Monday, September 30, 2024

दिनांक : 29 सप्टेंबर 2024

  वृत्त क्र. 876

नेरली येथील साथरोग नियंत्रणात

सर्व रुग्ण धोक्याबाहेर ; गावात स्वच्छता अभियान

नांदेड दि. 29 सप्टेंबर :  नांदेड जिल्ह्यातील नेरली येथे दुषित पाणी पिल्यामुळे विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सर्व रुग्ण धोक्याबाहेर असून गावामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.

या गावात दुषीत पाण्यामुळे मळमळ, जुलाब व उलटी अशा रुग्णांचा साथीचा उद्रेक झाला होता. त्याठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी भेट देवून तात्काळ प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख आणि त्यांचा आरोग्य विभागाची संपूर्ण टीम तळ ठोकून त्या ठिकाणी आहेत. आता परिस्थिती आटोक्यात असून साथरोग नियंत्रणात आहे.

सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोताचे सर्व विहिर, हातपंप व बोर व नळ योजना पाण्याची टाकी यांचे बिल्चींग पावडरद्वारे पाणी शुध्दीकरण करण्यात आले आहे. 17 पाणी नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. ब्लिचिंग पावडरचा एक नमुना प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. अनुजैविक व रासायनिक तपासणीसाठी भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणा प्रयोगशाळा वर्कशाप नांदेड व जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा नांदेड येथे पाठविण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी , आरोग्य सहाय्यक, आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत गृहभेटीद्वारे रुग्ण शोध मोहिम सुरु केली आहे. ज्या कुटूंबामध्ये  मळमळ, जुलाब, उलटी यासारखे लक्षणे रुग्णालस दिसून आल्यास रुग्णास आरोग्य उपकेंद्रामध्ये उपचार सुरु करण्यात आले आहे. गावातील नागरिकांना पाणी पुरवठा टॅकरद्वारे सुरु करण्यात आले आहे ते पाणी शुध्द आहे. किंवा नाही याची जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी स्वत: ओटी टेस्ट करुन खात्री करत आहेत.

नेरली येथील आता पर्यतच्या रुग्णांची संख्या 344 आहे. यापैकी रेफर 210 पैकी जिल्हा रुगालय 94, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 89, नवोदय हॉस्पीटल 27 रुग्ण आहेत. सर्व रुग्ण धोक्याबाहेर आहेत.

नेरली येथील परिस्थीती नियंत्रणात येत आहे याकडे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत , मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्याच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सुर्यवंशी, गट विकास अधिकारी नारवटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री खेडकर, डॉ. बालाजी मिरकुटे, समुदाय आरोग्य अधिकारी , विस्तार अधिकारी , ग्रामपंचायत पद अधिकारीव कर्मचारी साथ नियंत्रणासाठी परिश्रम घेत आहेत.

नेरली येथील नागरिकांनी  पाणी गाळून उकळून प्यावे, शिळे अन्न व उघड्यावरचे अन्न खाऊ नये, जेवणापूर्वी व स्वच्छालयाला जावून आल्यानंतर साबनाने हात स्वच्छ धुवावे. मुलांना जेवण भरविण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे. स्वंयपाक करण्यापूर्वी महिलांनी हात स्वच्छ धुवावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी  केले. स्तनदा माता व गरोदर माता अंगणवाडीतील सॅम व मॅम मुले व लहान मुले यांचे तपासणी करण्यात येत आहे. मळमळ उलटी व जुलाब यासारखे लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी आरोग्य कर्मचारी व आरोग्य उपकेंद्राशी संपर्क करावा, असेही आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

00000







No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 907 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावरून प्रस्थान नांदेड दि. 5 ऑक्टोबर :- बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या प...