Thursday, July 4, 2019


वृक्षारोपणाची मोहिम जलदगतीने राबवा
औरंगाबाद, दि.4, (विमाका) :- पर्यावरणाच्या रक्षणाकरीता दि.1 जुलै 2019 पासून शासनाने 33 कोटी वृक्ष लागवडीची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत शासकीय यंत्रणेसह लोकांचासुध्दा सहभाग आहे. वृक्षरोपणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वृक्षारोपणाच्या मोहिमेला सर्वांनी गती द्यावी. ज्याठिकाणी वृक्षारोपण योग्य पाऊस झाला असेल (जमिनीमध्ये 20 सें.मी. ते 30 सें.मी.ओलावा असेल) अशा ठिकाणी त्वरीत लागवड कामे सुरू करावीत. यासाठी संबंधित जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, उपवनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी यांनी वेळोवेळी लागवड कामांचा आढावा घेऊन संबंधीतांचे अडचणींचे निराकरण करावे आपल्या औरंगाबाद महसूल विभागातील वृक्षारोपण कामे गतिमान पध्दतीने आघाडीवर नेऊन उद्दिष्ट यशस्विरित्या पुर्ण करावे, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने कळविले आहे. 
*****

No comments:

Post a Comment

विकसित महाराष्ट्र २०४७ Vision Document तयार करण्याच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात सर्वसामान्य जनतेचा सहभाग महत्वाचा असून शासनाकडू...