Saturday, October 15, 2022

 25  टक्के आगाऊ नुकसान भरपाई तातडीने

देण्याचे जिल्हाधिकारी यांचे विमा कंपनीला निर्देश

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्य़ामध्ये अतिवृष्टी मुळे 50 टक्के पेक्षा अधिक नुकसान दिसून आलेले आहे. त्यामुळे नुकसानीच्या 25 टक्के आगाऊ रक्कम तातडीने सोयाबीन, कापुस, ज्वारी व तूर या पिकाचा विमा भरलेल्या जिल्ह्य़ातील सर्व शेतक-यांच्या खात्यात जमा करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी युनायटेड इन्शुरन्स कंपनीला दिले. जिल्हा स्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यासंदर्भात कंपनी स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे त्यांच्या प्रतिनिधीने सांगितले.

0000

No comments:

Post a Comment

  ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ लोकशाही प्रक्रीयेत सहभागासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करावी - विभागीय आयुक्त जितेंद्र...