Friday, July 22, 2022

 नियमाच्या काटेकोर अंमलबजावणीसह

कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या

-        जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


 ·        1 लाख 47 हजार 67 शेतकऱ्यांच्या 81 हजार 943 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

·        उर्वरीत पंचनामे पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण महसूल यंत्रणा शिवारात  

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत नांदेड जिल्ह्यातील 93 महसूल मंडळापैकी 80 महसूल मंडळातील चालू हंगामातल्या पिकांना क्षती पोहचलेली आहे. या 80 महसूल मंडळापैकी 61 महसूल मंडळात 2 वेळेस, 32 महसूल मंडळात 3 वेळेस, 12 महसूल मंडळात 4 वेळेस, 3 महसूल मंडळात 5 वेळेस, तर एका महसूल मंडळात 6 वेळेस अतिवृष्टी झाली आहे. याचबरोबर 9 जुलै रोजी 33 मंडळात, 10 जुलै रोजी 14 मंडळात, 13 जुलै रोजी 79 मंडळात, 14 जुलै रोजी 36 मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यातील सर्व परिस्थितीचा सारासार विचार करता या पूर परिस्थितीमुळे सुमारे 5 लाख 33 हजार 384 शेतकऱ्यांच्या 2 लाख 97 हजार 432.17 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यात 1 हजार 429 हेक्टर क्षेत्रातील जमिनी खरडून नुकसान झाले आहे. सदर शेती पिक व शेतजमीन नुकसानीचा तालुका निहाय तपशील जिल्हा प्रशासनाने दिला आहे.  

 

नांदेड तालुक्यात 15 हजार 700 शेतकरी बाधित असून 9 हजार 630 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, 91 हेक्टर बागायत बाधित क्षेत्र, 3.17 हेक्टर फळपीक बाधित क्षेत्र असून 9 हजार 724.17 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे तर 110 हेक्टर क्षेत्र शेतजमीन खरडून नुकसान झाले आहे.

 

अर्धापूर तालुक्यात 21 हजार 500 शेतकरी बाधित असून 10 हजार 81 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, 1 हजार 70 हेक्टर बागायत बाधित क्षेत्र असून 11 हजार 151 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे तर 70 हेक्टर क्षेत्र शेतजमीन खरडून नुकसान झाले आहे.

 

कंधार तालुक्यात 44 हजार 965 शेतकरी बाधित असून 24 हजार 100 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, 15 हेक्टर बागायत बाधित क्षेत्र असून 24 हजार 115 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

 

लोहा तालुक्यात 41 हजार 200 शेतकरी बाधित असून 22 हजार 800 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 22 हजार 800 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

 

देगलूर तालुक्यात 32 हजार 400 शेतकरी बाधित असून 18 हजार 474 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 18 हजार 474 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

 

मुखेड तालुक्यात 21 हजार 300 शेतकरी बाधित असून 8 हजार 520 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 8 हजार 520 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

 

बिलोली तालुक्यात 32 हजार 114 शेतकरी बाधित असून 15 हजार 557 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 15 हजार 557 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

 

नायगाव तालुक्यात 46 हजार 788 शेतकरी बाधित असून 14 हजार 15 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, बागायत बाधित क्षेत्र 110 हेक्टर असून 14 हजार 125  हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

 

धर्माबाद तालुक्यात 20 हजार 748 शेतकरी बाधित, 12 हजार हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 12 हजार हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र असून शेत खरडून 160 हेक्टर आहे.

 

उमरी तालुक्यात 21 हजार 260 शेतकरी बाधित असून 9 हजार 540 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, बागायत क्षेत्र 1 हजार 530 हेक्टर असून 11 हजार 70 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

 

भोकर तालुक्यात 40 हजार 950 शेतकरी बाधित, 25 हजार 180 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 25 हजार 180 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

 

मुदखेड तालुक्यात 30 हजार 107 शेतकरी बाधित असून 6 हजार 973 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, 6 हजार 973 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

 

हदगाव तालुक्यात 52 हजार 431 शेतकरी बाधित असून 16 हजार 415 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, फळबाग 28 हेक्टर क्षेत्र असून 26 हजार 443 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे. तर शेतजमीन खरडून नुकसान झालेले क्षेत्र हे 63 हेक्टर आहे.

