Monday, March 10, 2025

वृत्त क्रमांक 278

दिग्रस बंधाऱ्यातून आज विसर्ग नदीकाठी सावधानतेचा इशारा 

नांदेड दि. 10 मार्च :  दिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यातून उद्या दिनांक 11 मार्च रोजी सकाळी ६ वाजता पाणी  सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.   

दिग्रस बंधाऱ्यातून उद्याला सकाळी विसर्ग  राहणार आहे. दिग्रस बंधाऱ्या नंतर अंतेश्वर उच्च पातळी बंधारा व त्यानंतर नांदेड येथील विष्णुपुरी बंधारा अशी एकूण उतरण आहे. विष्णुपुरी बंधाऱ्यातून नांदेड शहराला पाणीपुरवठा होतो. त्यामुळे 60 किलोमीटरचा प्रवास करून पाणी या बंधाऱ्यात येणार आहे. तरी दिग्रस ते नांदेड गोदावरी नदीकाठावर असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेची, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य व  इतर कोणतीही हानी होणार नाही, यासाठी नागरिकांनी सतर्क असावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.  

परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील दिग्रस येथील उच्च पातळी बंधाऱ्याचे शाखाधिकार्‍यांनी यासंदर्भात नांदेड जिल्हा प्रशासनाला सूचना केली आहे. त्यानुसार नांदेड जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

00000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 285 जिल्ह्यात  22 मार्च रोजी    राष्ट्रीय लोकअदालतीचे     आयोजन   नांदेड दि.   11   मार्च  :-   राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकर...