Monday, June 29, 2026

वृत्त क्रमांक

खरीप हंगाम २०२५ जिल्हास्तरीय पिकस्पर्धेचा निकाल जाहीर 

नांदेड दि. 29 जून:- राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या पिक उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादचात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. 

राज्यात खरीप हंगाम सन 2025 मध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

त्यानुसार खरीप हंगाम सन 2025 जिल्हास्तरावर पिकस्पर्धा निकाल जाहीर झाला, त्यामध्ये सोयाबीन पिकामध्ये शेख अजीम शेख खाजामोईनोद्दीन, (उत्पादन 40.24 क्विं./ हे.) रा.निचपूर ता.किनवट, पिराजी बाबाराव अरसुळे, (उत्पादन 34.33 क्विं./हे.) रा.एकदरा, ता. नांदेड, ज्ञानेश्वर पूरभाजी आढाव, (उत्पादन 33.33 क्विं./हे.) हदीदापूर ता. नांदेड हे शेतकरी सर्वसाधारण गटामध्ये सोयाबीन या पिकामध्ये क्रमशः प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत. 

तसेच युवराज प्रकाश तोडसाम (उत्पादन 24.00 क्विं./हे.) रा.गोंडवडसा ता. माहुर हे आदिवासी गटामध्ये सोयाबीन या पिकामध्ये प्रथम आले आहेत. मुग पिकामध्ये गोविंद मारोती होळगे  (उत्पादन 10.50 क्विं./हे.)  व उडीद पिकामध्ये विश्वनाथ गोविंदराव होळगे (उत्पादन 7.00 क्विं./हे.) रा.दापसेड ता.लोहा हे प्रथम आले आहेत. भोकर तालुक्यातून मका या पिकामध्ये अनुक्रमे बाबय्या संतोबा कोरडेवाड (उत्पादन 35.00 क्विं./हे.)  व प्रणीतरेड्डी नरसिंहरेड्डी मूल्यलवाड (उत्पादन 35.00 क्विं./हे.) रा. किनी हे प्रथम व द्वितीय आले तर तुर या पिकात धर्माबाद तालुक्यातुन दिगंबर शंकर कपाटे (उत्पादन 43.81 क्विं./हे.) व हणमंतराव मारोती वारले (उत्पादन 41.58 क्विं./हे.) हे अनुक्रमे प्रथम व द्वितीय आले आहेत. पिक्स्पर्धेत विजेते शेतकऱ्यांना जिल्हास्तरावर क्रमशः प्रथम,द्वितीय व तृतीय यांना 10 हजार , 7 हजार  व 5 हजार रुपये बक्षीस रक्कम मिळणार आहेत.

सर्व विजेत्या शेतकऱ्यांचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व खरीप हंगाम सन 2026 पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना केले आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषि विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ – www.krishi.maharashtra.gov.in  किंवा सबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असेही प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

00000

No comments:

Post a Comment