Thursday, June 22, 2017

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा
 हप्ता भरण्यास 31 जुलै पर्यंत मुदत

नांदेड, दि. 22 :- राज्यात खरीप हंगाम 2017 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हयात भात, खरीप ज्वारी, तीळ, मुग, उडीद, तुर, सोयाबीन व कापुस या पिकांसाठी ही योजना लागु आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पक विमा उतरवण्याची अंतिम मुदत सोमवार 31 जुलै 2017 पर्यत आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी किंव जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
 या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी 2 टक्के व कापसासाठी 5 टक्के ठेवण्यात आला आहे. जोखीम स्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे. पीक पेरणीपासुन काढणी पर्यंतचा कालावधी नैसर्गीक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पुर, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग आदी बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणी पश्चात नुकसान त्यादी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री पक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचीत क्षेत्रातील अधिसुचीत पिकांसाठी बंधनकारक अस, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाच्छिक आहे. जिल्हयात खरीप हंगाम 2017 मध्ये ही योजना भारतीय कृषि विमा कंपनी लिमीटेड नवन स्टॉक एक्सेंज बिल्डींग, 20 वा मजला, दलाल स्ट्रीट, ुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत विमा संरक्षीत रक्कम व विमा हप्ता पुढील प्रमाणे राहणार आहे.
पीक
विमा संरक्षीत रक्कम रु. / हेक्टर
शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता (रु)
भात
39,000/-
780/-
ख.ज्वार
24,000/-
480/-
तुर
30,000/-
600/-
मुग
18,000/-
360/-
उडीद
18,000/-
360/-
सोयाबीन
40,000/-
800/-
तीळ
22,000/-
440/-
कापुस
40,000/-
2,000/-

0000000
स्टेट बँक विमा कंपनीकडून
दोन लाखाचा धनादेश वितरीत
नांदेड दि. 22 :-  स्टेट बँक ऑफ इंडिया जनरल विमा कंपनीकडून दोन लाख रुपये अपघात विम्याचा धनादेश स्टेट बँक ऑफ इंडिया गुरुद्वारा चौक शाखेत मयत शिवाजी बरोले यांच्या आईस बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक राजेंद्र पत्की यांच्या हस्ते आज देण्यात आला.
शिवाजी बरोले (20 वर्षे) हा तरुण स्टेट बँक ऑफ पटियाला येथे रोजंदारीवर काम करत होता. कर्तव्य बजावण्यासाठी घरुन निघाले असता वाटेत त्यांचा मालवाहू ट्रकच्या धडकेने अपघाती मृत्यू झाला. भारतीय स्टेट बँकेने सुरु केलेल्या अपघात विमा योजनेंतर्गत शिवाजी बरोले यांनी शंभर रुपये भरुन विमा काढला होता. अपघाती मृत्यू नंतर त्याचा लाभ त्यांच्या कुटुंबियांना झाला आहे.
यावेळी स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक विजय खेडकर, संघटनेचे प्रतिनिधी जसबीरसिंघ तुटेजा, शाखा प्रबंधक मनदीपसिंघ, इन्शोरन्स कंपनीचे विजय राठोड, रामेश्वर जाधव यांची उपस्थिती होती.

0000000
अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी
10 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 22 :- अण्णा भाऊ साठे गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रे, गुणपत्रक व पुढील वर्गात प्रवेश घेतल्याच्या पुराव्यासह सोमवार 10 जुलै 2017 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. 
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळामार्फत इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदवीव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी आदी आभ्यासक्रमामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचे वितरण केले जाणार आहे. सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्याने 80 टक्के गुणाने उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम बारा पोट जातीतील विद्यार्थ्यांना महामंडळाकडून ज्येष्ठता व गुणक्रमानुसार उपलब्ध निधीच्या अधीन राहून अण्णाभाऊ साठे गुणवत्ता शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे.  
अर्ज जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन हिंगोली रोड नांदेड या ठिकाणी देण्यात यावीत. सोमवार 10 जुलै नंतर अर्ज स्विकारल्या जाणार नाहीत, असेही आवाहन महामंडळाने केले आहे.  

