Monday, June 16, 2025

 वृत्त क्रमांक 625

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता  

हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

१९ व २० रोजी यॅलो अलर्ट  जारी 

नांदेड,दि १६ जून:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 16 जून 2025 रोजी दुपारी 13:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 19 व 20 जून 2025 हया दोन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. 19 व 20 जून 2025 हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या गोष्टी करा 

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तुमच्या स्मार्ट मोबाईल फोन मध्ये 'दामिनी', 'सचेत' हे दोन ॲप डाउनलोड करा 'दामिनी' ॲप तुमच्या आजूबाजूला वीज विषयक संभाव्य धोके दर्शविते तर 'सचेत' ॲप मुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या हवामानाविषयी अचूक इशारे व माहिती मिळते.

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 624

विद्यार्थ्यांनी तात्काळ आधार बायोमेट्रीक अद्ययावत करुन घ्यावे

-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले 

नांदेड, दि. 16 जून :- राज्य व राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या जेईइ , नीट, एमएचसीईटी, एनडीए  तसेच अन्य महत्त्वाच्या शैक्षणिक व प्रवेश परीक्षांमध्ये सहभागासाठी विद्यार्थ्यांना आधार आधारित ओटीपी अथवा प्रमाणीकरण आवश्यक असते. मात्र अनेक विद्यार्थ्यांची आधार माहिती बायोमेट्रीकदृष्ट्या अद्ययावत नसल्यामुळे अशा परीक्षांमध्ये नोंदणी करताना अडचणी येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तात्काळ आधार अद्ययावत करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. 

दहावी, बारावी पर्यंतच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले आधारकार्ड अद्ययावत करणे ही काळाची गरज आहे. आधार बायोमेट्रीक अपडेट अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांनी बायोमेट्रिक अद्ययावत करणे आवश्यक आहे. 

सर्व शाळा व महाविद्यालयांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांची आधार स्थिती तपासावी आणि ज्यांचे आधार बायोमेट्रिक अद्ययावत नाही त्यांना लवकरात लवकर जवळच्या आधार केंद्रावर करून घ्‍यावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. त्‍याअनुषंगाने १२ जून 2025 रोजी जिल्‍ह्यातील सर्व आधार केंद्र चालक यांची बैठक घेऊन सर्व विदयार्थ्‍यांचे आधार कार्ड प्राधान्‍याने  अपडेट करण्‍याचे  निर्देश दिले. 

प्रमुख सूचना: 

विद्यार्थ्यांनी युआयडीआय या अधिकृत वेबसाइटवर आधार स्थिती तपासावी.

शाळांनी वर्गनिहाय यादी तयार करून विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार आधार केंद्रावर जाण्यास मदत करावी. आधार बायोमेट्रिक अपडेट साठी विद्यार्थ्यांनी जवळच्या आधार नोंदणी केंद्रात उपस्थित राहावे.

जिल्ह्यातील सर्व आधार नोंदणी केंद्रांनी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने सेवा द्यावी. 

बायोमेट्रिक अद्ययावत का आवश्यक आहे?

वय 5 व 15 पूर्ण झाल्यावर बायोमेट्रिक अपडेट बंधनकारक असते. कारण या वयात शरीरातील बायोमेट्रिक बदलतात. आपल्‍या आधारची बायोमेट्रिक माहिती जुनी असेल तर आधार बेसड ईकेवायसी करतांना अडचण येऊ शकते. ज्यांच्याकडे मोबाइल क्रमांक लिंक नाही किंवा बायोमेट्रिक त्रुटी आहेत, त्यांनी तातडीने आधार अपडेट करून शैक्षणिक संधींचा लाभ घेण्याची दक्षता घ्यावी.

युआयडीआयच्या धोरणानुसार, नियमित अद्ययावत न केल्यास सेवा घेण्‍यामध्‍ये अडचण येउ शकते.

