Friday, May 9, 2025

मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना




 

 विद्यानिकेतन चालवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान

  वृत्त क्रमांक 487

साश्रुनयनांनी शहीद सचिन वनंजे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

नांदेड, दि. 9 मे:- भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान सचिन यादवराव वनंजे यांचा देशसेवेच्या कर्तव्यावर असताना श्रीनगरच्या परिसरात 6 मे रोजी अपघाती मृत्यू झाला होता. आज 9 मे रोजी देगलूर येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात साश्रुनयनांनी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी, अधिकारी व मोठ्या नागरिक उपस्थित होते.

सचिन यांच्या निधनाची माहिती भारतीय सैन्यदलामार्फत त्यांच्या कुटुंबियांना मिळताच तालुक्यातील तमलूरसह देगलूरवर शोककळा पसरली. शहीद सचिन यांचे पार्थिव आज देगलूर येथील त्यांच्या राहत्या घरी पहाटे 4 वाजता दाखल होताच परिवारातील सदस्यांसह उपस्थितीतांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. 

सकाळी ठिक 8.30 वाजता फुलांनी सजवलेल्या लष्कराच्या वाहनातून शहिद सचिन वनंजेच्या घरापासून अंत्ययात्रेला प्रारंभ झाला.  शहरातील मुख्य मार्गाने नगरपालिका शेजारी असलेल्या मैदानात अंत्यविधीसाठी त्यांचे पार्थिव आणण्यात आले. यावेळी “शहिद सचिन वनंजे, अमर रहे अमर रहे” च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

यावेळी खासदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर,  आमदार जितेश अंतापूरकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी  संकेत गोसावी, तहसीलदार भरत सुर्यवंशी, गटविकास शेखर देशमुख, मुख्याधिकारी निलम कांबळे आदींसह आजी व माजी सैनिक आणि मोठया संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. 

उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली व यावेळी मुख्यमंत्र्यांचा शोकसंदेश वाचुन दाखवण्यात आला. देगलूर नगरपालिका शेजारी तयार केलेले अंत्यविधीस्थळी भारतीय सैन्यदलाच्या पथकाने मानवंदना दिली. त्यानंतर शहीद सचिन वनंजेच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले. 

सचिन वनंजे सन 2017 मध्ये भारतीय सैन्य दलात दाखल झाला होते. त्यांची पहिली पोस्टिंग सियाचीन भागात झाली. त्यानंतर जालंधर पंजाब येथे त्यांनी सेवा केली. गेल्या दीड वर्षापासून ते श्रीनगरमध्ये कर्तव्यावर होते. दरम्यान दि.6 मे रोजी वाहन दरीत कोसळून त्याचा मृत्यू झाला होता.

000000







































Thursday, May 8, 2025

 प्रधानमंत्री पीक विमा योजना







 वृत्त क्रमांक 486

 

40 वर्ष रखडलेल्या लेंडी धरणाच्या गळभरणी कामाला अखेर सुरुवात

 

·         प्रकल्पग्रस्तांशी सुसंवाद विरोध न होता कामास प्रारंभ

·         26 हजार हेक्टर येणार पाण्याखाली ; 30 हजार शेतकऱ्यांना फायदा

·         मुखेड-देगलूर तालुक्याताील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार

 

नांदेडदि. 8 मे :- मागील 40 वर्षापासुन रखडलेल्या लेंडी प्रकल्पाची अखेर आज 8 मे रोजी गळभरणी कामाला सुरुवात करण्यात आली. या लेंडी प्रकल्पात 12 गावे समाविष्ट असुन पहिल्या टप्प्यात रावणगावभाटापुरहसनाळमारजवाडीभिंगोली व भेंडेगाव खु. असुन दुसऱ्या टप्यात वळंकीकोळनुरभेंडेगाव बुईटग्याळ व मुक्रमाबाद ही गावे येतात.

 

यावेळी आमदार तुषार राठोडजिल्हाधिकारी राहुल कर्डीलेपोलिस अधिक्षक अबिनाशकुमारअतिरिक्त पोलिस अधिक्षक सुरज गुरवउपविभागीय अधिकारी अनुप पाटीलतहसिलदार राजेश जाधवपोलिस उपविभागीय अधिकारी संकेत गोसावीसहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडकेलेंडी अधिक्षक अभियंता दाभाडे व लेंडी कार्यकारी अभियंता तिडके यांच्या प्रमुख उपस्थितीत गळभरणी कामाला सुरुवात झाली.

 

मागील दोन महिण्यापासुन जिल्हाधिकारी राहुल कर्डीलेउपविभागीय अधिकारी अनुप पाटीलतहसिलदार राजेश जाधवकार्यकारी अभियंता तिडके यांनी लेंडी प्रकल्पग्रस्तासंबंधी प्रशासन स्तरावर  व गावागावात जाऊन लेंडी प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. तर काही अर्ज निकाली सुध्दा काढण्यात आले. तसेच आमदार डॉ. तुषार राठोड यांनी सरकार स्तरावर वेळोवळी पाठपुरावा करुन प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासनाने अखेर आज 8 मे रोजी गळभरणीला सुरुवात केली.  या गळभरणीला पुनर्वसनातील गावांचा विरोध न होता सर्वांच्या सहकार्याने लेंडी धरणाची गळभरणी केली हे विशेष. तसेच गळभरणी झाली असली तरी ज्या काही अडचणी राहिल्या असतील त्या अडचणी प्रशासन स्तरावर व गावात येऊन सोडविल्या जातील असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्तात काम चालू आहे. धरण क्षेत्राच्या आजूबाजूस पोलिसांचा पहारा आहे.

 

चौकट

लेंडी धरणाचे काम पुर्ण झाल्यास 26 हजार हेक्टर शेती पाण्याखाली येणार असुन 30 हजार व त्यापेक्षाही जास्त शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. तसेच मुखेड व देगलुर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुध्दा मिटणार आहे.

 

प्रशासनाने ठेवला सुसंवाद..!

जिल्हाधिकारी राहुल कर्डीलेउपविभागीय अधिकारी अनुप पाटीलमुखेडचे तहसिलदार राजेश जाधव यांनी नेहमीच प्रकल्पग्रस्तांशी सुसंवाद ठेवला. कोणतीही अडचण असल्यास थेट सोडविण्याचा प्रयत्न केला. प्रकल्पग्रस्त व अधिकारी यांच्याशी थेट संवाद होत असल्याने कोणताही विरोध न होता गळभरणी सुरुवात झाली. मागील 40 वर्षापासुन रखडलेला प्रकल्प अखेर प्रशासनाच्या सुसंवादातून सुटला असे म्हणावे लागेल.

 

लेंडी प्रकल्पग्रस्त सानुग्रह अनुदानाच्या नोटीसा गावात देण्यात आलेल्या आहेत. येणाऱ्या काही दिवसात प्रकल्पग्रस्तांच्या खात्यात अनुदान जमा होईल.

00000





  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...