रॅली यात्रेतील लक्झरी बसेस,
इतर जड वाहनांना शहरातून जाण्यास परवानगी  
नांदेड, दि. 30 :- जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी महाराष्ट्र मोटार वाहन कायदा 1988 मे कलम 115 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन 13.2.2019 रोजीच्या नमूद अधिसुचनेद्वारे खाजगी बसेस/ट्रॅव्हल्स, सहाआसनी ॲटोरिक्षा, मिनी-डोअर, काळी-पिवळी टॅक्सी यांना नांदेड शहरामध्ये अधिसूचनेत नमूद प्रमाणे केलेली प्रवेशबंदी 30 व 31 ऑगस्ट 2019 कालावधीत केवळ मुख्यमंत्री महोदयांच्या महाजनादेशयात्रेच्या ताफ्यातील लक्झरी रथ व इतर जड वाहनास शहरात प्रवेशासाठी बंदीची अट शिथील करण्यात आली आहे.
हा आदेश केवळ मुख्यमंत्री महोदयांची महाजनादेश यात्रेकरिता अंमलात राहील. त्यानंतर हा आदेश संपुष्टात येऊन 13 फेब्रुवारी 2019 रोजीची अधिसुचना कायम राहील, असे आदेशात म्हटले आहे.
00000


इमारत बांधकाम / विस्तार नूतनीकरणासाठी
शासनमान्य ग्रंथालयांकडून अर्ज आमंत्रित
नांदेड, दि. 30 :- भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी योजनेतंर्गत 'इमारत बांधकाम/विस्तार नूतनीकरण' या योजनेसाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई यांच्या मार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते. त्या संदर्भातील नियम, अटी अर्जांचा नमूना www.rrrlf.nic.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी तो या संकेतस्थळावरुन उपलब्ध (download) करुन घ्यावा.
समान निधी योजना (Matching Seheme) (2018-19 साठी) :- राज्य शासनाचे 50% प्रतिष्ठानचे 50% अर्थसहाय्य देण्यात येते. सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत बांधकाम / विस्तार नूतनीकरण अर्थसहाय्य (कमाल मर्यादा 10 लक्ष) आहे. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी संबंधित नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक महितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.nic.in हे संकेतस्थळ पहावे. ग्रंथालयांनी समान निधी या योजनेंतर्गत इमारत बांधकाम / विस्तार नूतणीकरणासाठीचा प्रस्ताव (विहित नमूद पध्दतीत) आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी/हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि.16 सप्टेंबर, 2019 पर्यंत पोहोचतील अशा बेतान पाठवावेत, असे आवाहन सुभाष हि.राठोड, ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई यांनी राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना केले आहे.
00000

  विशेष वृत्त एसआयआरच्या पुढील टप्प्यातील प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व सर्वसमावेशक ठेवा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम पुढील टप्प्...