 

हिमायतनगर तालुक्यात 33 हजार 215 शेतकरी बाधित असून 26 हजार 402 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 26 हजार 402 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे. तर शेतजमीन खरडून नुकसान झालेले क्षेत्र हे 166 हेक्टर आहे.

 

किनवट तालुक्यात 54 हजार 503 शेतकरी बाधित असून 48 हजार 832 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 48 हजार 832 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे. तर शेतजमीन खरडून नुकसान झालेले क्षेत्र हे 720 हेक्टर आहे.

 

माहूर तालुक्यात 24 हजार 203 शेतकरी बाधित असून 16 हजार 63 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, फळपीक बाधित क्षेत्र 3 हेक्टर असून 16 हजार 66  हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे. तर शेतजमीन खरडून नुकसान झालेले क्षेत्र हे 140 हेक्टर आहे.

 

जिल्ह्यातील एकुण बाधित शेतकऱ्यांची संख्या ही 5 लाख 33 हजार 384 एवढी आहे. जिरायत बाधित क्षेत्र 2 लाख 94 हजार 582 हेक्टर एवढे आहे. बागायत बाधित क्षेत्र 2 हजार 816 हेक्टर आहे. फळपीक बाधित क्षेत्र 34.17 हेक्टर आहे. एकुण बाधित क्षेत्र हे 2 लाख 97 हजार 432.17 हेक्टर एवढे आहे. शेतजमीन खरडून नुकसान झालेले क्षेत्र हे 1 हजार 429 हेक्टर एवढे आहे.

 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत अतिवृष्टीची संभावणा लक्षात घेऊन मंडळ निहाय महसूल यंत्रणांना दक्षतेचे आदेश दिलेले होते. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार व कृषि विभागाचे अधिकारी हे प्रत्येक मंडळ निहाय प्रत्‍यक्ष भेट देऊन पाहणी करीत आहेत. सदर पिक नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यासाठी महसूल विभागातील 439 तलाठी, कृषि विभागातील 643 कृषि सहाय्यक व जिल्हा परिषद विभागातील 884 ग्रामसेवक ही टीम प्रत्यक्ष बांधावर जाऊन युद्धपातळीवर काम करीत आहेत. आज रोजी 1 लाख 47 हजार 67 एवढ्या शेतकऱ्यांचे 81 हजार 943 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरीत पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

00000

अर्धापूर येथे रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 22 : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे अर्धापुर तालुक्यातील महात्मा बसवेश्वर विद्यालय, मिनाक्षी देशमुख मेमोरियल माध्यमिक मुलीची शाळा व जिल्हा परिषद शाळा अर्धापूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

या शिबीरामध्ये शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. रस्ता सुरक्षा विषयक नियमांचे, वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, वाहतूक चिन्ह, हाताचे इशारे, हेल्मेट/सिटबेल्ट परिधान करणे व मुलांनी रस्त्यावर वावरतांना कसे वागावे याबाबत मार्गदर्शन सहा. मोटार वाहन निरीक्षक वैभव डुब्बेवार, स्वप्निल राजुरकर व निलेश ठाकुर यांनी केले. तसेच शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना शालेय परिवहन समिती व स्कुलबस नियमावली बाबत माहिती दिली.

00000

Thursday, July 21, 2022

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 19.70 मि.मी. पाऊस

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यात गुरुवार 21 जुलै रोजी सकाळी 8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 19.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 654.80 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

 
जिल्ह्यात गुरुवार 21 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड-12 (632.20), बिलोली-16.70(692), मुखेड- 27.70 (608.20), कंधार-12.80 (640.40), लोहा-11.70 (596.20), हदगाव-11.20 (599.70), भोकर-36.90 (767.10), देगलूर-26.70 (579.10), किनवट-13 (666.50), मुदखेड- 19.70 (828.70), हिमायतनगर-21 (846.30), माहूर- 4.90 (552.20), धर्माबाद- 46.60 (709.40), उमरी- 43(818.60), अर्धापूर- 9 (616.80), नायगाव-20.50 (603.50मिलीमीटर आहे.

00000

 नांदेड जिल्ह्यात 9 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 145 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 7, अर्धापूर 1, किनवट 1 असे एकूण 9 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 59 एवढी झाली असून यातील 1 लाख 312 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 55 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 7  व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 6 असे एकूण 13 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 19, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 30, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, अश्विनी हॉस्पिटल 1 असे एकुण 55 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 11 हजार 455
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 91 हजार 31
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 59
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 312
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.33 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-55
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.
0000

 जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत जिल्हयातील विविध कौशल्य विकास योजनेबद्दल आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमातर्गंत उत्कृष्ट कार्य करणारे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे, उपअधिष्ठाता हेमंत व्ही. गोडबोले, सहायक प्राध्यापक डॉ. आय. एफ. इनामदार व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत राजपाल पाटील, आरएमओ डॉ. मंजुषा यशवंत पाटील, डॉ.शितल ओमकारसिंग चव्हाण, सहायक प्राध्यापक डॉ. दिपाली रमाकांत शेरेकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रसाद देशपांडे यांचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

या बैठकीस पंचायत समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एन.आर.केंद्रे, महानगरपालिकेचे उपआयुक्त पंजाब खानसोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रेखा काळम, सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम.एस.बिरादार, जिल्हा उपनिबंधक डॉ.मुकेश बाऱ्हाते, मर्चन्ट ॲण्ड इंडीयन असोसीएशनचे अध्यक्ष हर्षद शाह, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी सी.आर.राठोड, आत्मा कार्यालयाचे आर.बी.चलवदे, जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीचे सदस्य यांची उपस्थित होती.

0000

हर घर तिरंगा उपक्रमात

उर्त्स्फूत सहभाग घेण्याचे आवाहन

- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत

नांदेड (जिमाका) दि. 21 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त "हर घर तिरंगा" उपक्रम प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी "हर घर तिरंगा" या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे सांगितले. ज्यामुळे नांदेड जिल्ह्याचा नाव लौकीक होईल. तसेच याबाबतची नोंद https://harghartirangananded.in या संकेतस्थळावर करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत केले.

सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांनी हर घर तिरंगा या उपक्रमासाठी 100 भारतीय ध्वज देणगी स्वरुपात वितरणासाठी उपलब्ध करुन दिले. यावेळी कार्यालयात अनुज्ञप्ती व इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांमध्ये ध्वज वाटप करण्यात आले. विक्रीसाठी ध्वज प्रादेशिक परिवहन कार्यालयात महिला आर्थिक विकास महामंडळ नांदेड (महाराष्ट्र शासन अंगीकृत) चे सावित्री महिला लोक संचलित साधन केंद्र नांदेड यांच्यामार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमास कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती.

0000

 सरदार पटेल राष्ट्रीय ऐक्य पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- सरदार पटेल राष्ट्रीय एकता दिन 31 ऑक्टोबर 2022 रोजी साजरा करण्यात येतो. देशाचे ऐक्य व अखंडता या क्षेत्रात काम करणाऱ्या व योगदान देणाऱ्या आणि उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती/संस्थाना राष्ट्रीय एकता दिनाच्या दिवशी सरदार पटेल राष्ट्रीय ऐक्य पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार सन 2022 साठी ऑनलाईन अर्ज 31 जुलै पर्यंत मागविण्यात आले आहे. या प्रस्तावाबाबत संपूर्ण माहिती www.awards.gov.in चे वेबसाईट वर उपलब्ध आहे.  राष्ट्रीय एकता आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी ज्यांनी कार्य केले किंवा सशक्त भारत निर्माणात सहभाग असलेल्या व्यक्ती, संस्था व  संघटनानी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिलिंद वाघमारे यांनी केले आहे.

0000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...