Friday, May 16, 2025

वृत्त क्रमांक 501

पीएम जनमन योजनेतून आदिवासी गाव, पाडयाचा कायापालट

योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवाना विविध सुविधा

193 आदिवासी लाभार्थ्यांना घरकुल मंजूर

नांदेड दि. १६ मे : देशातील आदिम जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  15 नोव्हेंबर 2023 पासून जनजाती आदिवासी न्याय योजना (पीएम जनमन) कार्यान्वीत करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात किनवट व माहूर तालुक्यातील 26 कोलाम पाडयावरील आदिवासी लाभार्थ्यांना विविध उपक्रमांद्वारे लाभ देण्यात येत आहेत. यात विविध पायाभूत सुविधांचा लाभ देण्यात आला असून ही कार्यवाही निरंतर सुरु आहे.

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील किनवट व माहूर तालुक्यातील एकूण 26 कोलामपोडाचा/गावांचा समावेश आहे. या 26 गावात 468 कुटूंबातील 1 हजार 734 कोलाम जमातीच्या नागरिकांचे वास्तव्य आहे.

या 26 गावात तालुकास्तरीय यंत्रणेमार्फत आतापर्यत 22 शिबिरे आयोजित करण्यात आलेले आहेत. या शिबिरात योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व दस्ताऐवजांचे वितरण करण्यात आलेले आहे. तसेच आरोग्य विभागामार्फत सिकलसेल तपासणी व आरोग्यविषयक इतर तपासण्या या कॅम्पमध्ये करण्यात आल्या आहेत. सर्व शिबिराचे आयोजनानंतर एकूण कोलाम लोकसंख्या पैकी 1 हजार 634 लाभार्थ्याकडे आधारकार्ड, 1 हजार 249 लाभार्थ्यांना जातीचे दाखले, 419 कुटुंबांना रेशन कार्ड व 1 हजार 248 लाभार्थ्यांचे बँक खाते काढण्यात आलेले आहे. या शिबिराच्या माध्यमातून 1 हजार 246 लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड,  प्रलंबित एकूण 28 फ्रा वनपट्टे, 121 पीएम किसान कार्ड लाभार्थ्याना वाटप करण्यात आले. 

पीएम उज्वला अंतर्गत 141 प्रस्ताव गॅस कनेक्शनसाठी प्राप्त होते, हे सर्व प्रस्ताव मंजूर आहेत. पीएम मातृ वंदना योजनेअंतर्गत आतापर्यत 18 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. पीएम जनमन घरकुल योजनेअंतर्गत 193 घरकुले मंजूर असून 26 गावात घरगुती विज जोडणी करण्यात आलेली आहे. सर्व गावांमध्ये मोबाईल कनेक्टीव्हिटी बाबत पाठपुरावा करण्यात आलेला असून, सर्व गावात मोबाईल कनेक्टीव्हिटी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. पीएम जनमन अंतर्गत जावरला येथे अंगणवाडीचे काम मंजूर असून हे काम प्रगतीपथावर आहे.

सर्व कोलामवस्ती, गावामध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध असून 25 गावांमध्ये नियमित मोबाईल मेडिकल युनिट द्वारे नियमित भेट देण्यात येते. आरोग्यविषयक सेवा पुरविण्यात येतात. सर्व गावांमध्ये घरगुती नळ पाणीपुरवठा योजनेचा लाभ मंजूर केला आहे. सर्व कोलाम वास्तव्य असलेल्या गावात आवश्यक सेवांचा पुरवठा पीएम जनमन योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला यांनी दिली आहे.  

00000

No comments:

Post a Comment

  ' विकसित महाराष्ट्र 2047 '  साठी सर्वेक्षणामध्ये 17 जुलै पर्यंत नागरिकांनी मत नोंदवावे नांदेड दि.27 जून : भारत सरकारच्या विकसित भा...