महात्मा बसवेश्वर यांचे विचार
पुढच्या
पिढीपर्यंत पोहचवावेत - जिल्हाधिकारी
डोंगरे
जिल्हाधिकारी कार्यालयात बसवेश्वर
यांना अभिवादन

कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी
अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर,
उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा कोषागार अधिकारी मनोज गग्गड, अप्पर कोषागार
अधिकारी एन. पी. पाचंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, तहसिलदार ज्योती
पवार, तहसिलदार अरविंद नरसीकर आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले की, महात्मा बसवेश्र्वरांचे
जीवन हाच एक संदेश आहे. त्यांनी समजोन्नतीसाठी केलेल्या कार्याची महती पुढच्या
पिढीपर्यंत पोहचणे महत्त्वाचे आहे. यावेळी त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना, महात्मा बसवेश्र्वरांची कर्मभुमी म्हणून
परिचित असलेल्या मंगळवेढा परिसरात ग्रंथालय, प्राचीन ठेव्यांचे जतन तसेच
संशोधनासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांत सक्रीय सहभागी होण्याची संधी
मिळाल्याचेही नमूदही केले.
सुरवातीला महात्मा बसवेश्र्वर यांच्या प्रतिमेस नूतन जिल्हाधिकारी श्री.
डोंगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. निवासी
उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. लिपीक दिपाली
घाटोळ तसेच अप्पर कोषागार अधिकारी श्री. पाचंगे यांची महात्मा बसवेश्र्वर यांच्या
जीवन चरित्र-कार्याविषयी समयोचित भाषणे झाली. तहसिलदार श्री. नरसीकर यांनी आभार
मानले.
000000
No comments:
Post a Comment