आधार बायोमेट्रिकचे महत्त्व:

शैक्षणिक प्रवेश व परीक्षा: जेईइ, नीट, एमएचटी यांसारख्या परीक्षांमध्ये ऑनलाइन अर्ज करताना आधार ओटीपी व प्रमाणीकरण आवश्यक असते.

शिष्यवृत्ती आणि सरकारी योजना: विद्यार्थ्यांना डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे शिष्यवृत्ती मिळण्यासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकृत असणे आवश्यक आहे.

बँकिंग व आर्थिक व्यवहार: आधार-आधारित केवायसीसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य आहे.

रोजगार योजनांमध्ये नोंदणी: पीएमकेव्हीवाय, एनसीएस, मनरेगा इत्यादी योजनांमध्ये सहभागासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक असते.

आरोग्य सुविधा (आयुष्यमान भारत योजनेसाठी): रुग्णांची ओळख बायोमेट्रिकवर आधारित असल्याने योग्य अद्ययावत असणे गरजेचे.

00000

वृत्त क्रमांक 624

बिडी कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना 

लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन 

 नांदेड, दि. 16 जून :- येत्या शैक्षणिक वर्षात 2025-26 साठी आर्थीक सहाय्य योजनेसाठी महाराष्ट्रातील चुनखडी, डोलोमाईट, बिडी, खनिज खान कामगारांच्या मुलांना मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला, मुलींसाठी आर्थिक योजने अंतर्गत सहाय्य योजना भारत सरकारने शिष्यवृत्तीसाठी पहिली ते चौथी, पाचवी ते दहावी, अकरावी ते बारावी, तसेच आय.टी.आय, पॉलीटेक्निक, पदवी अभ्यासक्रम (बि.एस.सी, कृषीसह) बि.ई, एम.बी.बी.एस., एम.बी.ए यांना वार्षिक अर्थसहाय्य राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल https://scholaarship.gov.in वर शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 ऑगस्ट पर्यंत आहे. 

प्रिमॅट्रिकसाठी आहे. आणि पोष्ट मॅट्रिकसाठी 31 ऑक्टोबर पर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज आणि पात्रता माहिती राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर प्रदर्शित केली आहे. अर्जाची पडताळणी करुन घेण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे, अशी माहिती वैद्य बिडी वर्कर वेलफेअर फंड डिस्पेंसरी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000

वृत्त क्रमांक 623 

शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात रंगला गुलाबपुष्प स्वागताचा उपक्रम

लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला स्नेहबंध 

नांदेड, 16 जून :- जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागाच्या 100 शाळांना भेट उपक्रमांतर्गत आज जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासनातील अधिकारी, शिक्षक व पालक यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन तर नवागत पहिलीतील विद्यार्थ्यांना फुले, पुस्तके, पेन्सिल तसेच स्मरणघडी पत्रिका देऊन स्वागत करण्यात आले. 

खासदार अशोक चव्हाण यांनी भोकर येथील नूतन कन्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्‍यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी माहूर येथील केंद्रीय प्राथमि‍क शाळेस भेट देवून विद्यार्थ्‍यांना पुस्‍तकांचे वाटप केले. त्‍यांच्‍या हस्‍ते वृक्ष लागवड करण्‍यात आली. आमदार तथा बाळासाहेब ठाकरे हळद-हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी नांदेड तालुक्यातील पासदगाव शाळेला भेट दिली. आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी लोहा तालुक्यातील सोनखेड जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आमदार राजेश पवार यांनी घुगराळा येथील जिल्हा परिषद शाळेत, तर आमदार श्रीजया चव्हाण यांनी मुगट येथील शाळेत चिमुकल्यांशी हितगुज केले. आमदार आनंद तिडके बोंढारकर यांनी जवाहरनगर तुप्पा येथील शाळेला भेट दिली. आमदार बाबुराव पाटील कोळीकर यांनी हदगाव तालुक्यातील कोहळी व निवघा येथील शाळांना भेटी दिल्या. खासदार डॉ. अजित गोपछडे यांचे बंधु बिलोली पंचायत समितीचे माजी सभापती उमाकांत गोपछडे यांनी बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील शाळेस तर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या सुविद्य पत्नी संध्याताई कल्याणकर यांनी निळा येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी वाजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी हदगाव तालुक्यातील तामसा येथील शाळेत, जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार वाघी प, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी वसरणी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन नवागतांचे स्वागत केले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच जिल्ह्यातील 220 शाळांना वर्ग 1 व 2 संवर्गातील अधिकाऱ्यांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले व शाळेतील सुविधांची पाहणी केली. 

यावेळी अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, शिक्षण विभागाच्‍या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्‍यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, शिक्षणाधिकारी नियोजन दिलीपकुमार बनसोडे, उपशिक्षणाध्किाारी नागराज बनसोडे, अवधूत गंजेवार यांच्‍यासह शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला. 

विशेष उपक्रम ठरले आकर्षणाचे केंद्रबिंदू

नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. बुद्धीवर्धक खेळ, प्राथमिक आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांचे ठसे घेणे, स्मरणघडी पत्रिका भरविणे आणि सामूहिक छायाचित्र काढणे हे उपक्रम विशेष आकर्षण ठरले. 

प्रवेश उद्दिष्टांकडे भक्कम पावले

जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी 35 हजार 265 विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या उपक्रमामुळे अधिकाधिक प्रवेश होण्याची सकारात्मकता दिसून येत आहेत.

00000


















वृत्त क्रमांक 622

स्वच्छता तेथे आरोग्याची धनसंपदा : राज्यमंत्री मेघना बोर्डीकर नांदेड, दि. 16 जून :- स्वच्छतेतून आरोग्य, आरोग्यातून समृध्दी असा संदेश संत गाडगेबाबा यांनी दिला आहे. जिथे स्वच्छता असते तिथे सुख-शांती असते. ज्या घरात स्वच्छता असते तेथे आरोग्याची धनसंपदा असते. म्हणून स्वच्छतेला महत्त्व असून ते प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचविणे गरजेचे असल्याचे मत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले. आज राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर ह्या माहूर येथे दर्शनाच्या व आनंद दत्तधाम आश्रमभेटीच्या निमित्ताने नियोजित दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी प्रथम माहूर गडावरील भगवान दत्त प्रभू, माता रेणुकेचे दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर साईनाथ महाराज वसमतकर यांच्या आनंद दत्तधाम आश्रमास भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी आश्रमाच्यावतीने त्यांचा यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला. यावेळी भक्तांना संबोधित करताना राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, मुघलांनी उध्वस्त केलेल्या मंदिराची उभारणी करण्याचे काम 300 वर्षापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी केले. त्यांच्याच विचाराचा वारसा पुढे नेत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रभू रामचंद्राचे मंदिर अयोध्येत उभा केले. काशी कॉरिडॉर उभारले, उज्जैन मंदिराचा विकास केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ही तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा म्हणून भरभरून निधीची घोषणा केली आहे. त्यात श्रीक्षेत्र माहुरचा देखील समावेश आहे. प्रत्येक तीर्थक्षेत्र दर्जेदार व्हायला पाहिजे त्या ठिकाणावरून आपणास ऊर्जा मिळते त्यासाठी आमचे राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. साईनाथ महाराज वसमतकर यांनी माहूर या संत भूमीचे महत्व सांगून राज्य सरकारचा स्वच्छता दूत म्हणून शेवट पर्यंत देशसेवा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, भाजपचे तालुकाध्यक्ष निळखंट मस्के, संध्या प्रफुल राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. सुत्रसंचालन एस. एस. पाटील यांनी तर आभार भाऊ पाटील यांनी मानले. 00000

 











 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना








 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती




वृत्त क्रमांक 621

विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कार्यातून देशासह शाळेचे, गावाचे नाव उज्ज्वल करावे -पालकमंत्री अतुल सावे

