विशेष श्रमिक रेल्वेने नांदेड येथून 1420 प्रवासी
पश्चिम बंगालकडे रवाना
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी साधला समन्वय

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, मनपा आयुक्त सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, प्र. तहसीलदार सारंग चव्हाण, तहसीलदार अर्धापूर सुजित नरहिरे, लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, नायब तहसीलदार मुगाजी काकडे आदि संबंधित विभागाचे प्रमुखांची
उपस्थिती होती.
नांदेड येथून निघालेल्या या
प्रवाशांमध्ये लातूर येथील 49,
बीड येथील 125 , परभणी येथील 140, नांदेड येथील 402 , जालना येथील 18, औरंगाबाद येथील 288, अमरावती येथील 200, यवतमाळ येथील 198 असे एकूण 1 हजार 420 प्रवासी आहेत. ही रेल्वे रात्री
2-00 च्या सुमारास बडनेरा येथे पोहचल्यावर तेथून कांही प्रवासी घेण्याचे नियोजन
झाले आहे.
दोन दिवसांच्या या प्रवासात प्रवासी
उपाशी राहू नयेत यासाठी नांदेड जिल्हा प्रशासन, सराफा असोसिएशन नांदेड, ओमप्रकाश
पोकर्णा मित्र मंडळ व इतर सेवाभावी संस्था यांच्यावतीने विशेष नियोजन केले. सर्व
प्रवाशांना दोन दिवस पुरेल ऐवढे अन्नाची पाकिटे, फळ व
पाण्याच्या बॉटल्स पुरविण्यात आल्या. याचबरोबर सर्व प्रवाशांना मास्कही पुरविण्यात
आले.
000000
No comments:
Post a Comment