मागील दोन दिवसापूर्वी #नांदेड जिल्ह्यात #अतिवृष्टी होऊन अनेक तालुक्यातील गावामध्ये पुराचे #पाणी शिरले आहे. या पुराच्या पाण्यातून नागरिकांना सोडविण्यासाठी #एसडीआरएफ व स्थानिक प्रशासनाच्या टीमच्या माध्यमातून अथक प्रयत्न करून नागरिकांना सुरक्षित सोडविण्यात येत आहे.
27 व 28 ऑगस्ट रोजी #लेंडीनदी, #तिरुनदीला आलेल्या पुराचे पाण्यामुळे लेंडी धरणातील बॅकवाटरचे पाणी मुखेड तालुक्यात भिगोली या गावात शिरून घरात 20 नागरिक अडकले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसीलदार राजेश जाधव तहसीलदार यांनी व त्यांच्या टिमने नागरिकांना #सुखरूप बाहेर काढुन #सुरक्षित ठिकाणी त्यांना हलवण्यात आले.


No comments:
Post a Comment