 जिल्हा परिषद व सर्व शासकीय शाळांचे बळकटीकरण करणार

 पहिलीपासून सीबीएससी पॅटर्नच्या माध्यमातून आता शिक्षण

नांदेड, दि. 16 जून :- आज शाळेचा पहिला दिवस. प्रत्येक विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यामध्ये उत्साह भरलेला असतो. या पहिल्या दिवशी मुलांचा उत्साह वाढावा म्हणून राज्य शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, वह्या तसेच इतर शालेय साहित्यांचे वाटप आज करण्यात आले आहे. यावेळी मुलांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी पालकमंत्री अतुल सावे यांनी पालक, विद्यार्थी, शिक्षकांना शुभेच्छा संदेश दूरदृश्यप्रणालीद्वारे दिला. प्रत्येक विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणासोबतच उत्कृष्ट कार्यातून देशाचे, गावाचे, शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.  

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह सर्व शासकीय शाळा बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून जी काही मदत लागेल ती मदत करण्यात येईल, असे पालकमंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले. शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांनी पालक, शिक्षकांचे आणि शाळेवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांचे स्वागत केले. पहिल्या दिवशी सर्वजण उत्साहात शाळेच्या कार्यक्रमात उपस्थित आहात. या पहिल्या दिवशी आपण सर्वांनी एक संकल्प करु या. या वर्षभरात आपण सर्वजण शाळेत उपस्थित राहू या. प्रत्येक नागरिक व विद्यार्थी शिकला पाहिजे अशा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आपण सर्वानी मिळून त्यांचा हा संकल्प पूर्ण करु या, असेही आवाहन त्यांनी केले. 

आज पासून सर्व शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न राबविण्यात येणार आहे. या निर्णयानुसार सर्व जिल्हा परिषद शाळांमधून सीबीएससी पॅटर्न प्रमाणे शिक्षण मिळणार आहे. शासनाच्यावतीने सर्व शाळामध्ये डिजीटलायझेशन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असेही पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही लावले जात आहेत. शिक्षकांनी जे विद्यार्थी अभ्यासात मागे आहेत त्यांना इतर विद्यार्थ्यांसोबत आणण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली पाहिजे. एखादा विद्यार्थी अभ्यासात मागे असेल तर त्याचे पालकांशी चर्चा करुन शिक्षकांनी संवाद साधला पाहिजे यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या पुढील काळात चांगले काम होईल. आज विद्यार्थ्यांना गणवेश, बुट, वह्या, शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 

०००००



 रस्ता सुरक्षा मोहिम









 

 रस्ता सुरक्षा मोहिम








वृत्त क्रमांक 620

विद्यार्थ्यांनी तात्काळ आधार बायोमेट्रीक अद्ययावत करुन घ्यावे -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले 

नांदेड, दि. 16 जून :- राज्य व राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या जेईइ , नीट, एमएचसीईटी, एनडीए  तसेच अन्य महत्त्वाच्या शैक्षणिक व प्रवेश परीक्षांमध्ये सहभागासाठी विद्यार्थ्यांना आधार आधारित ओटीपी अथवा प्रमाणीकरण आवश्यक असते. मात्र अनेक विद्यार्थ्यांची आधार माहिती बायोमेट्रीकदृष्ट्या अद्ययावत नसल्यामुळे अशा परीक्षांमध्ये नोंदणी करताना अडचणी येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तात्काळ आधार अद्ययावत करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. 

दहावी, बारावी पर्यंतच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले आधारकार्ड अद्ययावत करणे ही काळाची गरज आहे. आधार बायोमेट्रीक अपडेट अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांनी बायोमेट्रिक अद्ययावत करणे आवश्यक आहे. 

