Friday, May 14, 2021

 

शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी

शेतकऱ्यांनी 1 जूननंतर कापूस बियाणाची लागवड करावी 

नांदेड (जिमाका) दि. 14 :-  शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खरीप हंगाम 2021 मध्ये बियाणे विक्रेत्यांनी 1 जून पूर्वी शेतकऱ्यांना कापुस बियाण्याची विक्री करु नये. तर शेतकऱ्यांनी पण 1 जुनच्या अगोदर कापुस बियाण्याची शेतात लागवड करु नये. हंगामपूर्व कापसाची लागवड केल्याने शेंदरी बोंडअळीचा पुर्न: उत्पतीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामूळे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना हंगामपुर्व बियाणे उपलब्ध करुन न दिल्यास व शेतकऱ्यांनी हंगामपूर्व लागवड न केल्यास शेंदरी बोंडअळीचा होणारा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. त्यामूळे शेतकऱ्यांनी हंगामपूर्व कापूस बियाण्याची लागवड करु नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 36 8 मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा नांदेड दौरा  नांदेड, दि. 9 एप्रिल :-  राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे...