पत्रकारितेसमोरच्या आव्हानांवर मात करण्यासाठी
तत्वनिष्ठा, प्रामाणिकपणा यातूनच बळ मिळेल
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणदिन निमित्त अभिवादन
नांदेड, दि. 6:- पत्रकारितेसमोर आव्हाने येतच असतात. पण या
आव्हांनावर मात करण्यासाठी तत्वनिष्ठा आणि प्रामाणिकपणा याद्वारेच पत्रकारांना बळ
मिळेल, असा सूर आज येथे व्यक्त झाला. निमित्त होते, दर्पण दिनानिमित्त आचार्य
बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय नांदेड आणि महात्मा गांधी मिशन संचलित वृत्तपत्र विद्या व माध्यमशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे. अध्यक्षस्थानी महात्मा गांधी मिशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कमलकिशोर कदम होते.
एमजीएम शिक्षण संकुलातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार देवदत्त तुंगार, पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर, ज्येष्ठ
पत्रकार सु. मा. कुलकर्णी, गोविंद मुंडकर, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, महाविद्यालयाच्या
प्राचार्य डॅा. गीता लाटकर, महाविद्यालयाचे ग्रंथपाल गोविंद हंबर्डे, वृत्तपत्र विद्या व माध्यमशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.गणेश जोशी, माहिती अधिकारी निशिकांत तोडकर यांची
उपस्थिती होती. कार्यक्रमास विविध माध्यमांचे प्रतिनिधी, महाविद्यालयातील
पत्रकारितेचे विद्यार्थी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात
श्री. कदम यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची तत्त्वनिष्ठा ते देशातील
अलिकडच्या काळापर्यंतच्या तत्त्वनिष्ठ आणि ध्येयवादी पत्रकारितेच्या गौरवपुर्ण
वाटचालीचा उल्लेख केला. तत्त्वनिष्ठा, सत्य तीच बातमी आणि बातमीत सत्य असायलाच हवे
या धारणेबाबत श्री. कदम यांनी भाष्य केले.
0000000
No comments:
Post a Comment