Wednesday, June 26, 2024

 वृत्त क्र. 532

आत्महत्याग्रस्त कुटुंबाना जिल्‍हाधिकाऱ्यांच्या हस्ते कृषि निविष्ठा सामुग्रीचे वाटप

नांदेड दि. 26 :- जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुबांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी वापरावयाच्या संवेदनशील कृषि निविष्ठा सामुग्रीचे (क्रिटीकल इनपुट किट) चे वाटप आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांचे हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात करण्यात आले.
 
यावेळी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) भाऊसाहेब बऱ्हाटे, व्यवस्थापक नाबार्ड दिलीप दमयावार, जिल्हा कृषि अधिकारी जिल्हा विजय बेतीवार, उपविभागीय कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत, नोडल अधिकारी (स्मार्ट प्रकल्प) तथा प्रकल्प उपसंचालक (आत्मा), अनिल शिरफुले, तालुका कृषि अधिकारी, एस. बी. मोकळे, कृषि सहाय्यक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सी डी कदम व आत्माचे श्रीहरी बिरादार व नंदीग्राम शेतकरी उत्पादक कंपनीचे संदीप डाकुलगे, के-फर्टस लॅबचे बी. बी. पेंडकर व नांदेड तालुक्यातील मौजे. तळणी येथील आत्महत्याग्रस्त कुटूंबीय उपस्थित होते.
 
आत्महत्याग्रस्त कुटूंबांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी वापरावयाच्या संवेदनशील कृषि निविष्ठा सामुग्री पिक प्रात्यक्षिक अंतर्गत (0.40 हेक्टरसाठी उच्चतम अनुदान मर्यादा चार हजार रुपये प्रति लाभार्थी/ प्रति प्रात्यक्षिक याप्रमाणे आहे. तसेच विविध आधुनिक कृषीतंत्रज्ञानाचा (जैविक, नैसर्गिक इ.) प्रचार व प्रात्य़क्षिक राबविण्याच्या विस्तार कार्यक्रमाच्या योजनासाठी जैविक किटकनाशके व खते तयार करण्याच्या सोप्या पद्धती शेतकऱ्यांना समजावून सांगणे. तसेच त्यांचा प्रचार व प्रसाराचे विस्तार कार्य करण्यात येणार आहे.
 
आत्महत्याग्रस्त कुटूंबांना प्रोम निर्मिती (पालाशयुक्त सेंद्रीय खत), जैविक कीटकनाशके इ. घरच्या घरी करुन शेतीचा खर्च कमी करणे व काही प्रमाणात उत्पादनाची साधने निर्माण करण्याची आत्मा मधून प्रात्याक्षिक कीट देवून मार्गदर्शन करण्यात येत आहे असे जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) भाऊसाहेब बऱ्होट यांनी सांगितले.
 
या कृषि निविष्ठामध्ये कंपोस्ट खत, निम पावडर तयार करणे, निमार्क तयार करणे व बीबीएफची निवड करणे याबाबी शेतकरीस्तरावर करण्यात येणार आहेत व फॉस्‍फेटीक खत, खत विरघळण्यासाठी व शेणखत कुजविण्यासाठी जिवाणू, लाईट ट्रॅप, एनपीके जीवाणू, बीव्हीएम कल्चर व सापळा पिके इ. निविष्ठांचा आवश्यकता आहे. या निविष्ठांचा पुरवठा आत्महत्याग्रस्त कुटूंबांतील शेतकरी यांना करण्यात येवून शेतकऱ्यांना उत्पादन प्रक्रिया व कार्यक्षम वापराबाबत मोफत मार्गदर्शन सुध्दा करण्यात येणार आहे.
 
सार्वभौम ग्रामसभा अंतर्गत शेतकरी आत्महत्या झालेल्या गावांमध्ये ग्राम जयंती महोत्सव साजरा करुन सक्षम ग्राम निर्मितीसाठी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्‍प संचालक (आत्‍मा), क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांची गावभेट दौऱ्याअंतर्गत 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2024 दरम्यान झालेला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत सक्षम ग्राम निर्मितीसाठी चला जाऊ गावाकडे कार्यक्रम राबविण्यासाठी आत्मा अंतर्गत खरीप हंगामासाठी जिल्ह्यामध्ये 63 गावामधून 335 आत्महत्याग्रस्त कुटूंब आहेत. आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आत्मा यंत्रणेमार्फत जिल्हयांतर्गत प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी येथे 29 एप्रिल 2024 व सगरोळी येथे 3 मे 2024 रोजी संपन्न झाले.  त्यामध्ये त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. आजच्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपविभागीय कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले.
00000





No comments:

Post a Comment

 माहितीचा अधिकार; द्वितीय अपिलासाठी एसएमएस, ई- मेल,  व्हॉटसॲप ग्रुप व वेबसाईटवर नोटीस, निर्णय मिळणार   छत्रपती संभाजीनगर दि.२(जिमाका)- माह...