Wednesday, June 21, 2017

यांत्रिकीकरण मागणी अर्जाची
कासराळीत आज सोडत ; शेतकऱ्यांना आवाहन
            नांदेड दि. 21  :- "उन्नत शेती समृद्ध शेतकरी" कार्यक्रमांतर्गत प्राप्त अर्जातील लाभार्थ्यांची सोडतीद्वारे गुरुवार 22 जून 2017 रोजी निवड करण्यात येणार आहे.  ही सोडत सकाळी 10 वा. फळरोप वाटिका कसराळी येथे ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी सोडतीस उपस्थित रहावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी गोंडेस्वार यांनी केले आहे. 
            कृषि विभागामार्फत "उन्नत शेती समृद्ध शेतकरी" कार्यक्रम सन 2017-18 मध्ये राबविण्यात येत आहे.  यात यांत्रिकीकरण घटकासाठी ट्रॅक्टर व शेती उपयोगी विविध औजारे घेऊ इच्छिणाऱ्या बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते.  या योजनेस शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून 177 शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक    377 फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे बंधनकारक    नांदेड दि. 11 एप्रिल :- पुनर्रचित हवामान आ...