Thursday, May 8, 2025

 वृत्त क्रमांक 486

 

40 वर्ष रखडलेल्या लेंडी धरणाच्या गळभरणी कामाला अखेर सुरुवात

 

·         प्रकल्पग्रस्तांशी सुसंवाद विरोध न होता कामास प्रारंभ

·         26 हजार हेक्टर येणार पाण्याखाली ; 30 हजार शेतकऱ्यांना फायदा

·         मुखेड-देगलूर तालुक्याताील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार

 

नांदेडदि. 8 मे :- मागील 40 वर्षापासुन रखडलेल्या लेंडी प्रकल्पाची अखेर आज 8 मे रोजी गळभरणी कामाला सुरुवात करण्यात आली. या लेंडी प्रकल्पात 12 गावे समाविष्ट असुन पहिल्या टप्प्यात रावणगावभाटापुरहसनाळमारजवाडीभिंगोली व भेंडेगाव खु. असुन दुसऱ्या टप्यात वळंकीकोळनुरभेंडेगाव बुईटग्याळ व मुक्रमाबाद ही गावे येतात.

 

यावेळी आमदार तुषार राठोडजिल्हाधिकारी राहुल कर्डीलेपोलिस अधिक्षक अबिनाशकुमारअतिरिक्त पोलिस अधिक्षक सुरज गुरवउपविभागीय अधिकारी अनुप पाटीलतहसिलदार राजेश जाधवपोलिस उपविभागीय अधिकारी संकेत गोसावीसहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडकेलेंडी अधिक्षक अभियंता दाभाडे व लेंडी कार्यकारी अभियंता तिडके यांच्या प्रमुख उपस्थितीत गळभरणी कामाला सुरुवात झाली.

 

मागील दोन महिण्यापासुन जिल्हाधिकारी राहुल कर्डीलेउपविभागीय अधिकारी अनुप पाटीलतहसिलदार राजेश जाधवकार्यकारी अभियंता तिडके यांनी लेंडी प्रकल्पग्रस्तासंबंधी प्रशासन स्तरावर  व गावागावात जाऊन लेंडी प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. तर काही अर्ज निकाली सुध्दा काढण्यात आले. तसेच आमदार डॉ. तुषार राठोड यांनी सरकार स्तरावर वेळोवळी पाठपुरावा करुन प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासनाने अखेर आज 8 मे रोजी गळभरणीला सुरुवात केली.  या गळभरणीला पुनर्वसनातील गावांचा विरोध न होता सर्वांच्या सहकार्याने लेंडी धरणाची गळभरणी केली हे विशेष. तसेच गळभरणी झाली असली तरी ज्या काही अडचणी राहिल्या असतील त्या अडचणी प्रशासन स्तरावर व गावात येऊन सोडविल्या जातील असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्तात काम चालू आहे. धरण क्षेत्राच्या आजूबाजूस पोलिसांचा पहारा आहे.

 

चौकट

लेंडी धरणाचे काम पुर्ण झाल्यास 26 हजार हेक्टर शेती पाण्याखाली येणार असुन 30 हजार व त्यापेक्षाही जास्त शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. तसेच मुखेड व देगलुर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुध्दा मिटणार आहे.

 

प्रशासनाने ठेवला सुसंवाद..!

जिल्हाधिकारी राहुल कर्डीलेउपविभागीय अधिकारी अनुप पाटीलमुखेडचे तहसिलदार राजेश जाधव यांनी नेहमीच प्रकल्पग्रस्तांशी सुसंवाद ठेवला. कोणतीही अडचण असल्यास थेट सोडविण्याचा प्रयत्न केला. प्रकल्पग्रस्त व अधिकारी यांच्याशी थेट संवाद होत असल्याने कोणताही विरोध न होता गळभरणी सुरुवात झाली. मागील 40 वर्षापासुन रखडलेला प्रकल्प अखेर प्रशासनाच्या सुसंवादातून सुटला असे म्हणावे लागेल.

 

लेंडी प्रकल्पग्रस्त सानुग्रह अनुदानाच्या नोटीसा गावात देण्यात आलेल्या आहेत. येणाऱ्या काही दिवसात प्रकल्पग्रस्तांच्या खात्यात अनुदान जमा होईल.

00000





No comments:

Post a Comment

  फळ पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 30 जून पर्यंत विमा योजनेत भाग घेण्याची मुदत नांदेड ,  दि. 26 जून ...