Friday, January 29, 2021

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2020

प्रवेशिका पाठविण्याकरिता 15 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 29 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची मुदत दि.31 जानेवारी 2021 होती. तथापि या प्रवेशिका सादर करण्याकरिता दि.15 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

0000    


No comments:

Post a Comment

वृत्त  क्रमांक 398 जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्यात दुसऱ्या दिवशी गुणनियंत्रण प्रशिक्षण   नांदेड दि. 16  एप्रिल : राज्याच्या जलसंपदा विभागाच्य...