वृत्त क्रमांक
कालवा, शासकीय वसाहतीमधील
अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन
नांदेड दि. 23 एप्रिल :- जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत प्रकल्पाची कालवे, धरण, वसाहती यामधील अतिक्रमण हटविण्याबाबत विशेष मोहिम राबविली जाणार आहे. सर्व जनतेनी, शासकीय, खाजगी यंत्रणांनी पुढाकार घेऊन कालव्यावरील, शासकीय वसाहतीमधील अतिक्रमणे काढुन घेऊन जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 नांदेडचे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी केले आहे.
जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा हा कार्यक्रम जलसंपदा विभागामार्फत 15 एप्रिल पासून 30 एप्रिल या कालावधीत राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत केलेली अतिक्रमणे 7 दिवसांचे आत काढुन घ्यावीत. अन्यथा त्यानंतर महसूल व पोलिस यंत्रणेच्या सहाय्याने अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठीचा खर्च अतिक्रमणधारकांकडुन वसूल करण्यात येईल. सिंचन कायदा 1976 मधील कलम 93 नुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
या अतिक्रमणात सेवापथ, निरीक्षण पथावरील तात्पुरते शेड, जनावरांची गोठे
इत्यादी जलसंपदा विभागामार्फत संपादित क्षेत्राच्या हद्दीतून काढावीत. कालव्याच्या
हद्दीतील शेतीकरीता उपयोगात आणलेले क्षेत्र पूर्ववत करून द्यावे. वितरीका,
उपवितरीका बुजविले असल्यास, तसेच कालव्याचा मार्ग बदलला असल्यास ते पुर्ववत करून
द्यावे. वसाहतीमध्ये केलेले अवैध बांधकाम, अनधिकृत शासकीय,
खाजगी कार्यालये काढुन घ्यावीत. दुषित पाणी, सांडपाणी कालव्यात सोडलेले असल्यास ते
बंद करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या (इसापूर धरणाच्या)
लाभक्षेत्रांतर्गत नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व लाभधारकांना व इतर
खाजगी, शासकीय यंत्रणांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment