Saturday, October 8, 2016

जिल्ह्यात हंगामात 112.78 टक्के पाऊस
गत 24 तासात सरासरी 40.90 मि.मी. 
           नांदेड, दि. 9 :- जिल्ह्यात  रविवार 9 ऑक्टोंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 654.46 मिलीमीटर पाऊस  झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 40.90 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 1077.66 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) लोहा-156.85, नांदेड-133.30, अर्धापूर-132.97, भोकर-128.41, कंधार-126.45, मुखेड-124.43, बिलोली-113.77, हदगाव-113.31,नायगाव-108.10, मुदखेड-105.83, माहूर-103.69, धर्माबाद-102.85, देगलूर-97.43, उमरी-97.08, हिमायतनगर-95.29, किनवट-85.14. जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची टक्केवारी  112.78 इतकी झाली आहे. 
जिल्ह्यात रविवार 9 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढीलप्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 49.63 (1215.54), मुदखेड- 47.00 (903.35), अर्धापूर-50.33 (1156.33), भोकर-30.50 (1279.50), उमरी-55.67 (967.27), कंधार-45.00 (1019.97), लोहा-58.33 (1307.00), किनवट-22.43 (1055.75), माहूर-46.50 (1285.75), हदगाव-27.00 (1107.41), हिमायतनगर-7.67 (931.31), देगलूर-44.50 (877.17), बिलोली-37.40 (1101.40), धर्माबाद-49.33 (941.71), नायगाव-39.60 (989.74), मुखेड-43.57 (1103.42) आज  अखेर  पावसाची सरासरी 1077.66 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 17242.62) मिलीमीटर आहे. 
नांदेड जिल्ह्यात 1 जून ते 31 ऑक्टोंबर या कालावधीत पडणारा वार्षिक पाऊस मि.मी. मध्ये पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) किनवट-1240.00, माहूर-1240.00, भोकर-996.40, उमरी-996.40, हदगाव-977.30, हिमायतनगर-977.30, बिलोली-968.10, धर्माबाद-915.60, नायगाव-915.60, नांदेड-911.90, देगलूर-900.30, मुखेड-886.80, अर्धापूर-869.60, मुदखेड-853.56, लोहा-833.30, कंधार-806.60.

00000
नवरात्रोत्सवात सप्तमी, अष्टमीचा अपूर्व योग….
शारदीय नवरात्रोत्सवात आज शनिवार 8 ऑक्टोंबर रोजी सप्तमी व अष्टमी एकाच दिवशी येण्याचा योग जुळून आला आहे. असा योग चारशे वर्षातून एकदा येतो असे माहूरगड येथील श्री रेणुकादेवी संस्थानातील पुजारी चंद्रकांत भोपी यांनी सांगितले. नवरात्रोत्सवाच्या आजचे श्री रेणुकामाता देवीचे सालंकृत रुपाची छायाचित्रे (छाया- विजय होकर्णे नांदेड )





जिल्ह्यात राष्ट्रीय लोकन्यायालय संपन्न
269 प्रकरणे निकाली, 1 कोटी 9 लाख रुपये वसूल
नांदेड , दि. 8 :- जिल्हा न्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने जिल्हयात आज राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. यात जिल्ह्यात तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या 927 प्रकरणांपैकी 269 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये तडजोड व दंड स्वरूपात  1 कोटी 9 लाख 77 हजार 372 रुपये वसूल करण्यात आले.   
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातर्फे फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, ट्रॅफिक, पिट्टी प्रकरणे तसेच मुनिसिपल प्रकरणांचे राष्ट्रीय लोकन्यायालय आयोजित केले होते. या लोकन्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा व प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. आर. कुरेशी यांच्या मार्गदर्शनात यशस्वी झाले.
            नांदेड जिल्हा न्यायालयात एकूण 5 पॅनल तयार करण्यात आले होते. त्यात पॅनल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश एच. आर. वाघमारे, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एन. सचदेव, सह दिवाणी न्यायाधीश एस. आर. नरवाडे, दिवाणी न्यायाधीश विश्वंभरण सरिता, एस. एम. जोशी यांनी काम पाहिले. तसेच यांना पॅनल सदस्य म्हणून अॅड. विजय गोणारकर, अॅड. एच. आर. जाधव, अॅड. नईमखान पठाण, अॅड. आर. एस. कानोटे, अॅड. सी. आर. भुयारे, अॅड. साबळे, अॅड. प्रविण अयाचित, अॅड. एम. के. हुके, अॅड. पी. एच. रतन, अॅड. मो. शाहेद मो. इब्राहिम यांचे सहकार्य लाभले.
या लोकन्यायालयात जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधीश, न्यायालयीन व्यवस्थापक एम. के. आवटे तसेच विधीज्ञ, पक्षकार बांधव आणि जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक पी. एस. तुप्तेवार, अधिक्षक कबिर सिध्दीकी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक पी. आर. खरात, पॅनलवरील न्यायालयीन कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.

