Saturday, October 15, 2022

 25  टक्के आगाऊ नुकसान भरपाई तातडीने

देण्याचे जिल्हाधिकारी यांचे विमा कंपनीला निर्देश

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्य़ामध्ये अतिवृष्टी मुळे 50 टक्के पेक्षा अधिक नुकसान दिसून आलेले आहे. त्यामुळे नुकसानीच्या 25 टक्के आगाऊ रक्कम तातडीने सोयाबीन, कापुस, ज्वारी व तूर या पिकाचा विमा भरलेल्या जिल्ह्य़ातील सर्व शेतक-यांच्या खात्यात जमा करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी युनायटेड इन्शुरन्स कंपनीला दिले. जिल्हा स्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यासंदर्भात कंपनी स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे त्यांच्या प्रतिनिधीने सांगितले.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   मिशन लक्ष्यवेध जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्रा अंतर्गत खेळाडू निवड चाचणी आयोजित  नांदेड दि. 30 मार्च:- क्रीडा व य...