000000
अनुदान, बीजभांडवल योजनेसाठी  
  साठे विकास महामंडळाचे आवाहन
नांदेड दि. 22 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने अनुदान योजना व बीजभांडवल योजनेचा लाभ बँकेमार्फत देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे घेवुन महामंडळाच्या नांदेड जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजनेचे 1 हजार 150 व बीज भांडवल योजनेचे 225 उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. या योजनेत स्थिर भांडवल निर्मितीसाठी उद्योगाचे कर्ज जसे वाहन, यंत्रे व मशिनरी खरेदीसाठी उद्दीष्ट देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, दोन छायाचित्रे, राशन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, व्यवसाय जागेचा पुरावा, व्यवसायाचे कोटेशन, प्रकल्प अहवाल, अनुभव प्रमाणपत्र, शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा याबाबत ग्रामसेवकाचे नाहरकत प्रमाणपत्र, वाहन खरेदीसाठी लायसन्स / परमीट / बॅच , वयोमर्यादा 18 ते 50 वर्षाच्या आत असावे.
अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन हिंगोली रोड नांदेड या ठिकाणी संपर्क साधावा.

000000
व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी  
अपंग प्रशिक्षण केंद्रात अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 22 :- व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळामार्फत शासन मान्यता अभ्यासक्रमासाठी 15 ते 35 वयोगटातील अपंग व मुकबधीर मुला-मुलींसाठी तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर या संस्थेत प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुक अपंग मुला-मुलींनी, पालकांनी शुक्रवार 30 जुन 2017 पर्यंत तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र शिवनेरीनगर रामपूर रोड देगलूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन देगलूर तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण संस्थेच प्राचार्य यांनी केले आहे.  
प्रशिक्षण केंद्रात संगणक प्रशिक्षण ( सीसीईन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॅम्प्युटर टायपिंग), वेल्डर आणि सीट मेटल, शिवण व कर्तनकला आणि सीसीईन सौंदर्यशास्त्र, सीसीईन वायरमन आणि प्लंबर, सीटीसी आदी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार आहेत.
संस्थेत अपंग आणि मुकबधीर प्रशिक्षणार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत पदवी शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. प्रवेशानंतर निवास, वैद्यकीय औषधोपचार व प्रशिक्षण साहित्य व विद्यावेतन दिले जाणार आहे.

0000000
लोकशाही दिनाचे 3 जुलै रोजी आयोजन
नांदेड, दि. 22 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकू घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्‍यात येतो. त्यानुसार सोमवार 3 जुलै 2017 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्‍याचे व न स्विकारण्‍याबाबतच्‍या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्‍यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्‍वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्‍यात येणार नाहीत. त्‍यामुळे केवळ वैयक्तिक स्‍वरुपाच्‍या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.
यादिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबित प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास  सुरुवात करण्यात येईल.  
न्यायप्रविष्ट, राजस्व तसेच अपिलातील सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे, किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तसेच तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल, तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात पंधरा दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यांनंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिना दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील  महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या उपक्रमात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000000
अध्यापक महाविद्यालयात योग दिन साजरा
नांदेड, दि. 22 :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शासकीय अध्यापक महाविद्यालयात योग दिन  21 जुन रोजी साजरा करण्यात आला. "संतुलीत मन, आत्मविश्वास आणि चांगल्या जीवनासाठी योग" याबाबत प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांनी संकल्पना मांडली. 
यावेळी ओंकार, प्रार्थना, शिथिलीकरण अभ्यास, विविध आसने आदींचा यात समावेश होता. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योगा अभ्यास केला. शेवटी डॉ. एस. एम. साखरे यांनी आभार मानले.

000000

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ #जलसंधारणदिन #वॉकेथॉन२०२६ #वॉकफॉरवॉटर #रीलस्पर्धा #WalkForWater #WaterConservationDay...