Tuesday, April 10, 2018


जलयुक्‍त शिवार अभियानातून
शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये समाधान    
                                                - जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे
              
नांदेड,दि. 10 :- जलयुक्त शिवारच्या कामातून पाणी साठ्यात वाढ होत असून शेतकऱ्यांसह नागरिकांनी समाधान व्‍यक्‍त केल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत विविध कामांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्‍हाण नियोजन भवन येथे संपन्‍न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
               यावेळी सहाय्यक जिल्‍हाधिकारी अजित कुंभार, जिल्‍हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, निवासी उपजिल्‍हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्‍हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी श्रीमती दिपाली मो‍तीयेळे, डॉ. सचिन खल्‍लाळ, व्‍ही. एल. कोळी, एन. एच.गायकवाड, प्रभोदय मुळे, सर्व तहसीलदार , नायब तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी तसेच जिल्‍हा व तालुका विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
               बैठकीत जिल्‍हाधिकारी श्री. डोंगरे यांनी जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत सन 2017-18 ची कामे त्वरित पूर्ण करावीत, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
               जिल्‍ह्यात सन 2016-17 मध्‍ये 226 गावात 8 हजार 552 कामे पूर्ण झाली आहेत. तर सन 2017-18 मध्‍ये 183 गावे प्रस्‍तावित आहेत. 5 हजार 424 कामांपैकी एकूण 2 हजार 708 कामे पूर्ण झाली आहेत. जिल्‍ह्यात 380 कामे प्रगतीपथावर असल्‍याची माहिती यावेळी दिली.  
00000

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...