वृत्त क्रमांक 341
नांदेड जिल्हा कृषी व धान्य महोत्सवात विक्रमी उलाढाल
नांदेड कृषी महोत्सव पोर्टलद्वारे www.nandedkrushimahotsav.in शेतमाल थेट विक्रीस चालना
- जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत
नांदेड दि. 18 मार्च :- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड आणि प्रकल्प संचालक, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 ते 17 मार्च 2026 या कालावधीत जिल्हास्तरीय कृषि व धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र, हरिद्रा, रेशीम, मत्स्य विभाग, आणि शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी सक्रीय सहभाग घेतला. तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला थेट बाजारपेठ मिळावी आणि ग्राहकांना दर्जेदार शेतीमाल उपलब्ध व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या 'जिल्हा कृषी व धान्य महोत्सव 2026' ला नांदेड जिल्ह्यातील व शहरातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा मैदानात रंगलेल्या या तीन दिवसीय महोत्सवात तब्बल 1 कोटी रुपये पेक्षा अधिक विक्रमी उलाढाल झाली असून, यामुळे शेतकऱ्यांच्या दर्जेदार उत्पादनास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली व शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये आनंदाची भावना दिसुन आली.तसेच जिल्हा महोत्सव PMFME अतर्गंत खरेदीदार विक्रेता संमेलनात 55 लक्ष रुपये किमतीचे खरेदी करार करण्यात आले.
या महोत्सवाच्या तिन्ही दिवसांत ग्राहकांनी मोठयाप्रमाणात खरेदीसाठी सहभाग घेतल्यामुळे मध्यस्थांशिवाय थेट ग्राहकांना विक्री करण्यात आली असुन, शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल उत्पादनास योग्य मोबदला मिळाला आहे विविध प्रकारचे धान्य, कडधान्ये आणि प्रक्रियायुक्त पदार्थांचे स्टॉल्स,पाणलोट,जलतारा,नैसर्गिक शेतीचे मॉडेल तसेच ईलेक्ट्रीक पॉवर टिलर ठरले कृषी महोत्सवाचे आकर्षण.
पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत बाजरी, राजगिरा, नाचणी, वरई, भगर यांसारख्या पौष्टिक तृणधान्यांपासून तयार केलेले विविध पदार्थ स्पर्धकांनी सादर केले. सदर स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. सुरेखा कुलकर्णी (विभाग प्रमुख, होम सायन्स, केआरएम महिला महाविद्यालय, नांदेड) व प्रा. अलका पवळे (कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी) यांनी केले. प्रथम क्रमांक – सौ. सुनीता अशोक कावळे, रेनापूर, ता. भोकर (नाचणी व भगर लाडू) द्वितीय क्रमांक – सौ. मनीषा सुरेशराव कदम, नांदेड (भगर आप्पे व इडली) तृतीय क्रमांक – सौ. अर्चना विजय क्षीरसागर, नांदेड (नाचणी ढोकळा) तसेच सर्व विजेत्यांना व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक – सौ. सुनीता अशोक कावळे, रेनापूर, ता. भोकर (नाचणी व भगर लाडू) द्वितीय क्रमांक – सौ. मनीषा सुरेशराव कदम, नांदेड (भगर आप्पे व इडली) तृतीय क्रमांक – सौ. अर्चना विजय क्षीरसागर, नांदेड (नाचणी ढोकळा) तसेच सर्व विजेत्यांना व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच बायोचार,ऊसा पीकातील AI तंत्रज्ञान मार्गदर्शन व शेतकरी शास्त्रज्ञ कार्यशाळा कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
"नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व ग्राहकांनी या उपक्रमाला दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. थेट विक्रीच्या या माध्यमामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य किंमत मिळाली असून, यामुळे ग्रामीण कृषि अर्थव्यवस्थेला उभारी मिळाली आहे."
या महोत्सवाच्या यशस्वीतेमुळे आगामी काळात अशा उपक्रमांची व्याप्ती वाढवण्याचा मानस शेतकऱ्यांनी व नागरिकांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांचे हिताचे असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी सांगितले व कृषि व धान्य महोत्सवाचे यशस्वीतेबाबत सर्वांचे आभार मानले.
00000
No comments:
Post a Comment