000000

आदिवासी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन संपन्न

नांदेड , दि. 8 :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळांच्या प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा किनवट येथे शुक्रवार 7 ऑक्टोंबर रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांचे हस्ते  ध्वजारोहण व क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करून पार पडले.    
या प्रसंगी डॉ. भारुड यांनी दैनंदिन जीवनात खेळाचे महत्व यावर मार्गदर्शन केले व सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी तहसीलदार आजामोद्दीन, लेखाधिकारी श्री. आगळे, श्री. जाधव, श्री. बनसोडे,  श्री. कांबळे, शासकीय व अनुदानित शाळांचे मुख्याध्यापक , क्रीडा प्रशिक्षक आदी  उपस्थित होते.  यावेळी विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून डॉ.राजेंद्र  भारुड यांना  मानवंदना दिली.

00000

Friday, October 7, 2016

जलयुक्त शिवार अभियानात

उत्कृष्ट योगदानासाठी  जिल्हा, तालुका, गावांना पुरस्कार

नांदेड , दि. 7 :- जलसंधारणाच्या कार्यक्रमाला गती देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या जिल्हा, तालुका, गावांना तसेच वैयक्तिक व सामुदायीक (अशासकीय संस्था) यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी जलयुक्त शिवार अभियान जिल्हास्तरीय समितीकडे अर्ज करावे लागणार आहेत.
पुरस्काराचे स्वरुप व विहित नमुन्यात अर्ज पाठविण्याची तारीख पुढील प्रमाणे आहे. महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार या राज्यस्तर पुरस्कारासाठी 31 जानेवारी 2017 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
हा पुरस्कार राज्यातील 3 गावांना देण्यात येणार असून याचे स्वरुप प्रथम 25 लाख रुपये, द्वितीय 15 लाख रुपये व तृतीय 7.5 लाख रुपये आहे. तसेच 3 तालुक्यांसाठी प्रथम पुरस्कार 35 लाख रुपये, द्वितीय 20 लाख रुपये व तृतीय 10 लाख रुपये तर 3 जिल्ह्यांसाठी प्रथम पुरस्कार 50 लाख रुपये, द्वितीय 30 लाख रुपये व तृतीय 15 लाख रुपये. तर राज्यस्तरावर वैयक्तिक एक पुरस्कारासाठी (व्यक्ती / शेतकरी ) प्रथम क्रमांक 50 हजार रुपये द्वितीय क्रमांक 30 हजार रुपये आणि सामुदायीक (अशासकीय संस्था) प्रथम क्रमांक 1 लाख 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 1 लाख रुपये एक पुरस्कार देण्यात येणार आहे.
विभागीय स्तरावरील राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कारासाठी दि. 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. हा पुरस्कार विभागातील 2 जिल्ह्यांना देण्यात येणार असून प्रथम क्रमांक 15 लाख रुपये, द्वितीय 10 लाख रुपये. दोन तालुक्यांसाठी प्रथम क्रमांक 10 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 7.5 लाख रुपये तर दोन गावांसाठी प्रथम क्रमांक 7.5 लाख रुपये व द्वितीय क्रमांक 5 लाख रुपये असे विभागीय स्तरावरील पुरस्काराचे स्वरुप आहे.
जिल्हा स्तरावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कारासाठी दि. 30 ऑक्टोबर 2016 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. हा पुरस्कार जिल्ह्यातील दोन तालुक्यांना देण्यात येणार असून प्रथम क्रमांक  5 लाख रुपये व स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांक 3 लाख रुपये. जिल्ह्यातील पाच गावांसाठी प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 75 हजार रुपये, तृतीय क्रमांक 50 हजार रुपये, चौथा क्रमांक 30 हजार रुपये (उत्तेजनार्थ), पाचवा क्रमांक 20 हजार रुपये (उत्तेजनार्थ) असे पुरस्कार देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी https://www.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्र. मफुअ-2013/प्र.क्र.37/जल-8 दि. 28.9.2016 हा शासन निर्णय पाहावा.

00000

जलयुक्त शिवार अभियानाबाबत

पत्रकारांसाठी पुरस्कार योजना

नांदेड , दि. 7 :-  उत्कृष्ट लिखाणाद्वारे जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यात योगदान देणाऱ्या पत्रकारांसाठी राज्यस्तर, विभागस्तर व जिल्हास्तरावर पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे. यानुसार जलयुक्त शिवार अभियानात लिखाण केलेल्या पत्रकारांनी आपले प्रस्ताव 30 ऑक्टोबर 2016 पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयात सादर करावेत.
जलयुक्त शिवार अभियानाची जनजागृती करणे, अभियानात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर, पाणलोटाच्या यशोगाथा प्रकाशित करणे, इतर गावांना प्रोत्साहित करुन पाणी प्रश्न सोडविण्यास योगदान देणारे पत्रकार पुरस्कारांसाठी पात्र राहणार आहे. मुद्रीत पत्रकार व इलेक्ट्रॉनिक्स मिडीया असे गट आहेत. पत्रकारांसाठी राज्यस्तर, विभागस्तर व जिल्हास्तरावर तर इलेक्ट्रॉनिक्स मिडीयासाठी राज्यस्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागस्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार, जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार या नावांनी पुरस्कार दिले जाणार आहेत. पत्रकारांसाठी राज्यस्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 35 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 25 हजार रुपये व स्मृतीचिन्ह अशी आहे.
विभागस्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 30 हजार रुपये, व्दितीय क्रमांक 20 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 15 हजार रुपये व स्मृतीचिन्ह अशी आहे.
जिल्हास्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 15 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 12 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 10 हजार रुपये व स्मृतीचिन्ह अशी आहे.
तसेच इलेक्ट्रॉनिक्स मिडीयासाठी राज्यस्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 71 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 51 हजार रुपये व स्मृतीचिन्ह अशी आहे. पत्रकार पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यात प्रकाशित होणाऱ्या मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील दैनिके, साप्ताहिके व पाक्षिकातील लिखाणाचा विचार केला जाईल. यासाठी 1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2015 या कालावधीतील लिखाणाचा विचार केला जाईल. इलेक्ट्रॉनिक मिडीयासाठी मराठी भाषेतील वृत्तकथेचा विचार करण्यात येईल. अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ग्राम विकास व जलसंधारण विभागाचा मफुअ-2013/प्र.क्र.37/जल-8, दि. 28 सप्टेंबर 2016 हा शासन निर्णय पाहावा.

0000000

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत

शिल्पनिदेशक पदासाठी मुलाखती

नांदेड , दि. 7 :-  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे शिल्प कारागीर योजनेअंतर्गत पुढील प्रमाणे शिल्पनिदेशकांचे पदे अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात निव्वळ तासिका तत्वावर तत्वाभ्यास (थेअरी) व प्रात्यक्षिक शिकवण्यासाठी भरावयाची आहेत. इच्छूक व पात्र उमेदवारांनी बुधवार 19 ऑक्टोंबर 2016 रोजी थेट मुलाखतीसाठी मुळ व छायांकित कागदपत्राच्या प्रतीसह सकाळी 11 वा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे उपस्थित रहावे.
व्यवसायाची नावे पुढील प्रमाणे आहेत. टूल ॲड डायमेंकर, फीटर, मशिनिष्ट गांईडर, फौड्रीमन, मशिनिष्ट वेल्‍डर, वेल्डर ( जे / ई ), मेकॅनिक ट्रॅक्टर, शिट मेटल वर्कर, मेकॅनिक इलेक्ट्रानिक्स, ड्राफ्टसमन मेकॅनिक, एम्प्लायबिलिटी स्किल्स. या व्यवसासाठी संबंधीत ट्रेड मधील मेकॅनिकल, इलेक्ट्रानिक्स अभियांत्रिकी किमान द्वितीय श्रेणीत पदवी, पदविका व एक / दोन वर्षाचा अनुभव किंवा संबंधित व्यवसायातील आयटीआय प्रमाणपत्र एनसीव्हीटी, एटीएस परीक्षा उत्तीर्ण व तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. सीटीआय उत्तीर्ण उमेदवारास व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले शिल्पनिदेशक, गटनिदेशक यांना प्राधान्य देण्यात येईल तसेच शिल्पनिदेशक एम्प्लायबिलिटी स्किल्सासाठी एबीए, बीबीए पदवी असणे आवश्यक आहे. या संस्थेस यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी नमूद केलेल्या दिनांकास संस्थेत उपस्थित रहावे. तसेच त्यानंतर आलेल्या संबंधित उमेदवारांचा विचार केल्या जाणार नाही.

000000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...