वृत्त क्रमांक 873
पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे दिले निर्देश
नांदेड, दि. 18 ऑगस्ट:-जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. मुखेड तालुक्यात लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रामध्ये आणि लातूरच्या उदगीर तालुक्यात आणि कर्नाटकच्या बिदर तालुक्यात काल अतिवृष्टी झाली. यामुळे चार गावे जलमय झाली आहेत.
नांदेड जिल्ह्यातील मुक्रमाबाद मंडळात २०० मी.मी पावसाची नोंद झाली. यामुळे लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रातील रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भासवाडी या गावामध्ये पाणी घुसले. महसूल व एसडीआरएफच्या टीमचे सकाळपासून शोध व बचाव कार्य सुरु आहे.
तसेच नांदेड येथील विष्णुपुरी प्रकल्पातून १ लाख २५ हजार क्यूसेस विसर्ग सोडण्यात येत असल्यामुळे शहरात व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे सतत जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून सर्व परिस्थिती त्यांनी जाणून घेतली. तसेच सर्व परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.
०००००
No comments:
Post a Comment