Tuesday, February 11, 2025

 विशेष लेख                                                                                  

अॅग्रीस्टॅक योजना आणि नांदेड जिल्ह्यात योजनेची प्रभावी अंमलबजावणी !

शेती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कृषी क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवण्यासाठी शासनाने ‘अॅग्रीस्टॅक’ (AgriStack) ही योजना सुरू केली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना एक शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) दिला जात आहे. हा क्रमांक मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या माहितीवर आधारीत विविध सरकारी योजनांचा लाभ सहज मिळणार आहे.

नांदेड जिल्ह्यात ‘अॅग्रीस्टॅक’ची प्रभावी अंमलबजावणी

नांदेड जिल्ह्यात कृषीक्षेत्र विस्तृत आहे आणि येथे लाखो शेतकरी विविध पिके घेतात. शासनाने नांदेडमध्ये ‘अॅग्रीस्टॅक’ची अंमलबजावणी प्रबळपणे सुरू केली आहे. जिल्ह्यातील सीएससी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर शेतकरी नोंदणी होत आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट अनुदाने, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांचा जलद लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

शेतकरी ओळखपत्र क्रमांकाचे महत्त्व आणि फायदे

थेट सरकारी अनुदान व आर्थिक मदत, पीएम किसान सन्मान निधी दरवर्षी 6 हजार रुपये थेट बँक खात्यात जमा, पीक विमा, कर्ज मंजुरी आणि कृषी अनुदाने  जलद प्रक्रिया, खत, बियाणे व औषधांसाठी अनुदानित दराने सुविधा देण्यात येणार आहेत.

आधुनिक शेती आणि डिजिटल मदत:

हवामान अंदाज आणि पीक सल्ला, मृदा परीक्षण व योग्य खत व्यवस्थापन, बाजारभाव आणि विक्री संधींची माहिती मिळते.

राज्य व केंद्र शासनाच्या कृषी योजनांमध्ये प्राधान्य :

नवीन कृषी यंत्रसामग्री व तंत्रज्ञान, सिंचन योजना, ठिंबक सिंचन, शेततळे, सेंद्रिय शेती प्रकल्प, गटशेती आणि शेतकऱ्यांसाठी विशेष सवलती मिळण्यास मदत होणार आहे.  

शेतकरी ओळखपत्र नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक, सातबारा उतारा (जमिनीचा दाखला) इ.

ही आहेत नोंदणी केंद्रे : सीएससी सेंटर (कॉमन सर्व्हिस सेंटर), आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी मोफत असून, लवकरात लवकर करा !

नोंदणी पूर्णतः मोफत आहे. त्यामुळे कोणत्याही मध्यस्थाला पैसे देण्याची गरज नाही. अधिकृत केंद्रावर जाऊन आपली नोंदणी करून घेता येईल आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यास मदत होईल.

महत्त्वाची सूचना आपली कागदपत्रे नीट सांभाळा !

शासकीय योजनांचा लाभ घेताना खालील कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे ती वेळच्या वेळी अद्ययावत आणि सुरक्षित ठेवा.

महत्त्वाची कागदपत्रे: आधार कार्ड, पॅनकार्ड, शेतकरी ओळखपत्र क्रमांक, सातबारा उतारा, जात प्रमाणपत्र (जर आवश्यक असेल तर) यापैकी कोणतेही कागदपत्र हरवल्यास किंवा चुकीची माहिती असल्यास, शेतकऱ्यांना वेळेत दुरुस्त करून घ्यावी लागणार आहेत.

शेतकऱ्यांचा विकास – देशाचा विकास !

‘ॲग्रीस्टॅक’मुळे शेतकऱ्यांना अनेक योजनांचा थेट लाभ मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हजारो शेतकऱ्यांना अनुदान, आधुनिक शेती माहिती आणि तांत्रिक मदत मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ‘अॅग्रीस्टॅक’योजनेत नोंदणी करुन फार्मर आयडी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येणार असून यामुळे त्यांच्या शेतीचे उत्पादन वाढणार आहे.

शेती समृद्ध झाली, तर देशाची अर्थव्यवस्था बळकट होईल !

‘अॅग्रीस्टॅक’योजनेत नांदेड जिल्ह्यात आतापर्यत 87 हजार 377 शेतकऱ्यांची या योजनेत नावनोंदणी झाली आहे.  तर नांदेड जिल्ह्यात आतापर्यत 57 हजार 731 फार्मर आयडी तयार झाले आहेत.  

डॉ. सचिन खल्लाळ

उपविभागीय अधिकारी नांदेड

00000



No comments:

Post a Comment

#कन्यादानयोजना #नांदेड #भारतरत्नडॉबाबासाहेबआंबेडकरसामाजिकविकासयोजना #नांदेड #तृतीयपंथीयांसाठीयोजना #नांदेड #मोफतशिक्षणयोजना #नांदेड #मुलींच्...