सर्व शाळा व महाविद्यालयांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांची आधार स्थिती तपासावी आणि ज्यांचे आधार बायोमेट्रिक अद्ययावत नाही त्यांना लवकरात लवकर जवळच्या आधार केंद्रावर करून घ्‍यावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. त्‍याअनुषंगाने १२ जून 2025 रोजी जिल्‍ह्यातील सर्व आधार केंद्र चालक यांची बैठक घेऊन सर्व विदयार्थ्‍यांचे आधार कार्ड प्राधान्‍याने  अपडेट करण्‍याचे  निर्देश दिले.  

प्रमुख सूचना: 

विद्यार्थ्यांनी युआयडीआय या अधिकृत वेबसाइटवर आधार स्थिती तपासावी.

शाळांनी वर्गनिहाय यादी तयार करून विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार आधार केंद्रावर जाण्यास मदत करावी. आधार बायोमेट्रिक अपडेट साठी विद्यार्थ्यांनी जवळच्या आधार नोंदणी केंद्रात उपस्थित राहावे.

जिल्ह्यातील सर्व आधार नोंदणी केंद्रांनी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने सेवा द्यावी.

 बायोमेट्रिक अद्ययावत का आवश्यक आहे?

वय 5 व 15 पूर्ण झाल्यावर बायोमेट्रिक अपडेट बंधनकारक असते. कारण या वयात शरीरातील बायोमेट्रिक बदलतात. आपल्‍या आधारची बायोमेट्रिक माहिती जुनी असेल तर आधार बेसड ईकेवायसी करतांना अडचण येऊ शकते. ज्यांच्याकडे मोबाइल क्रमांक लिंक नाही किंवा बायोमेट्रिक त्रुटी आहेत, त्यांनी तातडीने आधार अपडेट करून शैक्षणिक संधींचा लाभ घेण्याची दक्षता घ्यावी.

युआयडीआयच्या धोरणानुसार, नियमित अद्ययावत न केल्यास सेवा घेण्‍यामध्‍ये अडचण येउ शकते.

आधार बायोमेट्रिकचे महत्त्व

शैक्षणिक प्रवेश व परीक्षा:

जेईइ, नीट, एमएचटी यांसारख्या परीक्षांमध्ये ऑनलाइन अर्ज करताना आधार ओटीपी व प्रमाणीकरण आवश्यक असते.

शिष्यवृत्ती आणि सरकारी योजना:

विद्यार्थ्यांना डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे शिष्यवृत्ती मिळण्यासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकृत असणे आवश्यक आहे.

बँकिंग व आर्थिक व्यवहार:

आधार-आधारित केवायसीसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य आहे.

रोजगार योजनांमध्ये नोंदणी:

पीएमकेव्हीवाय, एनसीएस, मनरेगा इत्यादी योजनांमध्ये सहभागासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक असते.

आरोग्य सुविधा (आयुष्यमान भारत योजनेसाठी):

रुग्णांची ओळख बायोमेट्रिकवर आधारित असल्याने योग्य अद्ययावत असणे गरजेचे.

00000

15.6.2025

वृत्त क्रमांक 619

धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानास जावरला येथे प्रारंभ

लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण

नांदेड दि. 15 जून :-आज किनवट तालुक्यातील जावरला येथे प्रधानमंत्री धरती आबा  जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानास प्रारंभ झाला. या अभियानाचा शुभारंभ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चन्द्रा दोन्तुला यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत बियाणे व इतर विभागाचे विविध प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी शिबिराला उपस्थित असणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन केले.  

या शिबिरास जावरला परिसरातील आदिवासी नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रदिप नाईक, नायब तहसिलदार रामेश्वर मुंडे, सरपंच नमिता गेडाम, माधवराव मरसकोल्हे व इतर विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. या शिबिराच्या ठिकाणी महसूल, आरोग्य, कृषी, आदिवासी विकास, बांधकाम, पंचायत समिती तसेच इतर शासकीय विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून आदिवासी नागरिकांना एकाच ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या.

0000































  वृत्त क्रमांक   625 वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता   हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना १९ व २० रोजी यॅलो अलर्ट  जारी  नांदेड,दि १६ जून:-...