Tuesday, May 18, 2021

 

पाणी टंचाईपासून मुक्त होण्यासाठी

विहिरींचे पूनर्भरण करण्याचे आवाहन   

नांदेड (जिमाका) दि. 18 :- भविष्यातील पाणी टंचाईपासून मुक्त होण्यासाठी पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील अस्तित्वात असलेल्या विहिरींचे / विंधन विहिरींचे भूजल पूनर्भरण करावे, असे आवाहन वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड यांनी केले. 

भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या सूचनेनुसार भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षे 2021 निमित्त जिल्ह्यातील सरकारी व खाजगी एकुण 4 हजार विहिरींच्या भूजल पूनर्भरणाचा शुभारंभ जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या कार्यालय परिसरातील विंधन विहिरीचे पाऊस पाणी भूजल पूनर्भरण करण्यात आले. हे भूजल पूनर्भरण वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली व कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

00000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 230 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांतर्गत अवसायकांची नामतालिका (पॅनल) साठी मागविण्यात आले अर्ज   नांदेड दि. 25 फेब्रुवारी ...