वृत्त क्रमांक
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन
नांदेड दि. 16 एप्रिल :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य" या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी आणि नागरिकांनी या वैचारिक चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
या स्पर्धेचे स्वरूप आणि नियम पुढीलप्रमाणे आहेतः
स्पर्धेचे गट आणि शब्दमर्यादाः
गट १: आयटीआय / डिप्लोमा / एमसीव्हीसी प्रशिक्षणार्थी व उत्तीर्ण विद्यार्थी (शब्दमर्यादाः ५०० ते ८०० शब्द).
गट २: खुला गट - पुरुष व महिला (शब्दमर्यादाः ८०० ते १२०० शब्द).
सहभाग नोंदणी व कालावधीः निबंध सादर करण्याचा कालावधीः 14 एप्रिल ते 25 एप्रिल 2026.
नोंदणी प्रक्रियाः स्पर्धकांनी आपले निबंध जाहिरातीत दिलेल्या Google Form (QR Code/Link) द्वारेच सादर करणे आवश्यक आहे.
Link: https://forms.gle/RcFPhcUgY8 X4P2NT8
forms.gl/RcFPhcUgY@K4P2NTO
दोन्ही गटांतील विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके निश्चित करण्यात आली आहेत.
00000
No comments:
Post a Comment