Wednesday, April 25, 2018


अधिस्वीकृती पत्रिकेचे अर्ज 2 मेपर्यंत
सादर करण्याचे आवाहन

लातूर, दि. 25 :-  लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील ज्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिकेसाठी नव्याने अर्ज करावयाचे आहेत, त्यांनी बुधवार, दिनांक 2 मे, 2018 पर्यंत संबंधित जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन लातूर विभागीय माहिती उपसंचालक यशवंत भंडारे यांनी केले आहे.
लवकरच लातूर येथे विभागीय अधिस्वीकृती समिती बैठक घेण्यात येणार आहे. त्या बैठकीत प्राप्त अर्जांवर विचार करण्यात येईल.
*****

No comments:

Post a Comment

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...