Tuesday, January 8, 2019


अनाथ मुलांना प्रमाणपत्रासाठी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन 
नांदेड दि. 8 :- बालगृहात बाहेर पडलेल्या ज्या अनाथ मुलांच्या जवळ जातीचे प्रमाणपत्र नाहीत अशा मुलांनी त्यांच्या शेवटच्या वास्तव्यास असलेल्या संस्थेशी संपर्क साध ते अनाथ असल्याबाबतचा प्रस्ताव  संबंधीत संस्थेमार्फत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
बालन्याय (मुलांची काळजी संरक्षण) अधिनियमांतर्गत राज्या कार्यरत शासक, स्वयंसेवी बालगृहा दाखल होणाऱ्या अनाथ मुलांना संस्थेतून बाहेर पडतांना त्यांच्या जवळ जातीचे प्रमाणपत्र नसल्याने त्यांना शैक्षणिक, अर्थिक, सामाजिक सवलती आणि विशेष लाभ मिळत नाहीत. त्यामुळे या लाभार्थ्यांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र महिला बाल विकास आयुक्तालय स्तरावरुन निर्गमित करण्यात येणार आहे.
0000000

No comments:

Post a Comment

  चला घडवूया विकसित महाराष्ट्र ! विकसित महाराष्ट्राची रुपरेषा ठरविण्यात आपला सहभाग द्या! 'विकसित महाराष्ट्र २०४७ : महाराष्ट्राचे व्हिजन ...